शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाच्या विकासासाठी पर्यटन मंत्रालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:32 IST

देशभरातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेली १२ शहरे हवाई सेवेने जोडण्याची योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आखली असून, उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडान’ योजनेतील या शहरांतील विमानतळांचा विकास प्राधान्याने करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देचिकलठाणा विमानतळाची निवड : उड्डयन मंत्रालयाशी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेली १२ शहरे हवाई सेवेने जोडण्याची योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आखली असून, उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडान’ योजनेतील या शहरांतील विमानतळांचा विकास प्राधान्याने करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने २०१६ मध्ये विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडाण’ हे धोरण जाहीर केले. यातूनच देशभरातील विविध शहरे हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. यात पर्यटननगरी असलेल्या औरंगाबाद शहराचाही समावेश होता. विविध कंपन्यांची सेवा येथे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचालीही सुरू झालेल्या आहेत. त्यातच केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने ‘बुद्ध सर्किट’ व इतर धार्मिक स्थळे हवाई सेवेने जोडण्याची भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून आग्रा (फतेपूर सिक्री, ताजमहाल), अजिंठा, वेरूळ (औरंगाबाद), कुतुब मीनार, लाल किल्ला (दिल्ली), कोळवा बीच (गोवा), अमेर किल्ला (राजस्थान), सोमनाथ, ढोलवीरा (गुजरात), खजुराहो (मध्यप्रदेश), हम्पी (कर्नाटक), महाबलीपुरम (तामिळनाडू), काजिरंगा (आसाम), कुमाराकोम (केरळ) आणि महाबोधी टेम्पल (बिहार) या स्थळांच्या विमानतळांचा विकास करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने नागरी उड्डयन मंत्रालयाकडे धरला आहे. ही शहरे हवाईसेवेने जोडण्यासह विमानतळांवरील धावपट्टी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पर्यटन मंत्रालयाकडून पाठपुरावा सुरू आहे.पर्यटन मंत्रालयाने काही धार्मिक स्थळांची निवड केली आहे; पण अशा ठिकाणांची यादी दिली गेली तर या ठिकाणांच्या विकासाचा आराखडा तयार करता येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.देशभरातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत काही बैठका झालेल्या आहेत. विकासाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विमानतळांवरील धावपट्टी व गरजेनुसार इतर प्रकारच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. विमान सेवा कंपन्यांनी कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत सेवा सुरू करावी, त्यांना ‘व्हायामिलिटी गॅप फंडिंग’ दिले जाईल.तसेच पर्यटन मंत्रालय पर्यटन वाढावे म्हणून विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘उडाण’ या केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या धोरणानुसार दुसऱ्या फेरीत ३६ विमानतळांवर सेवा सुरू आहे. १३ सेवा देण्याच्या तयारीत, तर २९ विमानतळे लवकरच हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. अशा एकूण ७८ विमानतळांचा समावेश हवाई सेवा जोडण्यात होत आहे, तसेच देशभरातील विविध शहरांतील विमानतळांवर ३१ हेलिपॅडस् हे हेलिकॉप्टरद्वारे कनेक्टेड होणार आहेत.\\\देशभरातील १२ धार्मिक शहरे हवाई सेवेने जोडण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालय आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाºयांची बैठक झाली असून, विकास केल्या जाणाºया विमानतळांमध्ये औरंगाबादचाही समावेश आहे. हवाई सेवा देणाºया कंपन्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल.- डी.जी. साळवे, संचालक, विमानतळ, औरंगाबाद.

टॅग्स :AirportविमानतळAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCentral Governmentकेंद्र सरकार