शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

विमानतळाच्या विकासासाठी पर्यटन मंत्रालय सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:32 IST

देशभरातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेली १२ शहरे हवाई सेवेने जोडण्याची योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आखली असून, उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडान’ योजनेतील या शहरांतील विमानतळांचा विकास प्राधान्याने करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देचिकलठाणा विमानतळाची निवड : उड्डयन मंत्रालयाशी पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशभरातील धार्मिक व पर्यटनस्थळ असलेली १२ शहरे हवाई सेवेने जोडण्याची योजना केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने आखली असून, उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडान’ योजनेतील या शहरांतील विमानतळांचा विकास प्राधान्याने करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले. यात औरंगाबाद विमानतळाचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने २०१६ मध्ये विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्यासाठी उडे देश का आम आदमी अर्थात ‘उडाण’ हे धोरण जाहीर केले. यातूनच देशभरातील विविध शहरे हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. यात पर्यटननगरी असलेल्या औरंगाबाद शहराचाही समावेश होता. विविध कंपन्यांची सेवा येथे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हालचालीही सुरू झालेल्या आहेत. त्यातच केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने पर्यटन वाढीच्या दृष्टीने ‘बुद्ध सर्किट’ व इतर धार्मिक स्थळे हवाई सेवेने जोडण्याची भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून आग्रा (फतेपूर सिक्री, ताजमहाल), अजिंठा, वेरूळ (औरंगाबाद), कुतुब मीनार, लाल किल्ला (दिल्ली), कोळवा बीच (गोवा), अमेर किल्ला (राजस्थान), सोमनाथ, ढोलवीरा (गुजरात), खजुराहो (मध्यप्रदेश), हम्पी (कर्नाटक), महाबलीपुरम (तामिळनाडू), काजिरंगा (आसाम), कुमाराकोम (केरळ) आणि महाबोधी टेम्पल (बिहार) या स्थळांच्या विमानतळांचा विकास करण्याचा आग्रह पर्यटन मंत्रालयाने नागरी उड्डयन मंत्रालयाकडे धरला आहे. ही शहरे हवाईसेवेने जोडण्यासह विमानतळांवरील धावपट्टी व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पर्यटन मंत्रालयाकडून पाठपुरावा सुरू आहे.पर्यटन मंत्रालयाने काही धार्मिक स्थळांची निवड केली आहे; पण अशा ठिकाणांची यादी दिली गेली तर या ठिकाणांच्या विकासाचा आराखडा तयार करता येऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.देशभरातील विविध विमानतळांच्या विकासाबाबत काही बैठका झालेल्या आहेत. विकासाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विमानतळांवरील धावपट्टी व गरजेनुसार इतर प्रकारच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. विमान सेवा कंपन्यांनी कनेक्टिव्हिटी योजनेंतर्गत सेवा सुरू करावी, त्यांना ‘व्हायामिलिटी गॅप फंडिंग’ दिले जाईल.तसेच पर्यटन मंत्रालय पर्यटन वाढावे म्हणून विमान कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ‘उडाण’ या केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या धोरणानुसार दुसऱ्या फेरीत ३६ विमानतळांवर सेवा सुरू आहे. १३ सेवा देण्याच्या तयारीत, तर २९ विमानतळे लवकरच हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. अशा एकूण ७८ विमानतळांचा समावेश हवाई सेवा जोडण्यात होत आहे, तसेच देशभरातील विविध शहरांतील विमानतळांवर ३१ हेलिपॅडस् हे हेलिकॉप्टरद्वारे कनेक्टेड होणार आहेत.\\\देशभरातील १२ धार्मिक शहरे हवाई सेवेने जोडण्यासाठी नागरी उड्डयन मंत्रालय आणि केंद्रीय पर्यटन मंत्रालयातील उच्च पदस्थ अधिकाºयांची बैठक झाली असून, विकास केल्या जाणाºया विमानतळांमध्ये औरंगाबादचाही समावेश आहे. हवाई सेवा देणाºया कंपन्यांनी प्रस्ताव दिल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल.- डी.जी. साळवे, संचालक, विमानतळ, औरंगाबाद.

टॅग्स :AirportविमानतळAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळCentral Governmentकेंद्र सरकार