शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनविरोधात एमआयएमचा बुधवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सरकारने नागरिकांना अक्षरश: मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले. सरकारला त्यांच्या जीवाची किंमतच ...

औरंगाबाद : कोरोना वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सरकारने नागरिकांना अक्षरश: मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले. सरकारला त्यांच्या जीवाची किंमतच नाही. मागील वर्षभरात आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी कधीच प्रयत्न केलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य विभागात तब्बल २ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने का प्रयत्न केले नाहीत. लॉकडाऊन हा पर्याय नाही, जिल्ह्यात मंगळवारपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनविरोधात ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पैठणगेट येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा. इम्तियाज जलील यांनी दिली.

सुभेदारी विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, घाटीत ८६८, मनपा ८३, जि.प. आरोग्य विभाग ३३२, कॅन्सर हॉस्पिटल १२२, कॅन्सर हॉस्पिटलच्या एक्सटेन्शन बिल्डींगसाठी ३६४, घाटीच्या सुपर स्पेशल इमारतीमधील २१९ पदे रिक्त आहेत. २०० बेड हॉस्पिटलचे काम आजपर्यंत सुरू झाले नाही. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने ३० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. त्यासाठी आजपर्यंत जागा मिळालेली नाही. एकीकडे आरोग्यव्यवस्था बळकट करायची नाही आणि दुसरीकडे नागरिकांच्या जीवाची आम्हाला किती काळजी आहे, हे दाखविण्यासाठी लॉकडाऊन लावावे. हा केवळ ढोंग आहे. पश्चिम महाराष्ट्रात औरंगाबादच्या तुलनेत जास्त रुग्ण सापडत आहेत. मात्र, तेथे आरोग्य व्यवस्था बळकट आहे. त्यामुळे तेथे लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तेथे कोरोना का नाही, असा प्रश्न मलाही पडतो. लॉकडाऊनमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे, त्या व्यापाऱ्यांचे किमान भाडे तरी शासनाने द्यावे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात एका बेडवर तीन ते चार रुग्ण उपचार घेत आहेत. या परिस्थितीला बळकट आरोग्यव्यवस्था म्हणावी का? मराठवाड्याचे दोन मंत्री आरोग्य विभागाला लाभले आहेत. तरीही परिस्थितीत किंचितही सुधारणा नाही. या सर्व परिस्थितीच्या विरोधात ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी आपल्यावर कारवाई केली तरी चालेल असे शेवटी खा. जलील यांनी नमूद केले.