शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनविरोधात एमआयएमचा बुधवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सरकारने नागरिकांना अक्षरश: मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले. सरकारला त्यांच्या जीवाची किंमतच ...

औरंगाबाद : कोरोना वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सरकारने नागरिकांना अक्षरश: मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले. सरकारला त्यांच्या जीवाची किंमतच नाही. मागील वर्षभरात आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी कधीच प्रयत्न केलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य विभागात तब्बल २ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने का प्रयत्न केले नाहीत. लॉकडाऊन हा पर्याय नाही, जिल्ह्यात मंगळवारपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनविरोधात ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पैठणगेट येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा. इम्तियाज जलील यांनी दिली.

सुभेदारी विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, घाटीत ८६८, मनपा ८३, जि.प. आरोग्य विभाग ३३२, कॅन्सर हॉस्पिटल १२२, कॅन्सर हॉस्पिटलच्या एक्सटेन्शन बिल्डींगसाठी ३६४, घाटीच्या सुपर स्पेशल इमारतीमधील २१९ पदे रिक्त आहेत. २०० बेड हॉस्पिटलचे काम आजपर्यंत सुरू झाले नाही. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने ३० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. त्यासाठी आजपर्यंत जागा मिळालेली नाही. एकीकडे आरोग्यव्यवस्था बळकट करायची नाही आणि दुसरीकडे नागरिकांच्या जीवाची आम्हाला किती काळजी आहे, हे दाखविण्यासाठी लॉकडाऊन लावावे. हा केवळ ढोंग आहे. पश्चिम महाराष्ट्रात औरंगाबादच्या तुलनेत जास्त रुग्ण सापडत आहेत. मात्र, तेथे आरोग्य व्यवस्था बळकट आहे. त्यामुळे तेथे लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तेथे कोरोना का नाही, असा प्रश्न मलाही पडतो. लॉकडाऊनमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे, त्या व्यापाऱ्यांचे किमान भाडे तरी शासनाने द्यावे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात एका बेडवर तीन ते चार रुग्ण उपचार घेत आहेत. या परिस्थितीला बळकट आरोग्यव्यवस्था म्हणावी का? मराठवाड्याचे दोन मंत्री आरोग्य विभागाला लाभले आहेत. तरीही परिस्थितीत किंचितही सुधारणा नाही. या सर्व परिस्थितीच्या विरोधात ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी आपल्यावर कारवाई केली तरी चालेल असे शेवटी खा. जलील यांनी नमूद केले.