शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

लॉकडाऊनविरोधात एमआयएमचा बुधवारी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोना वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सरकारने नागरिकांना अक्षरश: मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले. सरकारला त्यांच्या जीवाची किंमतच ...

औरंगाबाद : कोरोना वाढत आहे, ही वस्तुस्थिती आहे. सरकारने नागरिकांना अक्षरश: मरण्यासाठी वाऱ्यावर सोडून दिले. सरकारला त्यांच्या जीवाची किंमतच नाही. मागील वर्षभरात आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी कधीच प्रयत्न केलेला नाही. औरंगाबाद जिल्ह्यात आरोग्य विभागात तब्बल २ हजार पदे रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारने का प्रयत्न केले नाहीत. लॉकडाऊन हा पर्याय नाही, जिल्ह्यात मंगळवारपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनविरोधात ३१ मार्च रोजी दुपारी ३ वाजता पैठणगेट येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खा. इम्तियाज जलील यांनी दिली.

सुभेदारी विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, घाटीत ८६८, मनपा ८३, जि.प. आरोग्य विभाग ३३२, कॅन्सर हॉस्पिटल १२२, कॅन्सर हॉस्पिटलच्या एक्सटेन्शन बिल्डींगसाठी ३६४, घाटीच्या सुपर स्पेशल इमारतीमधील २१९ पदे रिक्त आहेत. २०० बेड हॉस्पिटलचे काम आजपर्यंत सुरू झाले नाही. केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने ३० खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. त्यासाठी आजपर्यंत जागा मिळालेली नाही. एकीकडे आरोग्यव्यवस्था बळकट करायची नाही आणि दुसरीकडे नागरिकांच्या जीवाची आम्हाला किती काळजी आहे, हे दाखविण्यासाठी लॉकडाऊन लावावे. हा केवळ ढोंग आहे. पश्चिम महाराष्ट्रात औरंगाबादच्या तुलनेत जास्त रुग्ण सापडत आहेत. मात्र, तेथे आरोग्य व्यवस्था बळकट आहे. त्यामुळे तेथे लॉकडाऊन लावण्यासारखी परिस्थिती नाही. ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत तेथे कोरोना का नाही, असा प्रश्न मलाही पडतो. लॉकडाऊनमध्ये ज्या व्यापाऱ्यांचे नुकसान होणार आहे, त्या व्यापाऱ्यांचे किमान भाडे तरी शासनाने द्यावे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात एका बेडवर तीन ते चार रुग्ण उपचार घेत आहेत. या परिस्थितीला बळकट आरोग्यव्यवस्था म्हणावी का? मराठवाड्याचे दोन मंत्री आरोग्य विभागाला लाभले आहेत. तरीही परिस्थितीत किंचितही सुधारणा नाही. या सर्व परिस्थितीच्या विरोधात ३१ मार्च रोजी दुपारी तीन वाजता पैठणगेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी आपल्यावर कारवाई केली तरी चालेल असे शेवटी खा. जलील यांनी नमूद केले.