शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमचा मार्ग स्वतंत्र!

By admin | Updated: November 16, 2014 00:09 IST

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत.

औरंगाबाद : मजलीस- ए- इत्तेहाद- ए- मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पार्टी राजकारणातील दोन वेगवेगळी टोके आहेत. ती एकत्र कधीच येऊ शकत नाहीत. महाराष्ट्र विधानसभेत आम्ही कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, देणारही नाही. आमचा मार्ग वेगळा असल्याचे प्रतिपादन खा. असदोद्दीन ओवेसी यांनी केले.आमखास मैदानावर भर पावसात आयोजित सभेस आ. इम्तियाज जलील, डॉ. गफ्फार कादरी, माजी मंत्री गंगाधर गाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्र विधानसभेत ज्या पद्धतीने विश्वासमत पारित केले ते खूपच हास्यास्पद होते. आम्ही काँग्रेस- राष्ट्रवादीला पाठिंबा देणार नाही. काँग्रेसने तेलंगणच्या मुद्यावर काय केले. मोक्का कायदा त्यांनीच पारित केला. राष्ट्रवादीचे नेते आता मोदींच्या सुरात सूर मिळवीत आहेत. हे सर्व राजकारण अत्यंत खालच्या पातळीवरचे असल्याचे त्यांनी आपल्या शैलीत नमूद केले.वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या धनाढ्य मंडळींनी बळकावल्या आहेत, त्या परत घेण्यात येतील. त्यासाठी पक्षाचे आमदार विधानसभेत आवाज बुलंद करतील. वेरूळ येथे शस्त्रसाठा पकडल्यानंतर ज्या निष्पाप तरुणांना नऊ वर्षांपासून तुरुंगात ठेवण्यात आले, त्यांचा निकाल लवकरात लवकर लावावा. एटीएसने औरंगाबादच्या नईमला कोठे ठेवले, या सर्व प्रश्नांची उत्तरे विधानसभेत सरकारला विचारण्यात येतील. औरंगाबाद शहराला पुन्हा ऐतिहासिक दर्जा मिळवून देण्यात येईल, असेही ओवेसी यांनी सांगितले. तत्पूर्वी, आ. इम्तियाज जलील यांचे भाषण झाले. या जाहीर सभेत काही अपक्ष, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी प्रवेश केला. आज सकाळी खा. ओवेसी यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथे भेट दिली. त्यानंतर त्यांनी आ. इम्तियाज जलील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.