शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

नोटीस द्यायची लाखांची; दंड भरायचा हजारांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:05 IST

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांना मंगळवारी रात्री रक्कम घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर वाळू वाहतूक प्रकरणातील ...

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील अप्पर तहसीलदार किशोर देशमुख यांना मंगळवारी रात्री रक्कम घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर वाळू वाहतूक प्रकरणातील अनेक बाबी हळूहळू समोर येऊ लागल्या आहेत. वाळूचे वाहन जप्त करायचे आणि पाचपट दंडाची नोटीस देऊन नंतर काही लाखांमध्ये सेटिंग करण्याचा प्रकार सर्रासपणे चालण्याची अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.

मागील एक दीड वर्षांत वारंवार याबाबत तक्रारी आल्या, परंतु वरिष्ठांनीदेखील या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही. परिणामी अप्पर तहसील कार्यालय कायम वादात राहिले.

२०१८ ते २०२० या काळातील ७० अधिक प्रकरणांत ६ कोटी १९ लाख १६ हजार रुपयांच्या नोटिसा अवैध वाळू वाहतूक, गौणखनिज उत्खनन करणाऱ्यांना देण्यात आल्या. त्यांची वाहने जप्त करून त्यांच्यावर पाचपट दंडात्मक कारवाईच्या आनुषंगाने नोटिसा दिल्या. नोटिसांमध्ये पाचपट दंड लावल्यानंतर शासनाच्या तिजोरीत फक्त १ कोटी २५ लाख ४० हजार रुपयांची रक्कम दंडापोटी जमा झाली. उर्वरित ४ कोटी ८३ लाख ७७ हजार रुपयांची रक्कम वाटाघाटीत कमी केल्याचे सांगण्यात आले. मुळात ही रक्कम शासनाच्या तिजोरीत का गेली नाही, वाटाघाटीच्या नावाने कुणी हडपली? असा प्रश्न आहे.

वाहन जप्त केल्यानंतर होते सेटिंग

वाळूचे वाहन जप्त करायचे, त्यानंतर ते तहसील कार्यालयात किंवा पोलीस ठाण्यात आणायचे. त्यातील एकूण वाळू किती ब्रास आहे. त्यावर पाचपट दंड आकारून, रॉयल्टी आणि वाहनाचा दंड मिळून सबंधितास नोटीस दिली जाते. महसूल अधिनियमातील कलम ४८ (७) नुसार ही नोटीस दिली जाते. नोटीसवर सुनावणी होऊन दंडाची रक्कम कोषागारमधील बँक शाखेत जमा केली जाते. तत्पूर्वी नोटीस जर पाच लाखांची असेल, तर एक लाखांचे चालान भरण्यास सांगितले जाते. त्यानंतर सेटिंग करून उर्वरित रक्कम घ्यायची आणि वाहन सोडायचे, असा प्रकार सर्वश्रृत आहे.