शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

निधी नसताना वाटली कोट्यवधीच्या कामाची पत्रे

By admin | Updated: September 11, 2014 01:06 IST

उस्मानाबाद : गैरव्यवहारामुळे तेरणा सहकारी साखर कारखाना बंद पाडला. याप्रकरणी दाद मागणाऱ्या सभासद, शेतकऱ्यांची सातत्याने चुकीची माहिती देऊन

उस्मानाबाद : गैरव्यवहारामुळे तेरणा सहकारी साखर कारखाना बंद पाडला. याप्रकरणी दाद मागणाऱ्या सभासद, शेतकऱ्यांची सातत्याने चुकीची माहिती देऊन आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिशाभूल केल्याचा आरोप करीत, आता आमदार फंडाच्या माध्यमातूनही राजेनिंबाळकरांनी सर्वसामान्य जनतेचीही दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख यांनी केला आहे. अनेक कामे होणार नाहीत हे माहित असतानाही १ कोटी ४० लाख इतक्या रकमेच्या कामाची जाणिवपूर्वक अतिरिक्त पत्रे देऊन निंबाळकरांनी या मतदारसंघातील जनतेची फसवणूक केली असे देशमुख यांचे म्हणणे आहे. देशमुख यांनी या निवेदनात म्हटले आहे की, मराठवाड्यातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या तेरणा कारखान्याची निंबाळकर यांच्याच मार्गदर्शनाखाली दूरवस्था झाली. कारखान्यातील कोट्यावधीचे साहित्य भंगाराच्या नावाखाली विकण्यात आले आहे. याबाबत उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकरी सभासदांची फसवणूक करण्याचे काम झाले आहे. असाच प्रकार मार्केटींग फेडरेशनकडे थकित असलेल्या शेतकऱ्यांच्या हरभरा आणि तुरीच्या थकीत रक्कमाबाबतही झाला होता. त्यावेळी पैसे संबंधित कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर आंदोलनाचा स्टंट करून आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांचे पैसे मिळवून देण्याऐवजी प्राधान्यक्रम डावलून स्वत:सह मागे-पुढे फिरणाऱ्या काही कार्यकर्त्यांचे पैसे काढून घेतले. आता आमदार फंडात निधी शिल्लक नसताना १ कोटी ४० लाख इतक्या रक्कमेच्या अतिरिक्त कामाची पत्रे देऊन आ. निंबाळकर यांनी सर्वसामान्यांची दिशाभूल केली आहे.देशमुख यांच्या म्हणण्यानुसार, निंबाळकर यांना २०१४-१५ या वर्षासाठी दोनशे लाखांचा निधी मंजूर आहे. मात्र २०१३-१४ या वर्षातील अपूर्ण कामासाठी त्यांना ७२.१९ लाखाचा निधी आवश्यक होता. त्यामुळे २०१४-१५ यासाठी त्यांच्याकडे केवळ १२७.८०४ लाख रुपयांचीच नवीन कामे प्रस्तावित करण्यासाठी निधी उपलब्ध होता. असे असताना १८ मे २०१४ ते २३ आॅगस्ट २०१४ या कालावधीत आ. ओम राजेनिंबाळकर यांनी उस्मानाबाद, कळंब तालुक्यात ८१ कामे प्रस्तावित केली आहेत. या कामांची अंदाजे किंमत २६८.०५ लाख इतकी होते. म्हणजेच आ. ओम राजेनिंबाळकर यांच्याकडे मतदारसंघातील कामासाठी १४०.०५ लाखाचा निधी उपलब्ध असताना, त्यांनी दुपटीपेक्षा जास्त म्हणजे २६८.०५ लाखाची कामे प्रस्तावित करून अनेक गावातील ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. ही एकप्रकारे जनतेची तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांची दिशाभूल तसेच फसवणूक असल्याचे सांगत याप्रकरणी निधी नसताना लाखो रुपयांच्या कामाची अतिरिक्त पत्रे दिलेल्या ग्रामस्थांची निंबाळकर यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही सुरेश देशमुख यांनी या प्रसिध्दीपत्रकात केली आहे. (प्रतिनिधी)आमदाराने त्याचा निधी त्याच वर्षामध्ये खर्च करणे अपेक्षित आहे. जनता आमच्याकडे कामे घेवून आल्यानंतर आम्ही त्यांना पत्र देतो. परंतु, अनेकवेळा संबंधितांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळत नाही. अशावेळी निधी पडून रहाण्यापेक्षा लागलीच दुसरे पत्र दिले जाते. जनतेला जी आश्वासने दिली, ती मी पूर्ण केली आहेत. एखाद्याला पत्र दिले आणि काम झाले नाही, असा एकतरी व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसने उभा करून दाखवावा, असे आव्हान आ. ओम राजे यांनी दिले. प्रस्तावामध्ये त्रुटी असतील आणि त्याला जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळाली नसेल तर त्यात माझी चूक काय? असा सवाल करीत आलेला निधी ज्या-त्या वर्षातच खर्च व्हावा, असा माझा कटाक्ष राहिला आहे. त्यामुळेच माझ्या फंडातील एक रूपयाही अखर्चित रहात नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेची कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी खरे कोणाचे आणि खोटे कोणाचे? हे जनतेला चांगले ठावूक आहे, असेही ते म्हणाले.