प्रताप नलावडे , बीडदूधाचा सतत घसरणारा भाव आणि त्या मुळे बसणारा फटका यावर बीड जिल्ह्यातील डोंगरपट्यातील गावांनी नामी युक्ती शोधली असून बाजारात दूधाऐवजी दही विक्री करत त्यांनी आपले उत्पन्न दुप्पट केले आहे. बीड तालुक्यातील डोंगरपट्यातील सुमारे एक हजार शेतकरी सध्या या दही विक्रीच्या व्यवसायात गुंतले आहेत.बीड शहरात दररोज हे शेतकरी सकाळी दही घेऊन येतात आणि दुपारी पुन्हा आपल्या गावी परतात. दररोज शहरात डोंगरपट्टा भागातील २२ गावामधून १५ हजार लिटर दही येते. प्रत्येक दही विकणाऱ्या शेतकऱ्याचा दही विक्री करण्यासाठीचा शहरातील भाग ठरलेला आहे. शिवाय हॉटेलसाठीही हे शेतकरी दही देतात.दूधाचे भाव घसरले म्हणून केवळ रडत बसण्यापेक्षा दूधापासून आपले उत्पन्न वाढविण्यासाठीचा या शेतकऱ्यांनी केलेला हा प्रयोेग इतरांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. दूध विक्री करूनही उत्पादन खर्च आणि येणारे उत्पन्न याचा मेळ बसत नसल्याचे पाहून बीड तालुक्यातील मांडव जाळी, पिंपळवाडी, भाळवणी, नागझरी, बेलखंडी, चऱ्हाटा, या गावातील शेतकऱ्यांनी थेट दूध विकण्यापेक्षा घरच्या घरीच दूधापासून दही तयार करून त्याची विक्री करण्याचा फंडा उपयोगात आणला.साधारणपणे १० लिटर दूधाची विक्री केल्यानंतर हातात दररोज ४०० रूपये येतात. जनावरांची देखभाल आणि चाऱ्यासाठी होणारा खर्च आणि दूधापासून मिळणारे उत्पन्न याचा मेळही बसणे यामुळे कठिण होत होते. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी दूधापासून दही करणे, दह्यावर जमा होणाऱ्या सायीपासून तूप करणे आणि तूप तयार करताना तयार होणारे ताक याची विक्री करत हे उत्पन्न चक्क दुप्पट केले. दही तयार करण्यासाठी कसलाही खर्च येत नाही. घरच्या घरीच ही प्रक्रिया करता येते. साधारण १० लिटर दूधापासून १० लिटर दही तयार होते. एक किलो तूप आणि चार लिटर ताक तयार होते. दही ३० रूपये लिटरने बाजारात विक्री होते. एक किलो तुपाचे ५०० रूपये आणि ताकाचे एका लिटरला २० रूपये मिळतात. हा सगळा हिशोब पाहिला तर त्याच १० लिटर दह्याचे ८०० रूपये शेतकऱ्यांच्या हाती पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळातही चार पैसे मिळू लागले आहेत. बीड शहर परिसरातील डोंगर पट्ट्यातील शेतकरी दुधासोबत दह्याचा व्यवसाय करू लागले आहेत.४दूध उत्पादनाचा खर्च व मिळणारे उत्पन्न पाहता हिशेब जुळत नाही. त्यामुळे शेतकरी दुधावर प्रक्रिया करून दही विकणे पसंत करू लागले आहेत.४एकट्या बीडमध्ये तब्बल १५ हजार लीटर दही रोज येते.४याची उलाढाल लाखोंच्या घरात जाते.४हॉटेल व्यावसायिक व घरगुती ग्राहकांना ग्रामीण भागातील दह्याने भुरळ घातली आहे. उन्हाळा सुरू झाल्याने मागणी वाढली आहे.हातात चार पैसे उरतातदूधापासून दही विक्री करण्यामुळे आमचे नेहमीचे उत्पन्न दुप्पट झाले आहे. त्यामुळे किमान चार पैसे तरी आमच्या हातात उरतात. आता आम्हाला दूधाचा भाव कमी झाला काय आणि वाढला काय, त्याचे काहीच वाटत नाही. विक्रीसाठी थोडा वेळ द्यावा लागतो. परंतु आर्थिक आवकही वाढली आहे.- नानासाहेब शिंदे, शेतकरी, नागझरी
दुधाला दही भारी
By admin | Updated: February 8, 2015 00:12 IST