शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर

By admin | Updated: July 2, 2014 00:18 IST

नितीन कांबळे , कडा आष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

नितीन कांबळे , कडाआष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. परिणामी तालुक्यातील वीस पेक्षा अधिक गावातील नागरिकांनी शेत वस्तीवर स्थलांतर केले आहे. तालुक्यातील १२२ ग्रामपंचायत अंतर्गत १७७ गावे व ३५० वाड्या- वस्त्यांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्याही आष्टी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. यामुळे शासनाच्यावतीने ८४ खाजगी व बारा शासकीय टँकरद्वारे जवळपास २ लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. असे असले तरी ग्रामस्थांची तहान भागत नसल्याने व गेल्या आठ दिवसात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने वीस गावातील ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. तालुक्यातील आष्टी, शेकापूर, टाकळसिंग, वाळूंज, खडखत, पारगाव, बावी, कापशी, हातोला, पाटसरा, डोईठाण, घाटापिंप्री, गंगादेवी, वेलतुरी, शेडाळा, कारखेल, गौखेल, दौलावडगाव, सावरगाव, कडा, धानोरा, देवकाळी, शिरापूर, मेहकरी, केरूळ, खिळद, पाटण, सांगवी, मंगरूळ अशा वीस पेक्षा अधिक गावातील ग्रामस्थांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने व पाण्यासाठी भटकंती करूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी शेतवस्तीवर स्थलांतर केले आहे. आष्टी, कडा या शहरासह ग्रामीण भागात अनेक शासकीय नोकरदार वास्तव्यास आहेत. त्यांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसात विकत पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यामुळे अनेक नोकरदार कुटुंबियांनी अहमदनगर शहरात स्थलांतर केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गाव, वाडी, वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी हे पाणी आता कमी पडू लागले आहे. पाऊसच न पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यामुळे काही शेतकरी कुटुंबियांनी जनावरांसह स्थलांतर केले आहे. तर काहींनी आपली जनावरे पाहुण्यांकडे सांभाळण्यासाठी दिले आहेत. विद्यार्थ्यांचीही भटकंतीतालुक्यात जि.प.च्या २७२ तर माध्यमिक ८ आणि खाजगी ५८ शाळा आहेत. यातील १५२ शाळांमध्ये कुपनलिका आहेत. उर्वरित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इतरत्र पाण्याची सोय करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात मात्र शाळेतही पाणीपुरवठा होत नसल्याने व कुपनलिका कोरड्या पडल्याने विद्यार्थ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. आष्टी तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उद्धव सानप यांना विचारणा केली असता ते म्हणाले, पाणीटंचाई असणाऱ्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी मागणी असेल तेथे टँकरने पाणीपुरवठा करू.