शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईमुळे त्रस्त ग्रामस्थांचे स्थलांतर

By admin | Updated: July 2, 2014 00:18 IST

नितीन कांबळे , कडा आष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

नितीन कांबळे , कडाआष्टी तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या आहेत. यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. परिणामी तालुक्यातील वीस पेक्षा अधिक गावातील नागरिकांनी शेत वस्तीवर स्थलांतर केले आहे. तालुक्यातील १२२ ग्रामपंचायत अंतर्गत १७७ गावे व ३५० वाड्या- वस्त्यांना दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. सध्याही आष्टी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई आहे. यामुळे शासनाच्यावतीने ८४ खाजगी व बारा शासकीय टँकरद्वारे जवळपास २ लाख नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. असे असले तरी ग्रामस्थांची तहान भागत नसल्याने व गेल्या आठ दिवसात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याने वीस गावातील ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. तालुक्यातील आष्टी, शेकापूर, टाकळसिंग, वाळूंज, खडखत, पारगाव, बावी, कापशी, हातोला, पाटसरा, डोईठाण, घाटापिंप्री, गंगादेवी, वेलतुरी, शेडाळा, कारखेल, गौखेल, दौलावडगाव, सावरगाव, कडा, धानोरा, देवकाळी, शिरापूर, मेहकरी, केरूळ, खिळद, पाटण, सांगवी, मंगरूळ अशा वीस पेक्षा अधिक गावातील ग्रामस्थांनी आपल्या सोयीच्या ठिकाणी स्थलांतर केले आहे. गावात तीव्र पाणीटंचाई असल्याने व पाण्यासाठी भटकंती करूनही पाणीप्रश्न सुटत नसल्याने ग्रामस्थांनी शेतवस्तीवर स्थलांतर केले आहे. आष्टी, कडा या शहरासह ग्रामीण भागात अनेक शासकीय नोकरदार वास्तव्यास आहेत. त्यांनाही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही दिवसात विकत पाणी मिळणेही दुरापास्त झाले आहे. यामुळे अनेक नोकरदार कुटुंबियांनी अहमदनगर शहरात स्थलांतर केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील अनेक गाव, वाडी, वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी हे पाणी आता कमी पडू लागले आहे. पाऊसच न पडल्याने जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. यामुळे काही शेतकरी कुटुंबियांनी जनावरांसह स्थलांतर केले आहे. तर काहींनी आपली जनावरे पाहुण्यांकडे सांभाळण्यासाठी दिले आहेत. विद्यार्थ्यांचीही भटकंतीतालुक्यात जि.प.च्या २७२ तर माध्यमिक ८ आणि खाजगी ५८ शाळा आहेत. यातील १५२ शाळांमध्ये कुपनलिका आहेत. उर्वरित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इतरत्र पाण्याची सोय करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात मात्र शाळेतही पाणीपुरवठा होत नसल्याने व कुपनलिका कोरड्या पडल्याने विद्यार्थ्यांवर भटकंतीची वेळ आली आहे. आष्टी तालुक्यातील पाणीटंचाई संदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उद्धव सानप यांना विचारणा केली असता ते म्हणाले, पाणीटंचाई असणाऱ्या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. आणखी मागणी असेल तेथे टँकरने पाणीपुरवठा करू.