शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

नसबंदी शस्त्रक्रियेकडे पुरुषांचा कानाडोळा

By admin | Updated: July 5, 2014 00:40 IST

उस्मानाबाद : महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेपेक्षा पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आणि कमी वेळ खाणारी आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना शासनाकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत.

उस्मानाबाद : महिला कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेपेक्षा पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आणि कमी वेळ खाणारी आहे. त्यामुळे ही शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांना शासनाकडून विविध सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु, जिल्हा परिषदचा आरोग्य विभागाकडून याबाबतीत अपेक्षित जनजागृती केली जात नसल्याने की काय, नसबंदी करून घेणाऱ्या पुरूषांची संख्या वर्षागणिक खालावू लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही संख्या तिपटीने घसरली आहे. देशाची लोकसंख्या प्रचंड गतीने वाढू लागली आहे. या गतीला काही प्रमाणात का होईना; ‘ब्रेक’ लागावा या उद्देशाने शासनाकडून कुटुंब कल्याण कार्यक्रमावर भर दिला जात आहे. हा कार्यक्रमा आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या महिलांसाठी वेगवेगळ्या सुविधा व आर्थिक मदतही दिली जात आहे. यासोबतच मागील काही वर्षांपासून पुरूष नसबंदी शस्त्रक्रियांवर भर दिला जात आहे. जनजागृतीसाठी शासन मोठ्या प्रमाणात खर्च करीत आहे. परंतु, स्थानिक आरोग्य विभागाकडून शासनाच्या या उद्देशाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया अत्यंत सोपी आणि वेळखाऊही नाही. असे असतानाही केवळ तळागाळातील जनतेपर्यंत जनजागृती होत नसल्याने आणि शस्त्रक्रियेबाबत लोकांच्या मनातील गैरसमज काढून टाकण्यात आरोग्य विभाग कमी पडल्याने नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढण्याऐवजी झपाट्याने खाली येऊ लागले आहे.जिल्हा परिषद आरोग्य विभागाला सन २०१२-२०१३ या आर्थिक वर्षामध्ये शासनाने ४५० पुरूष नसबंदी शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले होते. यावेळी जवळपास १९ शस्त्रक्रिया झाल्या होत्या. २०१३-२०१४ मध्येही शासनाने साडेचारशे शस्त्रक्रियांचेच उद्दिष्ट दिले होते. गावोगावी जाऊन लोकांमध्ये जनजागृती करून शस्त्रक्रियांची संख्या वाढविण्याबाबत शासनाने आरोग्य विभागाला वारंवार कळविले होते. परंतु, जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा काहीच परिणाम झाला नसल्याचे शस्त्रक्रियांच्या आकडेवारीवरून समोर येत आहे. शस्त्रक्रियांची संख्या वाढण्याऐवजी तिपटीने घसरील आहे. साडेचारशेपैकी केवळ ५ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद प्रशासनाच्या दप्तरी आहे. आरोग्य विभागाची ही चिंताजनक कामगिरी पाहून शासनाने यंदा जवळपास शंभरने उद्दिष्ट कमी केले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग यंदा तरी मरगळ झटकणार का? असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. (प्रतिनिधी)