शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

मध्ययुगीन इतिहासाचे पुनर्लेखन करण्यात यावे - जितेंद्र आव्हाड

By admin | Updated: August 22, 2015 23:55 IST

जालना : इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याने खरा इतिहास महाराष्ट्राला कळला नाही. म्हणूनच १६३० ते १६८० या काळातील इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे,

जालना : इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आल्याने खरा इतिहास महाराष्ट्राला कळला नाही. म्हणूनच १६३० ते १६८० या काळातील इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी येथे केली. यावेळी फडणवीस सरकारने बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचा निषेध करण्यात आला. संभाजी ब्रिगेड, सत्यशोधक समाज, रिपाइंसह विविध शिवपे्रमी संघटनांनी आयोजित केलेल्या शिवसन्मान जागर परिषदेत ते बोलत होते. विचारपीठावर इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, सत्यशोधक अभ्यासिका प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. सय्यद महेबूब, सत्यशोधक समाजाचे कॉ. अण्णा सावंत, संभाजी ब्रिगेडचे संतोष गाजरे, रिपाइंचे ब्रम्हानंद चव्हाण, किशोर चव्हाण, संतोष जेधे, राजेश राऊत, भरत मानकर, मिर्झा अन्वर बेग, फेरोज अली मौलाना, संजय देठे आदी उपस्थित होते. आव्हाड म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांच्या राजा शिवछत्रपती या पुस्तकातून केवळ वर्ण व जातीद्वेष पसरविण्याचे काम करण्यात आले. अशा विकृत लिखानाला महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आल्याने या लिखानालाच राजमान्यता मिळाली आहे. हा लोकभावनेचा अनादर असून, देवेंद्र फडणवीस हे मुसोलिनी आणि हिटलर असल्याची टीका त्यांनी केली. जो माणूस व्यवस्थेच्या विरोधात जाऊन कार्य करतो तोच इतिहास निर्माण करतो. मात्र, पुरंदरे यांनी बुद्धीप्रामाण्यवादी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य केवळ हिंदु धर्मापुरते मर्यादित ठेवले. हिंदु आणि मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. फडणवीस सरकारने राज्यातील मराठी माणसांची घोर फसवणूक केल्याचा आरोप करीत महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याचा निषेध करुन राज्यातील प्रत्येक घरात विचारांची मशाल पेटविण्याचा निर्धार आव्हाड यांनी यावेळी केला. या प्रसंगी प्रा. प्रतिमा परदेशी, श्रीमंत कोकाटे यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेला जवळपास ६०० शिवपे्रमी उपस्थित होते. परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (प्रतिनिधी) बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हाच संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी याला विरोध केला होता. यापूर्वी ब्राम्हण समाजातील अनेक व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना आम्ही विरोध केला नाही. कारण आमचा विरोध कुठल्याही जातीला नसून, विकृत लिखानाला आहे. मात्र, पुरस्कार वितरणाच्या दोन दिवस अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुपारी दिली अन् राज यांनी पुरस्काराचा वाद पेटवत मराठाविरुद्ध ब्राम्हण असे पद्धतशीरपणे जातीद्वेषाचे राजकारण केल्याची टीका आव्हाड यांनी केली. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत जनाधार संपल्याने राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या निमित्ताने जातीद्वेषाला खतपाणी घातल्याचा घणाघाती आरोप आ. आव्हाड यांनी यावेळी केला. परिषदेचे आयोजन कार्यालयातजालना पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव परिषदेला परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांच्या या भूमिकेने नगर परिषद प्रशासनानेही मा. फुलंब्रीकर नाट्यगृहाची परवानगी नाकारली. अखेर संभाजी ब्रिगेड व सत्यशोधक समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी ही परिषद भाग्यनगरमधील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात घेतली. पोलीस अधीक्षकांवर आव्हाडांची टीकाशिवसन्मान परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने हा विचार स्वातंत्र्यावरील घाला असल्याचे सांगून पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग यांच्या कार्यपद्धतीवर आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी टीका केली.