शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
2
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
3
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
4
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
5
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
6
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
7
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
8
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
9
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
10
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
11
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
12
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
13
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
14
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
15
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
16
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
17
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
18
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
19
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
20
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

बेकायदेशीर वसतिगृहात सुमार व्यवस्था, निकृष्ट जेवण आणि मुलांचा छळ

By admin | Updated: August 26, 2016 00:52 IST

प्रताप नलावडे, बीड ग्रामीण भागातून आलेल्या मुलांसाठी राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करणारे जवळपास ८० खासगी वसतीगृहे शहरात असून यापैकी ५० पेक्षाही अधिक वसतीगृहे

प्रताप नलावडे, बीडग्रामीण भागातून आलेल्या मुलांसाठी राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था करणारे जवळपास ८० खासगी वसतीगृहे शहरात असून यापैकी ५० पेक्षाही अधिक वसतीगृहे बेकायदेशीरपणे चालविले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वसतीगृहाच्या नावावर चालणारा हा गोरख धंदा चालविणाऱ्यापैकी अनेकजण शिक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. साईड बिझनेस म्हणून चालणाऱ्या या धंद्यातून मुले सांभाळण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचा वेगळा फंडा काही शिक्षकांकडूनच चालविला जात आहे.वडापाव खाल्ला म्हणून आदित्य राठोड या मुलाला वसतीगृह चालविणाऱ्या दिलीप जोगदंड या शिक्षकाने अमानुष मारहाण केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर आता शहरातील बेकायदेशीर चालणाऱ्या वसतीगृहेही चर्चेत आली आहेत. शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या काही शिक्षकांनी वसतीगृहाचा धंदाच सुरू केला आहे.एका इमारतीत सामाजिक कार्याच्या गोंडस नावाखाली वसतीगृह सुरू करायचे आणि ग्रामीण भागातील मुलांना याठिकाणी प्रत्येकी तीस ते पस्तीस हजार रूपये वार्षिक शुल्क आकारून त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करायची. एका इमारतीत दहा ते पंधरा दहा बाय दहाच्या खोल्या आणि एका खोलीत दहा ते बाराजणांची व्यवस्था, असे काहीसे या सगळ्याच वसतीगृहांचे स्वरूप आहे. वसतीगृह सुरू करताना कोणतीही परवानगी घेतली जात नाही.धर्मादाय आयुक्तांकडे रितसर नोंद असणे किंवा किमान शॉप अ‍ॅक्टचे आणि त्याच ठिकाणी जेवणाची व्यवस्था असल्याने फुड लायसेन्स तरी असणे आवश्यक आहे. परंतु असे कोणतेच सोपस्कार पूर्ण न करता ही वसतीगृहे बिनदिक्तपणे सुरू आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या शाळकरी मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नच ऐरणीवर आला आहे.शहरातील धानोरा रोड, शिवाजी नगर, अंबिका नगर, स्वराज्य नगर, पंचशील नगर, नाट्यगृह परिसर, राजीव गांधी चौक या परिसरात अनेक खासगी आणि बेकायदेशीर वसतीगृहे चालविली जात आहेत.ज्या शाळेतील शिक्षक वसतीगृह चालवितात, त्यांच्याच शाळेतील मुले याठिकाणी राहतात. जोगदंड चालवित असलेल्या वसतीगृहात ते आदर्श शाळेत शिक्षक असल्याने त्याच शाळेतील मुले मोठ्या प्रमाणात राहतात.एका मुलासाठी आपण वीस हजार रूपये घेतो, असे सांगत जोगदंड आपल्याकडे ४० मुले असून सामाजिक कार्य म्हणून आपण हे वसतीगृह चालवितो असे सांगतात. परंतु यासाठी कोणकोणत्या परवानगी त्यांच्याकडे आहेत, असे विचारले तर सामाजिक कामाला परवानगी कशाला, असे विचारतात. ते ज्या शाळेत शिकवतात त्या आदर्श शाळेचीही त्यानी परवानगी घेतलेली नाही.