शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

लातुरात मातंग समाजाचा महामोर्चा

By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST

लातूर : काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी संस्थाचालकासह संबंधित आरोपींना कडक शासन करावे,

लातूर : काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी संस्थाचालकासह संबंधित आरोपींना कडक शासन करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात मातंग समाजातील विविध संघटनांसह आंबेडकरी संघटना सहभागी झाल्या होत्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून शुक्रवारी सकाळी ११ वाजता महामोर्चा निघाला. मोर्चात महिला कार्यकर्त्या तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेतील एका अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी बलात्कार केला होता. या अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला. याला संस्थाचालकही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात यावी, अशी मागणी महामोर्चाच्या वतीने करण्यात आली. खून करणाऱ्या गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा करावी, सानेगुरुजी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, शाळेतील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाने संगनमताने बलात्कार करून खून केला, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला. हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे. पीडित मुलीच्या पालकास २५ लाखांचा मदत निधी देण्यात यावा, मुलीच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे, अनुदानित सर्व निवासी आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये होणारे शोषण थांबवून महिला अधीक्षकांच्या नेमणुका करण्यात याव्यात, आश्रमशाळांना देण्यात येणाऱ्या निधीचा वापर योग्य होतो की नाही, याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या आश्रमशाळा तात्काळ बंद करण्यात याव्यात व संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. निवासी आश्रमशाळेवर पोलिस नियंत्रण असावे. मुरुड येथील एका दलित मुलीवर झालेल्या बलात्काराची चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, लातूर शहरातील सिद्धेश्वर चौक येथील मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे, सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. महामोर्चात मातंग समाज अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष जी.ए. गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव दिनकर मस्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, प्रा.डॉ. शिवाजी जवळगेकर, उपमहापौर कैलास कांबळे, रिपाइंचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, राज क्षीरसागर, दयानंद वाघमारे, संजय ओव्हळ, प्रा. अनंत लांडगे, मायाताई सोरटे, उत्तम चव्हाण, डॉ. लक्ष्मण मोहाळे, आनंद वैरागे, रामभाऊ चव्हाण, गोवर्धन मस्के, राहुल सरवदे, पिराजी साठे, डी.एन. वाघमारे, डी.डी. चव्हाण, योगेश उफाडे, विलास उफाडे, दयानंद शिंदे, सतीश क्षीरसागर, बन्सी वाघमारे, कैलास कांबळे, सुनील बसपुरे, गोवर्धन मस्के, नारायण कांबळे, ज्ञानोबा कांबळे, विनोद खटके आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)