शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

लातुरात मातंग समाजाचा महामोर्चा

By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST

लातूर : काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी संस्थाचालकासह संबंधित आरोपींना कडक शासन करावे,

लातूर : काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी संस्थाचालकासह संबंधित आरोपींना कडक शासन करावे, या प्रमुख मागणीसाठी मातंग समाज अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने शुक्रवारी महामोर्चा काढण्यात आला. मोर्चात मातंग समाजातील विविध संघटनांसह आंबेडकरी संघटना सहभागी झाल्या होत्या.डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून शुक्रवारी सकाळी ११ वाजता महामोर्चा निघाला. मोर्चात महिला कार्यकर्त्या तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. काटगाव येथील सानेगुरुजी आश्रमशाळेतील एका अल्पवयीन मुलीवर दोन शिक्षकांनी बलात्कार केला होता. या अत्याचारामुळे तिचा मृत्यू झाला. याला संस्थाचालकही जबाबदार आहेत. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात यावी, अशी मागणी महामोर्चाच्या वतीने करण्यात आली. खून करणाऱ्या गुन्हेगारांना देहदंडाची शिक्षा करावी, सानेगुरुजी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात यावी, शाळेतील शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाने संगनमताने बलात्कार करून खून केला, असा आरोप मोर्चाच्या वतीने करण्यात आला. हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात यावे. पीडित मुलीच्या पालकास २५ लाखांचा मदत निधी देण्यात यावा, मुलीच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यात यावे, अनुदानित सर्व निवासी आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये होणारे शोषण थांबवून महिला अधीक्षकांच्या नेमणुका करण्यात याव्यात, आश्रमशाळांना देण्यात येणाऱ्या निधीचा वापर योग्य होतो की नाही, याची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या आश्रमशाळा तात्काळ बंद करण्यात याव्यात व संस्थाचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. निवासी आश्रमशाळेवर पोलिस नियंत्रण असावे. मुरुड येथील एका दलित मुलीवर झालेल्या बलात्काराची चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शासन करावे, लातूर शहरातील सिद्धेश्वर चौक येथील मातंग समाजावर अन्याय करणाऱ्या गुन्हेगारांना कडक शासन करण्यात यावे, सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यात यावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. महामोर्चात मातंग समाज अन्याय निवारण कृती समितीचे अध्यक्ष जी.ए. गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश चव्हाण, सचिव दिनकर मस्के, कार्याध्यक्ष अनिल शिंदे, प्रा.डॉ. शिवाजी जवळगेकर, उपमहापौर कैलास कांबळे, रिपाइंचे राज्य सरचिटणीस चंद्रकांत चिकटे, राज क्षीरसागर, दयानंद वाघमारे, संजय ओव्हळ, प्रा. अनंत लांडगे, मायाताई सोरटे, उत्तम चव्हाण, डॉ. लक्ष्मण मोहाळे, आनंद वैरागे, रामभाऊ चव्हाण, गोवर्धन मस्के, राहुल सरवदे, पिराजी साठे, डी.एन. वाघमारे, डी.डी. चव्हाण, योगेश उफाडे, विलास उफाडे, दयानंद शिंदे, सतीश क्षीरसागर, बन्सी वाघमारे, कैलास कांबळे, सुनील बसपुरे, गोवर्धन मस्के, नारायण कांबळे, ज्ञानोबा कांबळे, विनोद खटके आदींचा सहभाग होता. (प्रतिनिधी)