शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
3
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
5
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
6
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
7
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
8
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
9
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
10
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
11
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
12
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
13
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
14
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
15
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
16
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
17
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
18
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
19
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
20
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली

दारुड्या पतीने पत्नीला जिवंत जाळले!

By admin | Updated: December 18, 2014 00:42 IST

औरंगाबाद : दररोज जाळून घेण्याची धमकी काय देतेस, हे घे आज मी जाळून टाकतो तुला, असे म्हणत दारुड्याने आपल्या पत्नीला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बालाजीनगरात घडली.

औरंगाबाद : दररोज जाळून घेण्याची धमकी काय देतेस, हे घे आज मी जाळून टाकतो तुला, असे म्हणत दारुड्याने आपल्या पत्नीला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना बालाजीनगरात घडली. या घटनेत भाजलेली महिला वंदना कंटुले (३०, रा. बालाजीनगर) हीस उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनेबाबत सांगितले की, वंदनाचा पती अनिल कंटुले याला दारूचे व्यसन आहे. तो सतत दारू पिऊन घरी यायचा आणि पत्नी वंदनासोबत वाद घालायचा. त्यातून या पती-पत्नीत सतत खटके उडायचे. १५ डिसेंबर रोजी दुपारी दारूच्या कारणावरूनच वंदनाने पतीला ‘तुम्ही रोज रोज दारू पिऊन फिरता. त्यामुळे संसारावर आर्थिक ताण पडत आहे. तुमच्या दारूला मी वैतागले. दारू सोडा नाही तर जाळून घेऊन जीवच देते’ असे सुनावले. त्यावरून अनिलने वाद घालण्यास सुरुवात केली. शब्दाने शब्द वाढत गेले आणि मग अनिलने ‘तू सतत जाळून घेण्याची धमकी काय देतेस. थांब तू कशाला जाळून घेते, मीच जाळतो तुला, असे म्हणत त्याने आगपेटी पेटवली आणि तिच्या अंगावर फेकली. त्यामुळे वंदनाच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला त्यात ती भाजली.या प्रकरणी वंदनाच्या फिर्यादीवरून जवाहरनगर पोलीस ठाण्यात आरोपी पती अनिलविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार भोसले हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.