शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

औरंगाबादमध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने लावला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 18:30 IST

साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुढाकार घेत साध्या पद्धतीने विवाह पार पडला

औरंगाबाद : जळगाव रस्त्यावरील एका मंगलकार्यालयात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना उपस्थित मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पुढाकार घेत, विवाहातील मान-पान, रूढी आणि अवाजवी खर्चाला फाटा देत, टी.व्ही. सेंटर चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ विवाह लावला.  यावेळी वधु-वरांच्या दोन्ही बाजूंचे मोजके नातेवाईक या विवाहाला उपस्थित होते.

प्रदीप शंकरराव सिरसाट (रा. सिंधी पिंपळगाव, ता. बदनापुर, जि. जालना) आणि पूजा नवनाथ जाधव (रा. सांजुळ, ता. फु लंब्री)असे नवविवाहित दाम्पत्याचे नाव आहे. प्रदीप हा राजेंद्र पवार मित्रमंडळासोबत समाजप्रबोधनाचे काम करतो. दुष्काळ आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचे पाऊल न उचलता, दुष्काळाचा सामना करावा. मुला-मुलींचे विवाहावर वारेमाप खर्च न करता सामुहिक विवाहात विवाह करावा, यासाठी तो काम करतो. 

प्रदीप आणि पूजा यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम त्यांच्या नातेवाईकांनी जळगाव रस्त्यावरील एका मंगलकार्यालयात आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. मोठा विवाह केला तर दोन ते चार लाख रुपये खर्च येतो. हा खर्च टाळून आजच लग्न लावावे,असा प्रस्ताव प्रदीप आणि पूजा यांच्या आई-वडिलांसह अन्य नातेवाईकांसमोर ठेवला. त्यांनाही हा प्रस्ताव आवडला. त्यानंतर संभाजी महाराज यांच्या पुतळयाजवळच वधू-वराला  उभे करून त्यांचा विवाह लावण्यात आला.

यावेळी प्रभाकर मते पाटील, राजेंद्र पवार, गणपत म्हस्के, जगन्नाथ उगले,अभिजीत देशमुख,अनिल बोरसे सुरेश वाकडे, आप्पासाहेब कुढेकर, मनोज गायके, नवनाथ जाधव, अरूण जाधव, रमेश केरे पाटील,रवींद्र काळे पाटील, वेताळ पाटील, सतीश वेताळ पाटील आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :marriageलग्नAurangabadऔरंगाबादHudco Aurangabadहडको औरंगाबाद