शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला विविध क्षेत्रांत नेतृत्व हवे

By admin | Updated: June 21, 2014 01:00 IST

औरंगाबाद : मराठवाड्याला आता विकासासाठी केवळ राजकीय नेतृत्वावरच अवलंबून राहून चालणार नाही, तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्वाचीही तेवढीच गरज असल्याचे

औरंगाबाद : मराठवाड्याला आता विकासासाठी केवळ राजकीय नेतृत्वावरच अवलंबून राहून चालणार नाही, तर आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक नेतृत्वाचीही तेवढीच गरज असल्याचे प्रतिपादन आज येथे पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक श्रुती तांबे यांनी केले. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेच्या वतीने मराठवाड्याचे अर्थशास्त्रज्ञ डॉ. आर.पी. कुरूलकर यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ‘मराठवाड्याचा विकास : कर्ते, आंदोलन आणि संभाषिते’ या विषयावर आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी उद्योगपती राम भोगले हे होते. प्रारंभी, डॉ. कुरूलकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सहस्र विकास ध्येयाची पूर्तता २०१५ आता उंबरठ्यावर आली असताना कशी काय करणार, असा सवाल प्रा. तांबे यांनी यावेळी उपस्थित केला. विकासाच्या अनुषंगाने त्यांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट, स्लम फ्री सिटी, स्त्रियांचे आरोग्य, सामाजिक वर्जिता, पर्यावरण या मुद्यांचे सविस्तर विश्लेषण केले. त्या म्हणाल्या, विकासाची जाण सामान्य माणसांमध्ये निर्माण करण्यात आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. विकास हा समतापूर्ण आणि शाश्वत असला पाहिजे. केवळ शिक्षण आणि अर्थकारण यावरच आपण आतापर्यंत भर देत आलो. विकास हा चिरंजीवी असावा. छोटे छोटे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू व्हायला हवेत. नवउदारमतवादाच्या वारूत पर्यावरण हा अडथळा बनला असून हे कोडे सोडवले गेले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला. स्त्रियांच्या आरोग्याचा प्रश्न हाताळताना प्रा.तांबे यांनी बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूणहत्यांचे वाढते प्रकार, तेथील स्त्रियांचे लैंगिक शोषण, बलात्कार याकडे आकडेवारीनिशी उपस्थितांचे लक्ष वेधले. यापेक्षाही भयानक गोष्ट म्हणजे कल्चरल व्हायोलन्स होय. तुम्हाला मोकळेपणाने तुमचा चॉईस नसेल तर मग विकासाच्या बाता मारून काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.अध्यक्षीय समारोपात राम भोेगले यांनी विकासाच्या नावाखाली पाश्चात्त्यांचे अंधानुकरण चालू असल्याचा आरोप केला. आपल्या देशाला जे उपयुक्त आहे, जे योग्य आहे, त्या दिशेने विकसित होत जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. बालकामगार नकोतच या भूमिकेचाही त्यांनी समाचार घेतला. बाल कामगार कुठे नको, कुठे चालतील, हे ठरवण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले. आपण उद्योगांच्या विकेंद्रीकरणाचा विचारच स्वीकारला नाही. उलट उद्योगांचे एकाच ठिकाणी केंद्रीकरण सुरू आहे. इंग्लंडसारख्या देशात पर्यावरण संतुलन साधत खेड्यागणिक छोटे- छोटे उद्योग निर्माण केले गेले आहेत, याकडे त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. फेसलेस पॉप्युलेशनमुळे गुन्हेगारी वाढतच जाणार असल्याचे मत राम भोगले यांनी नोंदवले. समाजाला काही परत द्यावे, ही उद्योजकांकडून करण्यात येणारी अपेक्षा पूर्ण होत नाही, असेही ते म्हणाले. आंदोलन त्सुनामीसारखे असावे. क्षणार्धात सारे बदलून टाकणारे असावे, असे मत भोगले यांनी यावेळी व्यक्त केले. संस्थेचे सचिव प्रा. सुरेश कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संचालक डॉ. शरद अदवंत यांनी आभार मानले. भुजंगराव कुुलकर्णी, ना.वि. देशपांडे, श्रीराम वरूडकर, दिनकर बोरीकर, तारा लड्डा, अ‍ॅड. प्रदीप देशमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.