शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत ...

औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत महाराष्ट्र वगैरे अशी काही संकल्पना नव्हती. मराठवाडा हीच महाराष्ट्राची ओळख होती. या मराठवाड्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप मंत्री आव्हाड यांच्या उपस्थितीत संत जनाबाई व्यासपीठावर रविवारी सायंकाळी झाला. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, किरण सगर, कुंडलिक अतकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. कैलास अंभुरे, राधाबाई बिरादार, नीलेश राऊत यांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री आव्हाड म्हणाले, मराठवाड्यातील गंगाधर पानतावणे, रा.रं. बोराडे, अनुराधा पाटील अशी कितीतरी नावे घेता येतील, त्यांनी संत जनाबाई, बहिणाबाई, तुकारामांसह इतरांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. मराठी भाषेचा उगम गोदावरीच्या खोऱ्यात झाला. मराठीला राजभाषेचा दर्जा यादवांनी दिला; परंतु आज आपण तो देऊ शकत नाही. मलिक अंबरांनी औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तो आजच्या कोणत्याही जलसंपदा मंत्र्यांना सोडवता येणार नाही. झुंडशाहीला राजमान्यता मिळत आहे. झुंडशाही नेहमीच प्रागतिक विचारांच्या विरोधात असते. त्यामुळे या झुंडशाहीला विरोध लेखकांसह वाचकांनीही केला पाहिजे, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले.

संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांनी समारोपाचे भाषण केले. प्रस्ताविक डॉ. राम चव्हाण यांनी केले. स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी संमेलन जगभर पोहोचविण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. कौतिकराव ठाले पाटील यांनी कमी कलावधीत संमेलन यशस्वी करून दाखविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम केल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते डॉ. योगिता तौर पाटील, प्रा. अशोक बंडगर, राजेंद्र वाळके, प्रा. राजेंद्र भगत व योगेश कवडे यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट..

इथल्या चळवळींचा अस्त

महाराष्ट्र हा चळवळीचा प्रदेश आहे. या भागात दलित, आर्यसमाज, सत्यशोधक अशा अनेक चळवळींची परंपरा होती. या चळवळी आज संपल्या आहेत. दलित चळवळीतील नामदेव ढसाळ, राजा ढाले आदींची नावे घेतली की अंगावर काटा यायचा, आज असा दरारा राहिलेला नाही. यासाठी आपणच जबाबदार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असल्यामुळे तेथे जाण्यासाठी रेल्वे असावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.