शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत ...

औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत महाराष्ट्र वगैरे अशी काही संकल्पना नव्हती. मराठवाडा हीच महाराष्ट्राची ओळख होती. या मराठवाड्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप मंत्री आव्हाड यांच्या उपस्थितीत संत जनाबाई व्यासपीठावर रविवारी सायंकाळी झाला. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, किरण सगर, कुंडलिक अतकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. कैलास अंभुरे, राधाबाई बिरादार, नीलेश राऊत यांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री आव्हाड म्हणाले, मराठवाड्यातील गंगाधर पानतावणे, रा.रं. बोराडे, अनुराधा पाटील अशी कितीतरी नावे घेता येतील, त्यांनी संत जनाबाई, बहिणाबाई, तुकारामांसह इतरांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. मराठी भाषेचा उगम गोदावरीच्या खोऱ्यात झाला. मराठीला राजभाषेचा दर्जा यादवांनी दिला; परंतु आज आपण तो देऊ शकत नाही. मलिक अंबरांनी औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तो आजच्या कोणत्याही जलसंपदा मंत्र्यांना सोडवता येणार नाही. झुंडशाहीला राजमान्यता मिळत आहे. झुंडशाही नेहमीच प्रागतिक विचारांच्या विरोधात असते. त्यामुळे या झुंडशाहीला विरोध लेखकांसह वाचकांनीही केला पाहिजे, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले.

संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांनी समारोपाचे भाषण केले. प्रस्ताविक डॉ. राम चव्हाण यांनी केले. स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी संमेलन जगभर पोहोचविण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. कौतिकराव ठाले पाटील यांनी कमी कलावधीत संमेलन यशस्वी करून दाखविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम केल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते डॉ. योगिता तौर पाटील, प्रा. अशोक बंडगर, राजेंद्र वाळके, प्रा. राजेंद्र भगत व योगेश कवडे यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट..

इथल्या चळवळींचा अस्त

महाराष्ट्र हा चळवळीचा प्रदेश आहे. या भागात दलित, आर्यसमाज, सत्यशोधक अशा अनेक चळवळींची परंपरा होती. या चळवळी आज संपल्या आहेत. दलित चळवळीतील नामदेव ढसाळ, राजा ढाले आदींची नावे घेतली की अंगावर काटा यायचा, आज असा दरारा राहिलेला नाही. यासाठी आपणच जबाबदार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असल्यामुळे तेथे जाण्यासाठी रेल्वे असावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.