शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत ...

औरंगाबाद : मराठवाडा ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. मराठवाड्यात मराठीची निर्मिती झाली. संत परंपरा याच भागाने जोपासली. १२व्या शतकापर्यंत महाराष्ट्र वगैरे अशी काही संकल्पना नव्हती. मराठवाडा हीच महाराष्ट्राची ओळख होती. या मराठवाड्याने आजपर्यंत महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

लोकसंवाद फाउंडेशन आयोजित ४१व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचा समारोप मंत्री आव्हाड यांच्या उपस्थितीत संत जनाबाई व्यासपीठावर रविवारी सायंकाळी झाला. अध्यक्षस्थानी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे, मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, दादा गोरे, किरण सगर, कुंडलिक अतकरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे, मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे, डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. कैलास अंभुरे, राधाबाई बिरादार, नीलेश राऊत यांची उपस्थिती होती.

यावेळी मंत्री आव्हाड म्हणाले, मराठवाड्यातील गंगाधर पानतावणे, रा.रं. बोराडे, अनुराधा पाटील अशी कितीतरी नावे घेता येतील, त्यांनी संत जनाबाई, बहिणाबाई, तुकारामांसह इतरांचा वारसा समर्थपणे चालविला आहे. मराठी भाषेचा उगम गोदावरीच्या खोऱ्यात झाला. मराठीला राजभाषेचा दर्जा यादवांनी दिला; परंतु आज आपण तो देऊ शकत नाही. मलिक अंबरांनी औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न सोडवला. तो आजच्या कोणत्याही जलसंपदा मंत्र्यांना सोडवता येणार नाही. झुंडशाहीला राजमान्यता मिळत आहे. झुंडशाही नेहमीच प्रागतिक विचारांच्या विरोधात असते. त्यामुळे या झुंडशाहीला विरोध लेखकांसह वाचकांनीही केला पाहिजे, असे आवाहनही जितेंद्र आव्हाड यांनी केले.

संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांनी समारोपाचे भाषण केले. प्रस्ताविक डॉ. राम चव्हाण यांनी केले. स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी संमेलन जगभर पोहोचविण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले. कौतिकराव ठाले पाटील यांनी कमी कलावधीत संमेलन यशस्वी करून दाखविल्याबद्दल संयोजकांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन संकेत कुलकर्णी यांनी केले. डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी आभार मानले. संमेलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम केल्याबद्दल मंत्र्यांच्या हस्ते डॉ. योगिता तौर पाटील, प्रा. अशोक बंडगर, राजेंद्र वाळके, प्रा. राजेंद्र भगत व योगेश कवडे यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट..

इथल्या चळवळींचा अस्त

महाराष्ट्र हा चळवळीचा प्रदेश आहे. या भागात दलित, आर्यसमाज, सत्यशोधक अशा अनेक चळवळींची परंपरा होती. या चळवळी आज संपल्या आहेत. दलित चळवळीतील नामदेव ढसाळ, राजा ढाले आदींची नावे घेतली की अंगावर काटा यायचा, आज असा दरारा राहिलेला नाही. यासाठी आपणच जबाबदार असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी असल्यामुळे तेथे जाण्यासाठी रेल्वे असावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.