शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

शिक्षणात मराठवाड्याची भरारी..!

By admin | Updated: June 23, 2014 00:30 IST

औरंगाबाद : शालेय शिक्षणात गुणवंतांनी आपले कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे मराठवाड्याला कुणाच्या मागे धावण्याची गरज नसल्याचे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज व्यक्त केले.

औरंगाबाद : शिक्षणात मराठवाड्याने भरारी घेतली आहे. आयआयटीपासून वैद्यकीय क्षेत्रासह शालेय शिक्षणात गुणवंतांनी आपले कर्तृत्व सिद्ध केल्यामुळे मराठवाड्याला कुणाच्या मागे धावण्याची गरज नसल्याचे मत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज व्यक्त केले. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह दहावीत यश मिळविले. त्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा आज शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांच्यातर्फे आयोजित एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी आयुक्तांचे वडील श्रीराम कांबळे, आई जोहर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वत:चे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्याचे नमूद करून शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, मनपा, जि. प., न. पा. शाळांमधून मिळणारे शिक्षण हे सीबीएसई पॅटर्नपेक्षा कमी नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षणाचा दर्जा आणखी वाढावा, यासाठी शिक्षण खात्याने अनेक उपक्रम हाती घेतले. आयुक्त डॉ. कांबळे आणि त्यांच्या शिक्षण विभागाने कौतुकास्पद काम केले आहे. यावेळी उपायुक्त सुरेश पेडगावकर, शहर अभियंता एस. डी. पानझडे, उपायुक्त रवींद्र निकम, हेमंत कोल्हे, अफसर सिद्दीकी, सिकंदर अली, शिक्षणाधिकारी ए. एम. शेख आदींंची उपस्थिती होती. शिक्षण विकासाची चतु:सूत्रीशालेय शिक्षण हाच विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा पाया असल्यामुळे अभ्यासक्रम, शिक्षण अर्हता, प्रशिक्षण आणि शाळांमध्ये भौतिक सुविधा देण्याचे चतु:सूत्री धोरण राबविल्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले. दहावीचा अभ्यासक्रम कमजोर होता. शिक्षकांची अर्हता वाढविणे महत्त्वाचे होते. ब्रिटिश कौन्सिलच्या मदतीने ६० हजार शिक्षकांना इंग्रजीचे धडे दिले. राज्य शासन, आयआयटीमध्ये करार करून एयू तंत्र वापरून शिक्षकांना भौतिकशास्त्रात पारंगत केले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बीजगणित शिक्षक या करारांतर्गत तयार होतील. शिक्षकांसाठी इस्रायल व शासनाच्या वतीने पुण्यात पहिले शिबीर घेण्यात आले. ३ कोटींचे साहित्य मनपाला शिक्षणमंत्री म्हणाले, राज्यात औरंगाबादमधील मनपाच्या सर्व शाळांमध्ये ३ कोटी रुपयांच्या निधीतून शालेयउपयोगी साहित्य देण्यात आले आहे. ५ हजार ५३७ बेंच देण्यात आले. ३० लाख रुपयांच्या निधीतून मध्यान्ह भोजनपात्र दिले. वॉटरफिल्टर, क्रीडा साहित्य दिले. इस्कॉनच्या खिचडीमुळे शाळेची विद्यार्थी संख्या वाढली. आयुक्त म्हणाले....जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण झाल्याचे नमूद करीत आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे म्हणाले, मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी कठीण परिस्थितीतून यश मिळविले. राज्यात दहावीचा निकाल चांगला, तो शिक्षणमंत्र्यांमुळे. शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मनपा शाळांनाही भरभरून मदत केली. गेल्या वर्षी मनपा शाळांचा निकाल ५३ टक्के लागला होता. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यामुळे यावर्षीचा निकाल ८० टक्क्यांवर गेला आहे. शाळेतील अनेक अडचणी सोडविल्या. शिक्षकांनी रात्री वर्ग घेऊन कोचिंग केले. २६ जून रोजी सिडको नाट्यगृह येथे मनपातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले गुणवंत पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. पुरस्काराची रक्कम पालक ांनी विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षणावर खर्च करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले. मिटमिटा, मुकुंदवाडी, इंदिरानगर, शहाबाजार या शाळांना पाच पारितोषिक देण्याची घोषणा आयुक्तांनी केली.