शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पैठणमध्ये मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार

By admin | Updated: November 7, 2016 01:07 IST

पैठण : सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी पैठणकरांनी अनुभवला. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या अभूतपूर्व मोर्चात महिला व तरुणींची संख्या लक्षणीय होती.

पैठण : सकल मराठा समाजाचा नि:शब्द हुंकार रविवारी पैठणकरांनी अनुभवला. लाखोंच्या संख्येने निघालेल्या या अभूतपूर्व मोर्चात महिला व तरुणींची संख्या लक्षणीय होती. अत्यंत शिस्तबद्ध निघालेल्या या मोर्चाने पैठण शहर गजबजून गेले होते. दरम्यान, याच काळात ग्रामीण भागात मोठा शुकशुकाट निर्माण झाला होता.औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर व सिल्लोड येथे झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाचे विक्रम पैठण येथे झालेल्या विक्रमी गर्दीने मोडीत काढले. सकाळपासूनच शहरातील सर्व रस्ते गर्दीने ओसंडून वाहत होते. शिवाजी चौकातील व्यासपीठापासून निघणारे सर्व रस्ते शहराबाहेरपर्यंत खचाखच भरलेले होते. व्यासपीठावरील पंचकन्यांचे भाषण व निवेदन ऐकू यावे यासाठी या व्यासपीठावरून बोललेला आवाज सर्व रस्त्यांनी पाच किलोमीटरपर्यंत जाईल, अशी ध्वनिप्रक्षेपन व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे मोर्चात सहभागी झालेल्या समाजबांधवांना मोठे समाधान लाभले. मोर्चासाठी लाखो समाजबांधवांनी हजेरी लावल्याचा दावा आयोजक व पोलिसांनी केला. या मोर्चात तालुक्यातील प्रत्येक गावातील समाजबांधव सहभागी झाले होते.अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण जाहीर करावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी देण्यात यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपये देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांंचे निवेदन समाजाच्या वतीने व्यासपीठावरून विद्यार्थिनींनी वाचले.सकाळपासूनच पैठण शहरात येणाऱ्या विविध रस्त्यांवरून भगव्या टोप्या, हातात भगवे झेंडे घेतलेले मोर्चेकरी आपल्या वाहनांमधून शहरात दाखल होत होते. येथील कावसनकर स्टेडियमवर सर्व मोर्चेकरी लाखोंच्या संख्येने जमा झाल्यानंतर ना आवाज ना घोषणा, अगदी शिस्तबद्धपणे, शांततेत दुपारी १२ वाजता मूक मोर्चास प्रारंभ झाला. कै. दिगंबरराव कावसनकर स्टेडियमपासून मूक मोर्चा उद्यानमार्गे खंडोबा चौक, बसस्थानक, महाराणा प्रताप चौकमार्गे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकात पोहोचला. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यानंतर मराठा समाजाच्या व्यथा व विविध समस्यांवर प्रकाश टाकणारे मनोगत व्यासपीठावरील मुलींनी व्यक्त केले.या मोर्चात सहभागी मराठा बांधवांना शहरातील मुस्लिम, राजपूत (परदेशी), जैन समाजाच्या वतीने व विविध संघटनांच्या वतीने विविध चौकांत मोर्चेकऱ्यांना पिण्याचे पाणी व अल्पोपाहाराची सुविधा उपलब्ध करून दिली होती. या समाजाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मोर्चेकऱ्यांना सुविधा उपलब्ध करून देत होते. या समाजास पाठिंबा असल्याचे मोठमोठे फलक शहरात लावले होते. शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर समाजाच्या पंचकन्यांनी जमा झालेल्या लाखो समाजबांधवांसमोर बोलताना कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याबरोबरच मराठा समाजाला आरक्षण व विविध मागण्या शासनाने मंजूर कराव्यात, अशी मागणी केली. मोर्चासाठी समाजाचे शेकडो स्वयंसेवक विविध चौकांत तैनात होते.