शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
2
भाजपचे उमदेवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
3
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
4
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
5
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
6
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
7
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
8
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
9
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
10
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
11
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
12
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
13
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
14
१.१७ कोटींची बोली लावली, प्रसिद्धी मिळविली, आता म्हणतोय...'नको'; HR 88 B 8888 नंबर प्लेटचा पुन्हा लिलाव होणार
15
IPL 2026 Auction: भारताच्या 'या' Top 10 स्टार क्रिकेटपटूंनी लिलावासाठी केली 'रजिस्ट्रेशन'
16
इथे मतदान करा, तिकडचे बटन दाबा...! आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदान केंद्रातच महिलेला सूचना, गुन्हा दाखल...
17
आधी फिरून येऊ म्हणाला, मग भांडण उकरून काढलं; संतापलेल्या रिक्षा चालकानं गर्लफ्रेंडला काचेच्या बाटलीनं मारलं!
18
पिण्याच्या पाण्यासाठी 'पादत्राणांचा त्याग', परमेश्वर कदम यांच्या सेवाभावी कार्याचा 'महाराष्ट्र समाजभूषण' पुरस्काराने गौरव!
19
“नगरपालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा रडीचा डाव, बोगस मतदानावर कठोर कारवाई करा”: सपकाळ
20
फ्रिज मॅग्नेटचे चाहते आहात... दरवाजा सजवताना वीज बिलही वाढतं का? कंपन्यांनीच दिलं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच

By admin | Updated: November 18, 2014 01:08 IST

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरिपाची पिके हातची गेली आहेत. पावसाळा संपला तरी अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच राहिले आहेत, तर उर्वरित प्रकल्पांमध्येही जेमतेम साठा झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होणार आहे. मराठवाड्यात सर्व प्रकारचे एकूण ८३३ प्रकल्प असून, त्यांच्या पाणीसाठ्याची क्षमता ७९११ द.ल.घ.मी. आहे; मात्र सध्या या प्रकल्पांमध्ये ३४ टक्के म्हणजे २६७३ द.ल.घ.मी. इतकाच पाणीसाठा आहे. लघु, मध्यम, मोठे, तसेच मांजरा आणि गोदावरी नदीवरील बंधारे या सर्वांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३९ टक्के साठा आहे. यातील मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ३१ टक्के पाणीसाठा आहे, तर मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे तीन प्रकल्प कोरडेच आहेत. माजलगाव प्रकल्पातही अवघा २ टक्के साठा शिल्लक आहे. येलदरी धरणात ५० टक्के, विष्णुपुरी धरणात ६७ टक्के आणि सिद्धेश्वर धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्येही २८ टक्केच साठा आहे. परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सर्वात कमी १९ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ४२ टक्के इतका जलसाठा आहे. यंदा मराठवाड्यातील ७२० लघु प्रकल्पांमध्येही जेमतेम २८ टक्के साठा होऊ शकला आहे.