शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच

By admin | Updated: November 18, 2014 01:08 IST

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यावर पावसाने यंदा अवकृपा केली आहे. विभागात वार्षिक सरासरीच्या ५३ टक्केच पाऊस झाला आहे, त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाअभावी खरिपाची पिके हातची गेली आहेत. पावसाळा संपला तरी अनेक प्रकल्प अक्षरश: कोरडेच राहिले आहेत, तर उर्वरित प्रकल्पांमध्येही जेमतेम साठा झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठवाड्यातील पाणीटंचाईची परिस्थिती गंभीर होणार आहे. मराठवाड्यात सर्व प्रकारचे एकूण ८३३ प्रकल्प असून, त्यांच्या पाणीसाठ्याची क्षमता ७९११ द.ल.घ.मी. आहे; मात्र सध्या या प्रकल्पांमध्ये ३४ टक्के म्हणजे २६७३ द.ल.घ.मी. इतकाच पाणीसाठा आहे. लघु, मध्यम, मोठे, तसेच मांजरा आणि गोदावरी नदीवरील बंधारे या सर्वांमध्ये जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ३९ टक्के साठा आहे. यातील मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात ३१ टक्के पाणीसाठा आहे, तर मांजरा, निम्न तेरणा आणि सिना कोळेगाव हे तीन प्रकल्प कोरडेच आहेत. माजलगाव प्रकल्पातही अवघा २ टक्के साठा शिल्लक आहे. येलदरी धरणात ५० टक्के, विष्णुपुरी धरणात ६७ टक्के आणि सिद्धेश्वर धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे. विभागातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्येही २८ टक्केच साठा आहे. परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमध्ये सर्वात कमी १९ टक्के, तर नांदेड जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये सर्वाधिक ४२ टक्के इतका जलसाठा आहे. यंदा मराठवाड्यातील ७२० लघु प्रकल्पांमध्येही जेमतेम २८ टक्के साठा होऊ शकला आहे.