शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

आयटीआयच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य मार्क !

By admin | Updated: January 20, 2017 00:16 IST

लातूर : जेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून परीक्षेपूर्वी आॅनलाईन अटेन्डन्स पाठविली जाते. ही हजेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत. परिणामी, शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान, राज्य कार्यालय आणि दिल्ली येथील कार्यालयाकडे हजेरी दुरुस्ती करण्यासाठी लातूर आयटीआयमधून काही कर्मचारी गेले असल्याचे समजते. लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, निलंगा, औसा, जळकोट, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, चाकूर, अहमदपूर या दहाही तालुक्यांच्या ठिकाणी आयटीआय महाविद्यालये आहेत. चार सेमिस्टरचे अनेक शैक्षणिक कोर्स या महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना शिकविले जातात. लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ५५० विद्यार्थ्यांचा विविध कोर्सेसला प्रवेश आहे. परीक्षेपूर्वी आॅनलाईन पद्धतीने राज्य कार्यालयाकडे हजेरी पाठविली जाते. पहिल्या सेमिस्टरची हजेरी पाठविताना दुसऱ्या सेमिस्टरची हजेरी राहिली, तर सॉफ्टवेअरमध्ये ती अपलोड होत नाही. असाच तांत्रिक घोळ विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्समध्ये झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रावर ‘शून्य’ मार्क आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले असून, त्यांनी प्राचार्यांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, प्राचार्यांनी राज्य कार्यालयाकडे संपर्क साधला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे. ४ जानेवारीला या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला असून, १४ जानेवारीपर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आहे. या मुदतीत निकाल न आल्याने विद्यार्थ्यांना परत परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत.(प्रतिनिधी)