शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य मार्क !

By admin | Updated: January 20, 2017 00:16 IST

लातूर : जेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून परीक्षेपूर्वी आॅनलाईन अटेन्डन्स पाठविली जाते. ही हजेरी पाठविण्यात तांत्रिक गडबड झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत शून्य मार्क मिळाले आहेत. परिणामी, शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान, राज्य कार्यालय आणि दिल्ली येथील कार्यालयाकडे हजेरी दुरुस्ती करण्यासाठी लातूर आयटीआयमधून काही कर्मचारी गेले असल्याचे समजते. लातूर जिल्ह्यात लातूर, उदगीर, निलंगा, औसा, जळकोट, रेणापूर, शिरूर अनंतपाळ, देवणी, चाकूर, अहमदपूर या दहाही तालुक्यांच्या ठिकाणी आयटीआय महाविद्यालये आहेत. चार सेमिस्टरचे अनेक शैक्षणिक कोर्स या महाविद्यालयांतून विद्यार्थ्यांना शिकविले जातात. लातूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ५५० विद्यार्थ्यांचा विविध कोर्सेसला प्रवेश आहे. परीक्षेपूर्वी आॅनलाईन पद्धतीने राज्य कार्यालयाकडे हजेरी पाठविली जाते. पहिल्या सेमिस्टरची हजेरी पाठविताना दुसऱ्या सेमिस्टरची हजेरी राहिली, तर सॉफ्टवेअरमध्ये ती अपलोड होत नाही. असाच तांत्रिक घोळ विद्यार्थ्यांच्या अटेन्डन्समध्ये झाला आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रावर ‘शून्य’ मार्क आले आहेत. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले असून, त्यांनी प्राचार्यांकडे धाव घेतली आहे. दरम्यान, प्राचार्यांनी राज्य कार्यालयाकडे संपर्क साधला असून, दुरुस्तीची मागणी केली आहे. ४ जानेवारीला या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल लागला असून, १४ जानेवारीपर्यंत परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत आहे. या मुदतीत निकाल न आल्याने विद्यार्थ्यांना परत परीक्षा फॉर्म भरावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी धास्तावले आहेत.(प्रतिनिधी)