शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

डीएमआयसी, एसईझेडमुळे अनेक उद्योग येणार

By admin | Updated: September 30, 2014 01:30 IST

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) आणि स्पेशल इकॉनॉमी झोनमुळे (एसईझेड) औरंगाबादेत अनेक उद्योग येणार आहेत.

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) आणि स्पेशल इकॉनॉमी झोनमुळे (एसईझेड) औरंगाबादेत अनेक उद्योग येणार आहेत. उद्योगांमध्ये अमूलाग्र बदल होत आहेत, वाढत्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी आतापासूनच तयारी करायला हवी, असे मत बागला उद्योग समूहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ऋषी बागला यांनी व्यक्त केले.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मटेरियल मॅनेजमेंटच्या (आयआयएमएम) औरंगाबाद शाखेतर्फे सोमवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयआयएमएमचे राष्ट्रीय अध्यक्ष लालभाई पटेल, उपाध्यक्ष (पश्चिम) जी.एस. पालकर, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य पी.पी. रेड्डी, शाखा अध्यक्ष जितेश गुप्ता, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र जोशी, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य पी.पी. रेड्डी, तांत्रिक समिती सदस्य प्रमुख जे.एस. संघई उपस्थित होते.उद्योगांमध्ये पर्चेस अँड सप्लाय मॅनेजमेंटमधील काम महत्त्वाचे असून, उद्योगांचा डोलारा त्यावर अवलंबून असतो. कच्च्या मालापासून सर्वोत्कृष्ट उत्पादन ही एक मोठी कसब असते. उत्पादन करताना वेस्टेज कमीत कमी करणे खूप महत्त्वाचे आहे. मोठ्या उद्योगांसाठी व्हेंडर हा एक महत्त्वाचा घटक असून, त्याला प्रतिष्ठा देणे गरजेचे असते. चांगल्या संबंधांमुळे ही मंडळी संकटातही आपल्या बाजूने उभे राहतात, असा माझा अनुभव आहे. जागतिक पातळीवर स्पर्धा करताना दर्जा, किंमत आणि कार्यक्षमता, वक्तशीरपणा या गोष्टीही कमालीच्या उपयोगी पडतात.लालभाई पटेल यांनी यावेळी नमूद केले की, भविष्यकालीन संधी आणि धोके आताच ओळखून अनेक नवीन अभ्यासक्रम आम्ही सुरू करीत आहोत. प्रास्ताविक शाखा अध्यक्ष जितेश गुप्ता यांनी केले. त्यांनी शाखेतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. पी.पी. रेड्डी यांनी कार्यशाळा आयोजनामागची भूमिका विषद केली. यावेळी माजी अध्यक्ष पिंपळकर, जऊळकर, आनंद केंभवी आदींसह उद्योजकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमात पटेल यांच्या हस्ते रेड्डी, गुप्ता, आर. डी. जऊळकर, सुधीर पाटील, के. श्रीहरी, सुशांत पठारे यांना गौरविण्यात आले. संस्थेच्या स्मरणिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.