शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मनपाने केला ८० लाखांचा चुराडा

By admin | Updated: June 9, 2014 01:05 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद शहरातील १५ लाख नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्याचा मुद्या आल्यावर मनपा प्रशासनाकडे पैसेच नसतात.

मुजीब देवणीकर , औरंगाबाद शहरातील १५ लाख नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा देण्याचा मुद्या आल्यावर मनपा प्रशासनाकडे पैसेच नसतात. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची दाखविली जाते; पण प्रत्यक्षात असे नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी पालिकेच्या तिजोरीत भरपूर पैसे आहेत...! म्हणूनच मध्यवर्ती जकात नाका येथील एलबीटी कार्यालयाच्या डागडुजीवर मनपाने तब्बल ८० लाख रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.एलबीटीचे कार्यालय मनपासाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. जकात रद्द झाल्यानंतर शहरात (लोकल बॉडी टॅक्स) एलबीटीचा प्रकल्प यशस्वी ठरला. दरमहा सुमारे २० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत एलबीटीपोटी जमा होतात. मध्यवर्ती जकात नाक्याच्या जुन्या कार्यालयातच एलबीटीचे कार्यालय थाटण्यात आले आहे.भविष्यात एलबीटी टॅक्स रद्द होणार हे सर्वश्रुत आहे. दोन महिन्यांपासून तर शहरातील व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले असून, मनपाला एलबीटी न भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या या ताठर भूमिकेमुळे मनपाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडल्या गेला असून, दर महिन्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार करणेही अवघड होऊन बसले आहे. एलबीटी आज नाही तर उद्या रद्द होणार हे माहीत असतानाही मनपाने ८० लाख रुपयांचे कार्यालय उभारले आहे. जुन्या कार्यालयातच अत्याधुनिक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी केबिनची स्वतंत्र व्यवस्था यात आहे. शासनाने लवकरच एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर या खर्चावर पाणी फेरल्यासारखे होईल. एलबीटीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी जागा नव्हती. त्यांच्यासाठी ही डागडुजी करण्यात आली. या कामावर ३५ ते ३७ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. काम सुरू केले तेव्हा एलबीटी रद्द होण्याची शक्यता नव्हती. ८० लाखांचा खर्च झाला नाही, असे उपअभियंता बी. डी. फड यांनी सांगितले.चतुर अधिकारीएलबीटीच्या कार्यालयावर सुमारे १ कोटी रुपयांपर्यंत खर्च करण्याचा प्लॅन काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आखला. या कामाची एकच निविदा काढली तर राजकीय मंडळी काम होऊ देणार नाही, त्यापेक्षा दोन ते तीन टप्प्यात निविदा काढल्या तर कोणालाच कळणार नाही. छोट्या निविदा मंजूर करण्यासाठी स्थायी समितीची गरज पडत नाही. २४ लाख रुपयांच्या वेगवेगळ्या निविदा काढून मर्जीतील कंत्राटदारालाच ही कामे दिल्याचे सूत्रांनी सांगितले.रुग्णालयाचा प्रस्तावमध्यवर्ती जकात नाका येथील जागेवर २०० खाटांचे भव्य रुग्णालय मनपा बांधणार आहे. या प्रकल्पाची फाईल बीओटी विभागाकडून मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. लवकरच रुग्णालयाचे बांधकाम मनपाकडून सुरू होईल. त्यापूर्वी मध्यवर्ती जकात नाक्यावर असलेले एलबीटीचे कार्यालय पाडावे लागेल. मनपा प्रशासनाला या सर्व गोष्टींचा बोध असतानाही कार्यालयाच्या अत्याधुनिकीकरणावर तब्बल ८० लाख रुपये कशासाठी खर्च करण्यात आले, असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मनपाच्या तिजोरीत येणारा पैसा हा जनतेच्या घामाचा असून, त्यावर विकासकामे अपेक्षित आहेत. प्रशासन या पैशांची अशा पद्धतीने उधळपट्टी करीत आहे.