शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

झेंडा सत्याग्रहातून पेटल्या क्रांतीच्या मशाली

By admin | Updated: August 9, 2014 00:34 IST

संजय तिपाले , बीड ९ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारला ‘चले जाव’ चा इशारा दिला होता़ याचवेळी त्यांनी जनतेला ‘करो या मरो’ असे आवाहन केले होते़

संजय तिपाले , बीड९ आॅगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांनी इंग्रज सरकारला ‘चले जाव’ चा इशारा दिला होता़ याचवेळी त्यांनी जनतेला ‘करो या मरो’ असे आवाहन केले होते़ गांधीजींच्या या आवाहनाला बीडमधून त्यावेळी प्रचंड प्रतिसाद मिळाला होता़ जिल्हाभर ‘झेंडा सत्याग्रह’ करुन क्रांतिकारकांनी इंग्रज सरकारविरुद्ध रान पेटविले होते़ तेथून पुढेच क्रांतीच्या मशाली प्रज्वलित झाल्या अन् इंग्रज राजवटीला हादरा बसला़ क्रांती दिनाच्या निमित्ताने टाकलेला प्रकाशझोत़़़भारतीय स्वातंत्र्य लढ्यात बीड जिल्ह्यातील क्रांतिकांरकांचे योगदान दखलपात्र होते़ क्रांतीदिन हा स्वातंत्र्यलढ्याचाच एक भाग होता़ या लढ्यात बीडमधील क्रांतिकारकांनी हिरीरीने सहभाग घेतला़ बीडमधील पुरुषोत्तमराव चपळगावकर, काशिनाथराव जाधव, रामलिंग स्वामी यांच्या नेतृत्वाखाली मोठा सत्याग्रह झाला होता़ त्याकाळी तिरंगा झेंडा फडकावणाऱ्यांना इंग्रज सरकार डांबून ठेवत असे़ मात्र, देशप्रेमाने भारावलेले लोक हातात तिरंगा झेंडे घेऊन रस्त्यावर उतरले़ इंग्रजांकडून होणाऱ्या कारवाईची पर्वा न करता जिल्ह्यात गावोगावी झेंडा सत्याग्रह करण्यात आला़ त्यामुळे क्रांतीच्या मशालींचे भडक्यात रुपांतर झाले़ स्वातंत्र्यलढ्याच्या आंदोलनाची तीव्रता यापुढे अधिक वेगाने वाढली़नोकरीवरुन काढले, गावबंदी केली!क्रांती आंदोलनाची तीव्रता अंबाजोगाई येथे अधिक होती़ योगेश्वरी शाळेचे शिक्षक बाबासाहेब परांजपे, ग़ धो़ देशपांडे यांनी इग्रंजांकडून होणाऱ्या अन्याय- अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली़ सामान्यांच्या मनात क्रांतीच्या भावना निर्माण करण्यात त्यांचा पुढाकार होता़ याबदल्यात इंग्रज सरकारने त्यांना नोकरीवरुन काढले, त्यांना गावबंदी केली;परंतु याला भीक न घालता त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात आग्रही भूमिका घेतली़ त्यामुळे इतरांना प्रेरणा मिळाली. अंबाजोगाईच्या पोस्ट कार्यालयावर हल्लाबोलश्रीनिवास खोत, धोंडू पवार, श्रीनिवास अहंकारी या क्रांतिकारकांनी अंबाजोगाई पोस्ट कार्यालयावर हल्लाबोल केला़ तेथील तारा उखडून फेकल्या़ संदेशवाहनांची तोडफोड करुन इंग्रज व निजामांचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला़ त्यानंतर आंदोलन अधिक व्यापक तर झालेच; पण इंग्रजसरकारविरुद्ध रोष वाढला़ त्यामुळे इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडण्यात यश मिळाले. इतिहासाचे अभ्यासक डॉ़ सतीश साळूंके यांनी सांगितले की, भारतीय स्वातंत्र्य संग्रामात ९ आॅगस्ट हा क्रांती दिन म्हणून संबोधला जातो़ याच दिवशी महात्मा गांधी यांनी संपूर्ण देशाला करा किंवा मरा असा संदेश देऊन देशभक्तीची लाट निर्माण केली होती़ क्रांती दिन हा स्वातंत्र्यलढ्याचाच एक भाग आहे;पण याच काळात हैद्राबादेतील जनता निजामांच्या विरोधात स्वातंत्र्यासाठी लढत होती़ त्यामुळे बीडसह मराठवाड्यातील जनतेने एकाचवेळी निजाम व इंग्रजांच्या विरोधात एल्गार पुकारला़ त्यामुळे या दोन्ही राजवटीला मोठा हादरा बसला होता, असेही डॉ़ साळूंके यांनी सांगितले़