शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मनपाची यंत्रणाच आहे कुचकामी

By admin | Updated: June 15, 2014 00:55 IST

औरंगाबाद : गुरुवारी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा बंद झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला.

औरंगाबाद : गुरुवारी फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा बंद झाल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला. मात्र, हा वीजपुरवठा मनपाच्याच अंतर्गत सदोष आणि कुचकामी यंत्रणेमुळे खंडित झाला होता. यात महावितरणच्या यंत्रणेचा काहीही संबंध नव्हता, असा दावा महावितरणने केला आहे.मनपाकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्यामुळे महिनाभरापासून तीव्र पाणीटंचाई आहे. नागरिकांना चार-चार दिवस पाणी मिळणे कठीण झाले आहे. त्यातच गुरुवारी मनपाच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा आणखीच विपरीत परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर महावितरणचे कार्यकारी अभियंता सुनील काकडे यांनी आज पत्रकारांसह फारोळा येथील केंद्राला भेट दिली. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारीही उपस्थित होते.गुरुवारी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित झालेला नव्हता, तर तो मनपाच्याच अंतर्गत यंत्रणेतील बिघाड होता, असा दावा काकडे यांनी केला. मनपाच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला दोन वेगवेगळ्या लाईनद्वारे वीजपुरवठा करण्यात आलेला आहे. एका बाजूने वीजपुरवठा खंडित झाला, तर पाच मिनिटांत दुसऱ्या बाजूचा वीजपुरवठा सुरू होतो. गुरुवारी हा वीजपुरवठा सुरळीत होता. मात्र, मनपाच्याच अंतर्गत ३३ केव्हीए केंद्रात बिघाड झाला. चारपैकी एक ट्रान्सफॉर्मर बिघडले. हा बिघाड झाल्यावर संरक्षण यंत्रणा कार्यान्वित होणे गरजेचे होते; पण तीही झाली नाही. या ठिकाणी तीन टप्प्यांत संरक्षण यंत्रणा बसविलेली आहे. रोहित्रात बिघाड झाल्यास टप्प्याटप्प्याने या यंत्रणा कार्यान्वित होत असतात. गुरुवारी या तिन्ही टप्प्यांवरील संरक्षण यंत्रणा कार्यान्वित झाली नाही. त्यामुळेच वीजपुरवठा खंडित झाला, असे ते म्हणाले. ढोरकीन येथे स्वतंत्र फिडरवरून वीजपुरवठाढोरकीन येथील पाणीपुरवठा केंद्रासाठी महावितरणने मनपाला कॉमन फिडरवरून वीजपुरवठा केलेला आहे. मात्र, आता तेथेही मनपाला स्वतंत्र फिडरवरून कनेक्शन दिले जाणार आहे. त्यासाठी मनपा १५ लाख रुपये खर्च करीत आहे. हे काम महावितरणच्या नियंत्रणाखाली होणार आहे. त्यासाठी मनपाने महावितरणकडे नुकताच सुपरव्हिजन चार्जेस्पोटी २३ हजार रुपयांचा भरणा केला आहे. जालन्यासाठीही स्वतंत्र लाईनजायकवाडी धरणात औरंगाबाद मनपाच्या उपसा केंद्राशेजारीच जालना नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे उपसा केंद्र आहे. त्याला मनपाच्या पाणीपुरवठा योजनेच्या लाईनवरूनच जोडणी देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्होल्टेजचा प्रॉब्लेम निर्माण होत आहे. मात्र, आता जालन्याच्या उपसा केंद्रासाठी स्वतंत्र लाईनचे काम पूर्ण झाले असून लवकरच त्यांना या लाईनवरून कनेक्शन दिले जाणार आहे.