शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
2
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
3
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
4
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट
5
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार ट्विटर अकाऊंट बंद
6
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
7
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
8
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
9
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
10
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
11
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
12
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
13
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन
14
भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात, लाहोरवर केला ड्रोन हल्ला, तणाव वाढला!
15
India Pakistan War: पाकिस्तानचा रडीचा डाव, अंधार पडताच केला हल्ला; काय काय घडलं, पहा व्हिडीओ
16
युद्धाची घोषणा होणार? राजनाथ सिंह सीडीएस, तिन्ही आर्मी प्रमुखांच्या भेटीला; मोदी डोवाल एकत्र...
17
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला; पाकने राजस्थान बॉर्डरच्या दिशेने पाठवले रणगाडे, भारतीय सैन्यही सज्ज
18
पाकिस्तानचा मोठा हल्ला उधळला, एफ-१६ जेटच्या उडवल्या ठिकऱ्या, आयएल-१७ एअर डिफेन्स गन सीमेवर तैनात
19
ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी अपडेट! भारताने हल्ल्यात दोन पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली
20
भारताने हाणून पाडला 'नापाक' हल्ल्याचा प्रयत्न! 'या' ठिकाणी पाकिस्तानची मिसाईल्स केली नष्ट

जिल्ह्यात नीचांकी ५४ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल चार महिन्यांनंतर सोमवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नीचांकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली. दिवसभरात अवघ्या ५४ नव्या ...

औरंगाबाद : जिल्ह्यात तब्बल चार महिन्यांनंतर सोमवारी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील नीचांकी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली. दिवसभरात अवघ्या ५४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात २०, तर ग्रामीण भागातील ३४ रुग्णांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरापाठोपाठ ग्रामीण भागातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ५३० एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार १४६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १९ आणि ग्रामीण भागातील ५५, अशा ७४ रुग्णांना सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना खुलताबाद येथील ६४ वर्षीय पुरुष, मुंडवाडी, कन्नड येथील ८० वर्षीय पुरुष, सिडको, एन-६, बजरंग चौक येथील ७७ वर्षीय महिला, शहाबाजार येथील ५७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण

मुकुंदवाडी १, कांचनवाडी ३, जाधववाडी १, दिशा नगरी १, बीड बायपास २, स्वामी समर्थ केंद्र १, ब्रिजवाडी १, चिकलठाणा १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटल १, एन-१ येथे १,अन्य ७.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १, माहोरा, ता. कन्नड १, भीमशक्तीनगर, सातारा गाव १, रांजणगाव शेणपुंजी १, गंगापूर १, अन्य २९.