शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीतील कर्बाने गाठला निचांक

By admin | Updated: August 31, 2014 01:11 IST

जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे.

जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी तिला विश्रांती देणे अनेकदा गरजेचे असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि जमिनीतील अन्नद्रवाचे अतिरेकी शोषण वाढल्यामुळे कर्बाचे प्रमाण ०.३ ते ०.५ असे झाले आहे. कर्बाला जर जमिनीचा श्वास म्हटले तर ती जमिन आता मृत घोषीत करावी की काय अशी पाळी आली आहे, अशी प्रतिक्रीया पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक वर्षे काम करणारे पर्यावरणवादी विचारवंत सय्यद एस.बी.यांनी दिली आहे.मराठवाड्यात गेल्या पंधरा वर्षात खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर वाढले. उसाचे क्षेत्र वाढले. त्या तुलनेत जमिनीत पाणी झिरपविण्याचे प्रमाण कमी झाले, असे मराठवाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालीदास आपेट यांनी सांगितले. सध्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ८५८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.पुणे येथे गुण नियंत्रण विभागाचे संचालक असलेले जयंत देशमुख म्हणाले, मराठवाड्यात ४० टक्के जमीन हलकी आहे. नगदी पिकांच्या रेलचेलीच्या काळात आलटून पालटून जमिनीच्या पट्यांना विश्रांती देणे गरजेचे आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृद संधारण विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. डी. पाटील म्हणाले की माती परीक्षण सध्या महत्वाचे झाले आहे. मृद साक्षरता ही साक्षरतेच्या मोहिमेतील नवीन संकल्पना नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी आत्मसात करावी. तरच जमिनीची सुपिकता राहील. गेल्या चाळीस वर्षापासून जमिनीची सेंद्रीय घटकांची मात्रा कमी कमी होत आहे. सध्या हे प्रमाण ०.३ ते०.५ आहे. जमिनीच्या एक हेक्टर तुकड्यातून आपण १८० किलो नत्र, पालष, स्फुरद, गंधक, पिकाद्वारे काढीत असतो आणि त्या तुलनेत फक्त १२० किलो सेंद्रीय खत देतो.जमिनीत ‘मल्टी डिफेसेंन्सी’ होत आहे, असे ही डॉ. पाटील म्हणाले. लोह , जस्त यांची कमतरता हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे एकूण जमिनीची सुपिकता सध्या सलाईनवर आहे, अशी चिंता मान्यवरांनी व्यक्त केली. जमिनितील कर्ब वाढविण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. जमिनितील कर्ब वाढला तरच सुपिकता वाढेल परिणामी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खताचा वापर करणे काळाची गरज बनली आहे, असे झाले तरच जमिनितील कर्ब वाढू शकतो.