शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

जमिनीतील कर्बाने गाठला निचांक

By admin | Updated: August 31, 2014 01:11 IST

जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे.

जगदीश पिंगळे , बीड मराठवाड्यातील पीक लागवडीच्या एकूण क्षेत्रापैकी ५० टक्केच्यावर जमिनी नापिक होत असून जमिनीतील कर्बाचे प्रमाण केवळ ०.३ ते ०.५ पर्यत गेले आहे. जमिनीचा पोत सांभाळण्यासाठी तिला विश्रांती देणे अनेकदा गरजेचे असते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि जमिनीतील अन्नद्रवाचे अतिरेकी शोषण वाढल्यामुळे कर्बाचे प्रमाण ०.३ ते ०.५ असे झाले आहे. कर्बाला जर जमिनीचा श्वास म्हटले तर ती जमिन आता मृत घोषीत करावी की काय अशी पाळी आली आहे, अशी प्रतिक्रीया पाणलोट क्षेत्रात गेल्या अनेक वर्षे काम करणारे पर्यावरणवादी विचारवंत सय्यद एस.बी.यांनी दिली आहे.मराठवाड्यात गेल्या पंधरा वर्षात खाजगी आणि सहकारी क्षेत्रातील साखर कारखाने मोठ्या प्रमाणावर वाढले. उसाचे क्षेत्र वाढले. त्या तुलनेत जमिनीत पाणी झिरपविण्याचे प्रमाण कमी झाले, असे मराठवाडा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष कालीदास आपेट यांनी सांगितले. सध्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि अहमदनगर जिल्ह्यातील १ लाख ८३ हजार ८५८ हेक्टर जमीन सिंचनाखाली येते.पुणे येथे गुण नियंत्रण विभागाचे संचालक असलेले जयंत देशमुख म्हणाले, मराठवाड्यात ४० टक्के जमीन हलकी आहे. नगदी पिकांच्या रेलचेलीच्या काळात आलटून पालटून जमिनीच्या पट्यांना विश्रांती देणे गरजेचे आहे.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मृद संधारण विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. डी. पाटील म्हणाले की माती परीक्षण सध्या महत्वाचे झाले आहे. मृद साक्षरता ही साक्षरतेच्या मोहिमेतील नवीन संकल्पना नव्या पिढीतील शेतकऱ्यांनी आत्मसात करावी. तरच जमिनीची सुपिकता राहील. गेल्या चाळीस वर्षापासून जमिनीची सेंद्रीय घटकांची मात्रा कमी कमी होत आहे. सध्या हे प्रमाण ०.३ ते०.५ आहे. जमिनीच्या एक हेक्टर तुकड्यातून आपण १८० किलो नत्र, पालष, स्फुरद, गंधक, पिकाद्वारे काढीत असतो आणि त्या तुलनेत फक्त १२० किलो सेंद्रीय खत देतो.जमिनीत ‘मल्टी डिफेसेंन्सी’ होत आहे, असे ही डॉ. पाटील म्हणाले. लोह , जस्त यांची कमतरता हा गंभीर मुद्दा आहे. त्यामुळे एकूण जमिनीची सुपिकता सध्या सलाईनवर आहे, अशी चिंता मान्यवरांनी व्यक्त केली. जमिनितील कर्ब वाढविण्यासाठी व्यापक स्वरुपात प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. जमिनितील कर्ब वाढला तरच सुपिकता वाढेल परिणामी उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रीय खताचा वापर करणे काळाची गरज बनली आहे, असे झाले तरच जमिनितील कर्ब वाढू शकतो.