शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

अतिवृष्टीग्रस्त ४३,४२० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद ः अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. त्यात सतत ...

औरंगाबाद ः अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. त्यात सतत सुरू असलेल्या पावसाने नुकसान वाढले असून पहिल्या टप्प्यातील ४२ हजार ८९८ शेतांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले, तर ४३ हजार ४२० नुकसानीच्या सूचना रद्द करण्यात आल्या असून, २५ हजार ५३५ शेतांचे सर्वेक्षण बाकी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. विमा कंपनीकडून ५८ हजार पिकांचे सर्व्हे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला.

एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून, गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पुन्हा नुकसानीच्या सुमारे ७० हजारांवर शेतकऱ्यांची माहिती कंपनीकडे आली आहे. यात मका, कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून वाहून गेल्याने विमा नसलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.

१५ दिवस उलटूनही पंचनामे अपूर्णच

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ११ सप्टेंबरला पाच दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असे सांगितले होते. त्याला १५ दिवस उलटले तरी अद्याप प्राथमिक नुकसानीचे आकडे कृषीसह महसूल विभागांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण होतील कधी आणि नुकसानभरपाई मिळेल कधी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

आणखी ७० हजार दाव्यांची शक्यता

जिल्ह्यात ६७ हजार दाव्यांपैकी ५८ हजार शेतांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. ४३ हजार सूचना रद्द होण्यात बहुतांश सूचना एकाच शेताच्या वारंवार आलेल्या असल्याने आकडा वाढलेला दिसतो. नुकत्याच झालेल्या नुकसानीच्या आणखी सुमारे ७० हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण होणार आहे. पंचनाम्यांतून नुकसान ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार द्याव्यांची रक्कम कंपनी शेतकऱ्यांना अदा करेल.

- रामनाथ भिंगारे, पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक