शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

अतिवृष्टीग्रस्त ४३,४२० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद ः अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. त्यात सतत ...

औरंगाबाद ः अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. त्यात सतत सुरू असलेल्या पावसाने नुकसान वाढले असून पहिल्या टप्प्यातील ४२ हजार ८९८ शेतांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले, तर ४३ हजार ४२० नुकसानीच्या सूचना रद्द करण्यात आल्या असून, २५ हजार ५३५ शेतांचे सर्वेक्षण बाकी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. विमा कंपनीकडून ५८ हजार पिकांचे सर्व्हे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला.

एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून, गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पुन्हा नुकसानीच्या सुमारे ७० हजारांवर शेतकऱ्यांची माहिती कंपनीकडे आली आहे. यात मका, कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून वाहून गेल्याने विमा नसलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.

१५ दिवस उलटूनही पंचनामे अपूर्णच

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ११ सप्टेंबरला पाच दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असे सांगितले होते. त्याला १५ दिवस उलटले तरी अद्याप प्राथमिक नुकसानीचे आकडे कृषीसह महसूल विभागांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण होतील कधी आणि नुकसानभरपाई मिळेल कधी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

आणखी ७० हजार दाव्यांची शक्यता

जिल्ह्यात ६७ हजार दाव्यांपैकी ५८ हजार शेतांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. ४३ हजार सूचना रद्द होण्यात बहुतांश सूचना एकाच शेताच्या वारंवार आलेल्या असल्याने आकडा वाढलेला दिसतो. नुकत्याच झालेल्या नुकसानीच्या आणखी सुमारे ७० हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण होणार आहे. पंचनाम्यांतून नुकसान ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार द्याव्यांची रक्कम कंपनी शेतकऱ्यांना अदा करेल.

- रामनाथ भिंगारे, पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक