शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अतिवृष्टीग्रस्त ४३,४२० शेतकऱ्यांच्या नुकसानीचे दावे रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:02 IST

औरंगाबाद ः अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. त्यात सतत ...

औरंगाबाद ः अतिवृष्टीने जिल्ह्यात १.७३ लाख हेक्टर नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. त्यात सतत सुरू असलेल्या पावसाने नुकसान वाढले असून पहिल्या टप्प्यातील ४२ हजार ८९८ शेतांच्या नुकसानीचे सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आले, तर ४३ हजार ४२० नुकसानीच्या सूचना रद्द करण्यात आल्या असून, २५ हजार ५३५ शेतांचे सर्वेक्षण बाकी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. विमा कंपनीकडून ५८ हजार पिकांचे सर्व्हे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला.

एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीकडून पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू असून, गेल्या आठवडाभरात झालेल्या पावसाने पुन्हा नुकसानीच्या सुमारे ७० हजारांवर शेतकऱ्यांची माहिती कंपनीकडे आली आहे. यात मका, कपाशीचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जमीन खरडून वाहून गेल्याने विमा नसलेल्या शेतकऱ्यांचेही नुकसानीचे प्रमाण मोठे आहे. शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून जोर धरत आहे.

१५ दिवस उलटूनही पंचनामे अपूर्णच

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ११ सप्टेंबरला पाच दिवसांत नुकसानीचे पंचनामे पूर्ण होतील, असे सांगितले होते. त्याला १५ दिवस उलटले तरी अद्याप प्राथमिक नुकसानीचे आकडे कृषीसह महसूल विभागांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण होतील कधी आणि नुकसानभरपाई मिळेल कधी, असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

आणखी ७० हजार दाव्यांची शक्यता

जिल्ह्यात ६७ हजार दाव्यांपैकी ५८ हजार शेतांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. पुढील दोन दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईल. ४३ हजार सूचना रद्द होण्यात बहुतांश सूचना एकाच शेताच्या वारंवार आलेल्या असल्याने आकडा वाढलेला दिसतो. नुकत्याच झालेल्या नुकसानीच्या आणखी सुमारे ७० हजार शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण होणार आहे. पंचनाम्यांतून नुकसान ठरविण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार द्याव्यांची रक्कम कंपनी शेतकऱ्यांना अदा करेल.

- रामनाथ भिंगारे, पीकविमा कंपनीचे जिल्हा समन्वयक