शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनी एकदाच अपक्षावर दाखवला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:07 IST

लोकसभेच्या १३ निवडणुकांमध्ये १०० अपक्षांनी नशीब अजमावले.

ठळक मुद्देशिवसेनेच्या पाठिंब्यावर मोरेश्वर सावे विजयी१३ निवडणुकांमध्ये १०० उमेदवारांनी अजमावले नशीब

- राम शिनगारे

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकांमध्ये नाराजांना संधी नाकारल्यानंतर अपक्ष उभे राहून नशीब अजमावण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. लोकसभेच्या १३ निवडणुकांमध्ये १०० अपक्षांनी नशीब अजमावले. त्यातील शिवसेनेने पाठिंबा दिलेले मोरेश्वर सावे यांचा अपवाद वगळता एकालाही विजय संपादन करता आला नाही. २००९ साली शांतीगिरी महाराज यांनी १ लाख ४८ हजार २६ एवढी मते घेत अपक्षांमध्ये सर्वाधिक मते घेण्याचा पराक्रम केला आहे.

देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना १९५२ साली सुरुवात झाली. पहिल्या तीन लोकसभा निवडणुका होईपर्यंत औरंगाबादेत दुहेरीच लढत झाली. १९६७ सालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला. एमएसपीएफ मोहम्मद यांनी या निवडणुकीत १७ हजार २६६ मते घेतली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत अपक्षांची संख्या वाढतच गेली. १९७१ साली तीन अपक्षांनी नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अत्यल्प मते मिळाली. १९७७, १९८० च्या निवडणुकीत अपक्षांना उपद्रव मूल्यही दाखविता आले नाही.

१९८४ च्या निवडणुकीत अंडरवर्ल्डचा डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित-मुस्लिम अल्पसंख्याक महासंघाने पाठिंबा दिलेले खालीद जहीद यांनी ९.१० टक्के मते घेतली. याच निवडणुकीत ‘भारिप’चा पाठिंबा असणारे बी. एच. गायकवाड यांनीही ४.४७ टक्के मते घेतली होती. या दोघांना अनुक्रमे ४३ हजार ८७५ आणि २१ हजार ५४६ मते घेतली होती. ही निवडणूक हाजी मस्तान यांच्या प्रचार सभांमुळे चांगलीच गाजली होती. १९८९ साली शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत त्यांना ३ लाख २२ हजार ४६७ मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील यांना ३ लाख ४ हजार ६४३ मते मिळाली. यात मोरेश्वर सावे १७ हजार ८२४ मतांनी निवडून आले.

१९९१ साली झालेल्या निवडणुकीत तब्बल १६ अपक्षांनी नशीब अजमावले. मात्र, कोणाचेही डिपॉझिटही वाचले नाही. १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेने मोरेश्वर सावे यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. याचवेळी तेजस्विनी रायभान जाधव यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. यात सावे यांना ४२ हजार ९२७ आणि जाधव यांना २३ हजार २८४ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर अपक्ष उमेदवारांची संख्याही आगामी ३ लोकसभा निवडणुकीत १, २ आणि ३ एवढी मर्यादित होती.

२००९ साली झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांची चांगलीच दमछाक केली. त्यांना १ लाख ४८ हजार २६ मते मिळाली होती. या निवडणुकीत इतर अपक्षांना मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाला. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत १७ अपक्षांनी नशीब अजमावले. मात्र, कोणालाही यश मिळाले नाही. यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत १० अपक्ष नशीब अजमावत आहेत. त्यात कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांचा समावेश असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

वर्ष     अपक्ष१९६७    ११९७१    ३१९७२१९८०    ७१९८४   १११९८९    ८१९९१  १६१९९६  १६१९९८   ११९९९   २२००४   ३२००९  १३२०१४  १७------------------एकूण  १००चौकटनिवडणूक : २०१९एकुण : १३अपक्ष : १०

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019