शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादकरांनी एकदाच अपक्षावर दाखवला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 23:07 IST

लोकसभेच्या १३ निवडणुकांमध्ये १०० अपक्षांनी नशीब अजमावले.

ठळक मुद्देशिवसेनेच्या पाठिंब्यावर मोरेश्वर सावे विजयी१३ निवडणुकांमध्ये १०० उमेदवारांनी अजमावले नशीब

- राम शिनगारे

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकांमध्ये नाराजांना संधी नाकारल्यानंतर अपक्ष उभे राहून नशीब अजमावण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. लोकसभेच्या १३ निवडणुकांमध्ये १०० अपक्षांनी नशीब अजमावले. त्यातील शिवसेनेने पाठिंबा दिलेले मोरेश्वर सावे यांचा अपवाद वगळता एकालाही विजय संपादन करता आला नाही. २००९ साली शांतीगिरी महाराज यांनी १ लाख ४८ हजार २६ एवढी मते घेत अपक्षांमध्ये सर्वाधिक मते घेण्याचा पराक्रम केला आहे.

देशात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांना १९५२ साली सुरुवात झाली. पहिल्या तीन लोकसभा निवडणुका होईपर्यंत औरंगाबादेत दुहेरीच लढत झाली. १९६७ सालच्या निवडणुकीत पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला. एमएसपीएफ मोहम्मद यांनी या निवडणुकीत १७ हजार २६६ मते घेतली. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत अपक्षांची संख्या वाढतच गेली. १९७१ साली तीन अपक्षांनी नशीब अजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अत्यल्प मते मिळाली. १९७७, १९८० च्या निवडणुकीत अपक्षांना उपद्रव मूल्यही दाखविता आले नाही.

१९८४ च्या निवडणुकीत अंडरवर्ल्डचा डॉन हाजी मस्तान आणि जोगेंद्र कवाडे यांनी स्थापन केलेल्या दलित-मुस्लिम अल्पसंख्याक महासंघाने पाठिंबा दिलेले खालीद जहीद यांनी ९.१० टक्के मते घेतली. याच निवडणुकीत ‘भारिप’चा पाठिंबा असणारे बी. एच. गायकवाड यांनीही ४.४७ टक्के मते घेतली होती. या दोघांना अनुक्रमे ४३ हजार ८७५ आणि २१ हजार ५४६ मते घेतली होती. ही निवडणूक हाजी मस्तान यांच्या प्रचार सभांमुळे चांगलीच गाजली होती. १९८९ साली शिवसेनेचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार मोरेश्वर सावे यांनी बाजी मारली. या निवडणुकीत त्यांना ३ लाख २२ हजार ४६७ मते मिळाली, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुरेश पाटील यांना ३ लाख ४ हजार ६४३ मते मिळाली. यात मोरेश्वर सावे १७ हजार ८२४ मतांनी निवडून आले.

१९९१ साली झालेल्या निवडणुकीत तब्बल १६ अपक्षांनी नशीब अजमावले. मात्र, कोणाचेही डिपॉझिटही वाचले नाही. १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेने मोरेश्वर सावे यांचे तिकीट कापल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली. याचवेळी तेजस्विनी रायभान जाधव यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. यात सावे यांना ४२ हजार ९२७ आणि जाधव यांना २३ हजार २८४ मते मिळाली होती. या निवडणुकीनंतर अपक्ष उमेदवारांची संख्याही आगामी ३ लोकसभा निवडणुकीत १, २ आणि ३ एवढी मर्यादित होती.

२००९ साली झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शांतीगिरी मौनगिरी महाराज यांनी शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरे यांची चांगलीच दमछाक केली. त्यांना १ लाख ४८ हजार २६ मते मिळाली होती. या निवडणुकीत इतर अपक्षांना मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळाला. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत १७ अपक्षांनी नशीब अजमावले. मात्र, कोणालाही यश मिळाले नाही. यावर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत १० अपक्ष नशीब अजमावत आहेत. त्यात कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांचा समावेश असल्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

वर्ष     अपक्ष१९६७    ११९७१    ३१९७२१९८०    ७१९८४   १११९८९    ८१९९१  १६१९९६  १६१९९८   ११९९९   २२००४   ३२००९  १३२०१४  १७------------------एकूण  १००चौकटनिवडणूक : २०१९एकुण : १३अपक्ष : १०

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९aurangabad-pcऔरंगाबादMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019