शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

शेतकऱ्यांच्या यशोगाथातून ‘लोकमत’ने केला प्रबोधनाचा जागर

By admin | Updated: December 12, 2014 00:53 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या महिनाभरात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे नवनवीन प्रयोग करून

लातूर : लातूर जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या महिनाभरात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे नवनवीन प्रयोग करून संकटावर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ‘लोकमत’ने वाचकांसमोर आणल्या. ‘आता रडायचं नाही, लढायचं...’ हा संदेश शेतकऱ्यांना गुरुवारच्या ‘हॅलो लातूर’मधून दिला. या उपक्रमाचे कौतुक वाचकांसह शेतकऱ्यांनी केले असून, गुरुवारी दिवसभर ‘लोकमत’ कार्यालयातील दूरध्वनी खणखणत होता. ‘लोकमत’वर एकप्रकारे वाचकांनी कौतुकांचा वर्षावच केला. लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी संकटांवर मात करून आपल्या शेतशिवारात प्रयोग केले आहेत. तुटपुंज्या पाण्यावर अनेक पिके घेऊन आपल्या संसारवेलीला फुलविले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आत्महत्येचा विचार सोडून पुन्हा शेतीत मन रमवून प्रयोग केले. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा शोध घेऊन ‘लोकमत’ने त्यांच्या यशोगाथा वाचकांसमोर आणल्या. यामुळे सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विश्वंभर गावंडे म्हणाले, कर्जबाजारीपणाला आत्महत्या हा काही उपाय नाही. त्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. ‘लोकमत’ने ‘हॅलो लातूर’च्या चारही पानांत प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा देऊन प्रबोधनाचा जागरच केला आहे. प्रशासन म्हणून आम्ही हे करण्यास कमी पडलो. पण ‘लोकमत’ने लोकांची नाडी ओळखून प्रबोधन केले आहे, हे खरोखरच कौतुकास पात्र असल्याचे ते म्हणाले.वर्तमानपत्र चाळताना कोठे ना कोठे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी दररोज वाचायला मिळते. परंतु, गुरुवारच्या अंकात ‘शेतकऱ्यांच्या यशोगाथा’ वाचायला मिळाल्या. रडत बसणारे शेतकरी नाहीत, हेही समजले. ‘लोकमत’चे खरोखरच कौतुक करायला हवे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एस. मोटे म्हणाले.शासनाने आता दुष्काळावर पॅकेज जाहीर केले आहे. उपाययोजना होतील, परंतु सारखेच नकारात्मक वाचायला आवडत नाही. परंतु, माध्यमात आम्हाला ते वाचावे लागते. याला बगल देत शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करू नये. स्वत:चा विकास स्वत: करावा, असा संदेश यशोगाथेतून ‘लोकमत’ने घरोघरी पोहोचविला, अशी भावना भाजपाचे जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)४पाऊसकाळ कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या मदतीवर जगणे आवडत नाही. म्हणून तर तो गळफास घेतोय. परंतु, हा पर्याय नाही. हा संदेश ‘लोकमत’ने यशोगाथेतून दिला, तो कौतुकास्पद आहे, असे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. गोविंद सिरसाट यांनी दूरध्वनीकरून सांगितले.