शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या यशोगाथातून ‘लोकमत’ने केला प्रबोधनाचा जागर

By admin | Updated: December 12, 2014 00:53 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या महिनाभरात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे नवनवीन प्रयोग करून

लातूर : लातूर जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून गेल्या महिनाभरात नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे नवनवीन प्रयोग करून संकटावर मात करणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा ‘लोकमत’ने वाचकांसमोर आणल्या. ‘आता रडायचं नाही, लढायचं...’ हा संदेश शेतकऱ्यांना गुरुवारच्या ‘हॅलो लातूर’मधून दिला. या उपक्रमाचे कौतुक वाचकांसह शेतकऱ्यांनी केले असून, गुरुवारी दिवसभर ‘लोकमत’ कार्यालयातील दूरध्वनी खणखणत होता. ‘लोकमत’वर एकप्रकारे वाचकांनी कौतुकांचा वर्षावच केला. लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी संकटांवर मात करून आपल्या शेतशिवारात प्रयोग केले आहेत. तुटपुंज्या पाण्यावर अनेक पिके घेऊन आपल्या संसारवेलीला फुलविले आहे. काही शेतकऱ्यांनी तर आत्महत्येचा विचार सोडून पुन्हा शेतीत मन रमवून प्रयोग केले. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांचा शोध घेऊन ‘लोकमत’ने त्यांच्या यशोगाथा वाचकांसमोर आणल्या. यामुळे सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव झाला. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विश्वंभर गावंडे म्हणाले, कर्जबाजारीपणाला आत्महत्या हा काही उपाय नाही. त्यावर मात करून पुढे गेले पाहिजे. ‘लोकमत’ने ‘हॅलो लातूर’च्या चारही पानांत प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा देऊन प्रबोधनाचा जागरच केला आहे. प्रशासन म्हणून आम्ही हे करण्यास कमी पडलो. पण ‘लोकमत’ने लोकांची नाडी ओळखून प्रबोधन केले आहे, हे खरोखरच कौतुकास पात्र असल्याचे ते म्हणाले.वर्तमानपत्र चाळताना कोठे ना कोठे शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी दररोज वाचायला मिळते. परंतु, गुरुवारच्या अंकात ‘शेतकऱ्यांच्या यशोगाथा’ वाचायला मिळाल्या. रडत बसणारे शेतकरी नाहीत, हेही समजले. ‘लोकमत’चे खरोखरच कौतुक करायला हवे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी टी.एस. मोटे म्हणाले.शासनाने आता दुष्काळावर पॅकेज जाहीर केले आहे. उपाययोजना होतील, परंतु सारखेच नकारात्मक वाचायला आवडत नाही. परंतु, माध्यमात आम्हाला ते वाचावे लागते. याला बगल देत शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करू नये. स्वत:चा विकास स्वत: करावा, असा संदेश यशोगाथेतून ‘लोकमत’ने घरोघरी पोहोचविला, अशी भावना भाजपाचे जि.प. सदस्य रामचंद्र तिरुके यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)४पाऊसकाळ कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. वास्तविक पाहता शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या मदतीवर जगणे आवडत नाही. म्हणून तर तो गळफास घेतोय. परंतु, हा पर्याय नाही. हा संदेश ‘लोकमत’ने यशोगाथेतून दिला, तो कौतुकास्पद आहे, असे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. गोविंद सिरसाट यांनी दूरध्वनीकरून सांगितले.