शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : लोकप्रतिनिधींकडून उत्तम नागरी सुविधांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 20:00 IST

महिलांशी संवाद साधून ‘लोकमत’ ने जाणून घेतल्या अपेक्षा

औरंगाबाद : कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार जिंकून आला तरी जोपर्यंत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लोकशाही पद्धती खऱ्या अर्थाने उपयोगात आली, असे म्हणता येत नाही. त्यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील काही महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

उत्तम नागरी सुविधांची गरज-समांतरचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला; पण आजही औरंगाबादकरांना पाण्यासाठी झुंजावे लागते. पाणीपुरवठा अल्प असून, अनियमित आहे. नियमितपणे टॅक्स भरूनही आज मुबलक पाणी नाही. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे. यासोबतच रस्ते हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे उत्तम नागरी सुविधा निर्माण करून देणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे.- मंजूषा कोरंगळीकर

पर्यटन स्थळांचा विकास व्हावा-औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, पर्यटन स्थळांचा अधिकाधिक विकास करून या मार्गे रोजगार निर्मिती करण्यासाठी लोकप्रतिनिधी इच्छुक नाहीत. परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून परदेशी चलन मोठ्या प्रमाणात शहरात येऊ शकते आणि अनेक उद्योगांना चालना मिळू शकते. म्हणून इतर अनेक गोष्टींबरोबरच लोकप्रतिनिधींनी पर्यटनाकडेही लक्ष द्यावे.- ऊर्मिला मगर

महिला सुरक्षितता महत्त्वाची-महिला मतदार अत्यंत जागरूकपणे मतदान करतात; पण लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सुरक्षेचा विचार अजिबात केला जात नाही. सकाळचे दहा असो की रात्रीचे दहा. महिला, तरुणी अजिबात सुरक्षित नाहीत. घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षितपणे घरी येऊ शकेलच याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. - अलका अमृतकर

प्रदूषणावर तोडगा आवश्यकप्रदूषित शहरांच्या यादीमध्ये औरंगाबाद शहराचे नाव बरेच आघाडीवर आहे. प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस अशीच वाढत राहिली, तर लवकरच प्रत्येकाला आॅक्सिजन मास्क लावून फिरावे लागेल.  वृक्ष लागवड आणि कचरा या दोन गोष्टींवर प्रामुख्याने काम व्हायला हवे. लोकप्रतिनिधींना जनता साथ देईलच; पण आधी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- निशी अग्रवाल

कचरा प्रश्नावर तोडगा हवाऔरंगाबादचा कचरा प्रश्न आता केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता जागतिक पातळीवर चर्चिला गेला आहे. वर्ष उलटून गेले तरी हा प्रश्न अजूनही पुरता सुटलेला नाही. आजही अनेक परिसरांमध्ये कचऱ्याच्या गाड्या अनियमित येतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढणारा आणि कचऱ्यापासून औरंगाबादकरांची मुक्तता करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. काहीच काम न करताही आपण निवडून येऊ शकतो, असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. - नीला रानडे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादWomenमहिला