शहरं
Join us  
Trending Stories
1
Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
2
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
3
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
4
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
5
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
6
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
7
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
8
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
9
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
10
बांगलादेशींना नोकरी देणाऱ्यांवर होणार कारवाई; राज्य सरकारच्या आदेशात काय?
11
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
12
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
13
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
14
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
15
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
16
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
17
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
18
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
19
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
20
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?

Lok Sabha Election 2019 : लोकप्रतिनिधींकडून उत्तम नागरी सुविधांची अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 20:00 IST

महिलांशी संवाद साधून ‘लोकमत’ ने जाणून घेतल्या अपेक्षा

औरंगाबाद : कोणत्याही पक्षाचा कोणताही उमेदवार जिंकून आला तरी जोपर्यंत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत लोकशाही पद्धती खऱ्या अर्थाने उपयोगात आली, असे म्हणता येत नाही. त्यामुळेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने शहरातील काही महिलांशी संवाद साधला आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

उत्तम नागरी सुविधांची गरज-समांतरचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला; पण आजही औरंगाबादकरांना पाण्यासाठी झुंजावे लागते. पाणीपुरवठा अल्प असून, अनियमित आहे. नियमितपणे टॅक्स भरूनही आज मुबलक पाणी नाही. वर्षानुवर्षे हीच परिस्थिती आहे. यासोबतच रस्ते हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे उत्तम नागरी सुविधा निर्माण करून देणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे.- मंजूषा कोरंगळीकर

पर्यटन स्थळांचा विकास व्हावा-औरंगाबाद शहर पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखले जाते. मात्र, पर्यटन स्थळांचा अधिकाधिक विकास करून या मार्गे रोजगार निर्मिती करण्यासाठी लोकप्रतिनिधी इच्छुक नाहीत. परदेशी पर्यटकांच्या माध्यमातून परदेशी चलन मोठ्या प्रमाणात शहरात येऊ शकते आणि अनेक उद्योगांना चालना मिळू शकते. म्हणून इतर अनेक गोष्टींबरोबरच लोकप्रतिनिधींनी पर्यटनाकडेही लक्ष द्यावे.- ऊर्मिला मगर

महिला सुरक्षितता महत्त्वाची-महिला मतदार अत्यंत जागरूकपणे मतदान करतात; पण लोकप्रतिनिधींकडून त्यांच्या सुरक्षेचा विचार अजिबात केला जात नाही. सकाळचे दहा असो की रात्रीचे दहा. महिला, तरुणी अजिबात सुरक्षित नाहीत. घराबाहेर पडलेली स्त्री सुरक्षितपणे घरी येऊ शकेलच याची खात्री आज कोणीही देऊ शकत नाही. लोकप्रतिनिधींनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. - अलका अमृतकर

प्रदूषणावर तोडगा आवश्यकप्रदूषित शहरांच्या यादीमध्ये औरंगाबाद शहराचे नाव बरेच आघाडीवर आहे. प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस अशीच वाढत राहिली, तर लवकरच प्रत्येकाला आॅक्सिजन मास्क लावून फिरावे लागेल.  वृक्ष लागवड आणि कचरा या दोन गोष्टींवर प्रामुख्याने काम व्हायला हवे. लोकप्रतिनिधींना जनता साथ देईलच; पण आधी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.- निशी अग्रवाल

कचरा प्रश्नावर तोडगा हवाऔरंगाबादचा कचरा प्रश्न आता केवळ शहरापुरताच मर्यादित न राहता जागतिक पातळीवर चर्चिला गेला आहे. वर्ष उलटून गेले तरी हा प्रश्न अजूनही पुरता सुटलेला नाही. आजही अनेक परिसरांमध्ये कचऱ्याच्या गाड्या अनियमित येतात. त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढणारा आणि कचऱ्यापासून औरंगाबादकरांची मुक्तता करणारा लोकप्रतिनिधी हवा आहे. काहीच काम न करताही आपण निवडून येऊ शकतो, असा जर कोणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे. - नीला रानडे

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९AurangabadऔरंगाबादWomenमहिला