शहरं
Join us  
Trending Stories
1
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
2
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
3
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
4
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
5
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
6
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
7
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
8
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
9
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल
10
आता फक्त ३ मिनिटांत भरा ITR! 'या' कंपनीने लॉन्च देशातील पहिला AI प्लॅटफॉर्म; अंतिम मुदतही वाढली
11
Nikki Murder Case : "दोन्ही जावई मुलींच्या पार्लरमधून पैसे चोरायचे, काहीच काम करत नव्हते"; ढसाढसा रडले वडील
12
AI ची कमाल, आता म्हातारपणही रोखणार, राहाल "चिरतरुण"! काय आहे चॅटबॉट रिव्हर्स एजिंग? जाणून घ्या
13
Ola Electric Share Price: ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी; नीति आयोगाच्या वृत्ताचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
14
गणेश चतुर्थी २०२५: राहु काळ कधी? ‘या’ शुभ मुहूर्तावर स्थापन करा गणपती; पाहा, चंद्रास्त वेळ
15
Pune: सिंहगडावरून बेपत्ता झालेला गौतम गायकवाड पाच दिवसांनी सापडला; कुठे होता, पोलिसांनी काय सांगितलं?
16
"मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि..." अजित पवारांनी घेतली संकर्षण कऱ्हाडेची फिरकी
17
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
18
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
19
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
20
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य

तेलघणा शाळेला आठ दिवसांपासून कुलूप

By admin | Updated: June 23, 2014 23:50 IST

घाटनांदूर: आरटीई नुसार सर्वांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले असले तरी त्यातील तरतुदी कठोर असतानाही तो कायदा धाब्यावर बसविण्याचा प्रकार घाटनांदूर आणि परिसरात होत आहे.

घाटनांदूर: आरटीई नुसार सर्वांना शिक्षण सक्तीचे करण्यात आले असले तरी त्यातील तरतुदी कठोर असतानाही तो कायदा धाब्यावर बसविण्याचा प्रकार घाटनांदूर आणि परिसरात होत आहे. शाळा सुरु होऊनही आठ दिवसांचा कालावधी उलटला असला तरी घाटनांदूरजवळील तेलघणा शाळेचे कुलूप अद्याप उघडलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.घाटनांदूर केंद्रांतर्गत असलेल्या तेलघणा येथील जि. प. शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत. एस. एस. चव्हाण या एकट्या महिला कर्मचाऱ्यावर शाळेचा कारभार चालतो. या शाळेवर नियुक्त करण्यात आलेली दुसरी शिक्षिका चंद्रकला भारती या दोन वर्षापासून प्रतिनियुक्तीवर वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. उन्हाळी सुट्टया संपल्यानंतर १६ जून रोजी शाळा सुरु होणे अपेक्षित होते. मात्र घाटनांदूर केंद्रांतर्गत येणाऱ्या तेलघना शाळेचे कुलूप अद्याप न उघडण्याचा प्रताप येथे दिसून येत आहे. एस. एस. चव्हाण या रजेवर असल्याने गट शिक्षणाधिकाऱ्यांनी तेलघना शाळेवर नियुक्त असलेल्या दुसऱ्या शिक्षिका चंद्रकला भारती यांना जा. क्र. २७५/१४ दि. १० जून २०१४ या आदेश पत्रान्वये जि. प. शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले होते. मात्र सदरील शिक्षिकेने गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लेखी आदेश धाब्यावर बसवत शाळेकडे अद्यापही फिरकलेले नाहीत. शिक्षिकांच्या या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.भारती या २०१२-१३ मध्ये गट शिक्षणाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथे प्रतिनियुक्तीवर होत्या. १३-१४ या वर्षात अंबासाखर जि. प. केंदांतर्गत तहसील कार्यालय, अंबाजोगाई, रविवार पेठ केंद्र, अंबाजोगाई, मांडवा जि. प. शाळा आदी ठिकाणी प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. अंबाजोगाईचे तहसीलदार ९ जून रोजी कार्यमुक्त केले तर गट शिक्षणाधिकारी कार्यालयाने १० जूनच्या लेखी पत्रान्वये तेलघना जि. प. शाळेवर रुजू होण्याचे आदेश दिले. मात्र आदेश धाब्यावर बसवून सदरील शिक्षिका अद्याप शाळेकडे फिरकलीच नाही. शाळा सुरु होण्याअगोदर शिक्षकांनी शाळेत येऊन शाळेचा परिसर पाहणी करुन स्वच्छ करणे अपेक्षित असते. मात्र अद्यापही शाळेकडे शिक्षकच फिरकले नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे.ग्रामस्थांच्या तक्रारीवरुन गट शिक्षणाधिकारी बावणे व केंद्रप्रमुख स्वामी यांनी शाळेला भेट देऊन तात्पुरता शिक्षक देण्याचा घाट घातला होता. मात्र बाबासाहेब सिरसाट यांच्यासह इतर शिक्षकांनी कायमस्वरुपी शिक्षक देण्याची मागणी केल्याने अद्यापही शाळेला कुलूपच आहे. गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.याबाबत शिक्षणाधिकारी देवगुडे यांनी सांगितले की, हा प्रकार भयंकर असून आरटीई अ‍ॅक्टनुसार प्रतिनियुक्ती देता येतच नाही. वेतन अदा करता येत नसल्याचे संबंधित शिक्षिकेवर कारवाई करण्याचे संकेत दिले.गट शिक्षणाधिकारी बावणे व केंद्रप्रमुख स्वामी म्हणाले की, शाळा न उघडणे हा गुन्हा असून संबंधित शिक्षिकेवर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करणार आहोत. (वार्ताहर)