शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
3
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
4
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
5
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
6
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
7
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
8
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
9
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
10
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
11
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
12
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
13
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
14
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
15
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
16
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
17
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
18
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
19
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
20
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊन वर्षपूर्ती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:04 IST

लाॅकडाऊन वर्षपूर्ती : भयंकर अशा शुकशुकाटाचे ‘ते’ दिवस, उद्योग, व्यवसायांवर परिणाम, ‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षणाची नवी सुरुवातही औरंगाबाद ...

लाॅकडाऊन वर्षपूर्ती : भयंकर अशा शुकशुकाटाचे ‘ते’ दिवस, उद्योग, व्यवसायांवर परिणाम, ‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षणाची नवी सुरुवातही

औरंगाबाद : दिवसा उजेडी भयंकर असा शुकशुकाट... सुरुवातीचे काही दिवस घराघरांत आनंदाचे अन् नंतर चिंतेचे भंडार...उद्योग, व्यवसाय ठप्प, बेरोजगारीचे संकट, उदरनिर्वाहाचा प्रश्न... पण सोबतच कोरोनाला हरविण्याची जिद्द, एकमेकांना मदतीचा हात...‘वर्क फ्राॅम हाेम’, ऑनलाइन शिक्षण अशी नवी सुरुवात...एक ना अनेक अशा चांगल्या, वाईट गोष्टींचा अनुभव आणि त्यातून सावरण्याचा धडा लाॅकडाऊनने औरंगाबादकरांना शिकविला. २२ मार्च २०२० रोजी जनता कर्फ्यू आणि त्याच्या दुसर्याच दिवशी २३ मार्चपासून सुरू झालेल्या लाॅकडाऊनने औरंगाबादकरांच्या स्मृतीत कायमचे घर केले. या काळात ‘न भूतो न भविष्यती’ अशी कोरोना बंदी म्हणजेच लाॅकडाऊन सर्वसामान्यांनी अनुभवली.

जगभरात हाहाकार माजविणाऱ्या कोरोना महामारीने देशात, राज्यात आणि औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश केला आणि त्यानंतर सर्वसामान्यांना लाॅकडाऊनला सामोरे जावे लागले. आजपर्यंत कधीही पाहिला नसेल असा बंद म्हणा, संचारबंदी म्हणा की, कर्फ्यू, या लाॅकडाऊनच्या माध्यमातून पाहायला मिळाले. अनेक क्षेत्रांवर त्याचा परिणाम झाला. काहींवर क्षणिक , तर काहींवर दूरगामी परिणाम झाला. परंतु सगळ्यांतून सावरत कोरोनाशी दोन हात करत औरंगाबादकरांनी पुढे पाऊल टाकणे सुरू केले. ‘मिशन बिगिन अगेन’ने जनजीवन सुरळीत झाले. परंतु कोरोनाच्या संकटाने पुन्हा डोके वर काढले. परिणामी, आता पुन्हा एकदा अंशत: लाॅकडाऊनला सामोरे जाण्याची वेळ ओढावली.

-----

१)कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चला जनता कर्फ्यू पाळण्यात आला. या दिवशी कोरोनाच्या अरिष्टाला हद्दपार करण्यासाठी औरंगाबादकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्या, थाळ्यांसह शंखनाद करत डाॅक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यंत्रणेप्रती नागरिकांनी सद्भावना व्यक्त केली.

२)जनता कर्फ्यूच्या उत्स्त्फूर्त प्रतिसादानंतर केंद्र आणि राज्य सरकारने २२ मार्च रोजी मध्यरात्रीपासून (२३ मार्च २०२०)कडक निर्बंध आणि अधिक व्यापक उपाययोजना जाहीर केल्या. संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

२)कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ मार्च रोजी पहाटे ५ वाजेपासून शहरासह जिल्ह्यात तत्कालिन जिल्हाधिकारी उदय चौधरी, तत्कालिन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले.

३)संचारबंदीची घोषणा होताच विविध वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची रस्त्यावर एकच गर्दी उसळली. २३ मार्चला रात्री ९ वाजल्यानंतर मात्र, रस्ते निर्मनुष्य झाले. ही स्थिती पुढील अनेक दिवस जिल्ह्यात पाहायला मिळाली. शहरात ‘न भूतो, न भविष्यती ’ अशी भयाण शांतता अनुभवास आली.

४)लाॅकडाऊनचा दुसरा टप्पा १५ एप्रिलपासून सुरू झाला. ज्या शहरांत, जिल्ह्यांत कोरोना साथीचा प्रसार जास्त प्रमाणात झाला आहे, अशा ठिकाणांहून प्रवास करून येणाऱ्यांना औरंगाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी बंधनकारक करण्यात आली.

५)जिल्ह्यातील सर्व औद्योगिक क्षेत्र, मोठे उद्योग, कारखानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. वाळूज उद्योगनरीतील ४ हजार लहान-मोठे कारखाने बंद ठेवण्यात आला. त्याचा उद्योगासह कामगारांना मोठा आर्थिक फटका बसला.

६)लाॅकडाऊनमुळे ‘वर्क फ्राॅम हाेम’ ही नवी संकल्पना पुढे आली. अनेक उद्योग, व्यवसाय, कार्यालयीन कामकास ‘वर्क फ्राॅम हाेम’ने सुरळीत ठेवण्यात आले. वर्षभरानंतर अनेक उद्योग, व्यवसाय याच पद्धतीने कामकाज सुरू ठेवत आहे.

७)कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लाॅकडाऊन पाळताना अनेकांना बेरोजगारी, आर्थिक संकटला सामोरे जावे लागले. रिक्षाचालकांपासून मोलमजुरी करणारे मजूर, कामगारांना उदरनिर्वाह करणे अवघड झाले. पण अशांसाठी सामाजिक संस्थांसह औरंगाबादकरांनी मदतीचा हात पुढे केला.

८)लाॅकडाऊनमुळे उपासमारीच्या भीतीने उद्योगनगरीत आलेल्या मजुरांनी गावी परतणे सुरू केले. मिळेल तिथंपर्यंत वाहनाने, पायी प्रवास करून कुटुंबासह मजुरांनी स्थलांतर सुरू केले.

९)मृत्यूचे तांडव काय असते, हे औरंगाबादसह संपूर्ण देशाने ८ मे २०२० अनुभवले. मध्यप्रदेशकडे रेल्वे रूळावरून पायीच निघालेल्या १६ मजुरांना मालगाडीने चिरडल्याची दुर्दैवी घटना सटाणा (ता. जि. औरंगाबाद) गावाजवळ घडली. या घटनेनंतर मजुरांना गावी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे साेडण्यात आल्या.

१०) राज्य शासनाने १ जून २०२० रोजी लाॅकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने सूट दिली. ‘मिशन बिगिन अगेन’ सुरू करून विविध सेवा सुरळीत करण्यात आल्या. शहरवासीयांचे जीवन सुरळीत झाले. मात्र, लाॅकडाऊनच्या वर्षपूर्तीच्या तोंडावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्हा पुन्हा एकदा अंशत: लाॅकडाऊनवर आला.