शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

निर्बंधांसह लॉकडाऊनमध्ये सवलत मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या स्तरातील लॉकडाऊनमधून सवलत मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यावर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली आहे. ...

औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या स्तरातील लॉकडाऊनमधून सवलत मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. त्यावर गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीतही चर्चा झाली आहे. काही निर्बंध ठेवून सवलत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी काय तयारी आहे, याअनुषंगाने विभागीय आयुक्तालयात थोरात यांनी शुक्रवारी बैठक घेतली व महसूल विभागातील काही अडचणी समजून घेतल्या.

कोरोनाच्या संकटामध्ये राज्यात झालेली आर्थिक घट आहे तशीच आहे. राज्याचे उत्पन्न वाढलेले नाही. जीएसटीचे अनुदान केंद्राकडून येणे बाकी आहे. शिवाय राज्यावर नैसर्गिक संकट आहे. त्याचेही परिणाम अर्थकारणावर होत आहेत. त्यामुळे सध्या व्यवहार, अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागतो आहे. तिसऱ्या लाटेत जीवितहानी होऊ नये, यासाठी शासन आणि जनतेची समान जबाबदारी असणार आहे. याचा विचार करूनच सवलतींचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.

चौकट...

आघाडीसाठी जे योग्य असेल ते करू

नाशिकमध्ये भाजप-मनसेची युती होणार असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आगामी निवडणुका एकत्र लढेल काय, यावर थोरात म्हणाले, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणे हे देशाच्या हिताचे आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असे मानणारे आम्ही आहोत. काँग्रेस निवडणुकांसाठी तयार आहे. स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आघाडीसाठी जे योग्य असेल ते करू. कोरोना संपला तर सर्व निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा होईल, असेही थोरात यावेळी म्हणाले.