शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
2
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
3
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
4
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
5
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
6
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
7
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
8
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
9
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
10
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
11
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
12
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
13
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
14
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
15
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
16
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
17
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
18
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
19
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
20
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने बंद झाले गप्पांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : बाजारपेठ बंद झाल्यावर दुकानाच्या ओट्यावर बसून व्यापारी गप्पा मारत बसत.... गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर चवीने चर्चा होत ...

औरंगाबाद : बाजारपेठ बंद झाल्यावर दुकानाच्या ओट्यावर बसून व्यापारी गप्पा मारत बसत.... गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर चवीने चर्चा होत असे. मध्यरात्रीपर्यंत या गप्पा रंगत असत. पण कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे शहरतील ठिकठिकाणचे हे गप्पाचे अड्डे बंद पडले. आता फक्त मोबाइलवरच बोलावे लागत आहे.

पूर्वी गुलमंडीवर रात्री रंगणाऱ्या गप्पांची सर्वत्र चर्चा होत असे. त्या रात्रीच्या गप्पातून जिल्ह्यातील राजकारणाला दिशा मिळत असे. किंगमेकर दादासाहेब गणोरकर गेल्यापासून त्यांचा येथील गप्पांचा अड्डा बंद झाला. मात्र, नंतर व्यापारी गुलमंडीवरील बंद दुकानांसमोरील ओट्यावर बसून गप्पा मारत असत. ही परंपरा मागील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सुरू राहिली. मोंढा, जाधववाडी येथील व्यापारीही या गुलमंडीवरील गप्पामध्ये सहभागी होत असत. रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा रंगत असत त्यात विषयाला फोडणी देण्यासाठी काही पत्रकारही अधूनमधून येत होते.

अशाच गप्पा शहागंजतील गांधी पुतळा चौकात होत असे. रात्री ९ वाजता बाजारपेठ बंद झाली की, जेवण करून सर्वजण येथील कपड्याच्या दुकानाच्या ओट्यावर बसत व विविध विषयांचे किस्से पहाटेपर्यंत गप्पा रंगत होत्या.

राजबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोरील ओटा तर गप्पा मारण्यासाठी प्रसिद्धच होता. येथे राजबाजार मित्रमंडळ गप्पा मारत असत. त्यात काही राजकारणी येऊन सहभागी होत.

कासारी बाजारातील व्यापारीही गप्पा मारण्यात कमी नव्हते. कासारी बाजार चौकात सर्व सराफा व्यापारी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत मनसोक्त गप्पा मारत. त्यातील अनेक व्यापारी असे होते की, त्यांना येथे येऊन गप्पा मारल्याशिवाय झोप येतच नव्हती. याशिवाय बुढीलेन परिसर, शहागंजमधील बालाजी धर्मशाळा, जाधवमंडीतील जबरे हनुमान मंदिरासमोरही असा गप्पा मारण्याचा जुना अड्डा होता. अलीकडच्या काळात बिबीका मकबरा समोरील चौकात निवृत्त कर्मचारी, अधिकारी यांचा गप्पांचा फड रंगत होता. पण मागील वर्षी लॉकडाऊननंतर गप्पांचे हे अड्डे बंदच झाले. तिथे रंगलेल्या गप्पांच्या आठवणी वर्षभरानंतरही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. मोबाइलवर विषय निघाला की, आठवणी उफाळून येतात.

चौकट

पान गल्ल्याही बनल्या होत्या गप्पांचे अड्डे

शहरात मोंढा नाका, उस्मानपुरा या भागातील पानगल्लीत रात्री ९ वाजेनंतर काही व्यापारी, राजकारणी, शासकीय कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार यांचे गप्पाचे नवे अड्डे बनले होते. येथील गप्पांमधूनच शहरात काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. मात्र, हे अड्डेही मागील मार्चनंतर बंद झाले.