शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

लॉकडाऊनने बंद झाले गप्पांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : बाजारपेठ बंद झाल्यावर दुकानाच्या ओट्यावर बसून व्यापारी गप्पा मारत बसत.... गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर चवीने चर्चा होत ...

औरंगाबाद : बाजारपेठ बंद झाल्यावर दुकानाच्या ओट्यावर बसून व्यापारी गप्पा मारत बसत.... गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर चवीने चर्चा होत असे. मध्यरात्रीपर्यंत या गप्पा रंगत असत. पण कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे शहरतील ठिकठिकाणचे हे गप्पाचे अड्डे बंद पडले. आता फक्त मोबाइलवरच बोलावे लागत आहे.

पूर्वी गुलमंडीवर रात्री रंगणाऱ्या गप्पांची सर्वत्र चर्चा होत असे. त्या रात्रीच्या गप्पातून जिल्ह्यातील राजकारणाला दिशा मिळत असे. किंगमेकर दादासाहेब गणोरकर गेल्यापासून त्यांचा येथील गप्पांचा अड्डा बंद झाला. मात्र, नंतर व्यापारी गुलमंडीवरील बंद दुकानांसमोरील ओट्यावर बसून गप्पा मारत असत. ही परंपरा मागील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सुरू राहिली. मोंढा, जाधववाडी येथील व्यापारीही या गुलमंडीवरील गप्पामध्ये सहभागी होत असत. रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा रंगत असत त्यात विषयाला फोडणी देण्यासाठी काही पत्रकारही अधूनमधून येत होते.

अशाच गप्पा शहागंजतील गांधी पुतळा चौकात होत असे. रात्री ९ वाजता बाजारपेठ बंद झाली की, जेवण करून सर्वजण येथील कपड्याच्या दुकानाच्या ओट्यावर बसत व विविध विषयांचे किस्से पहाटेपर्यंत गप्पा रंगत होत्या.

राजबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोरील ओटा तर गप्पा मारण्यासाठी प्रसिद्धच होता. येथे राजबाजार मित्रमंडळ गप्पा मारत असत. त्यात काही राजकारणी येऊन सहभागी होत.

कासारी बाजारातील व्यापारीही गप्पा मारण्यात कमी नव्हते. कासारी बाजार चौकात सर्व सराफा व्यापारी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत मनसोक्त गप्पा मारत. त्यातील अनेक व्यापारी असे होते की, त्यांना येथे येऊन गप्पा मारल्याशिवाय झोप येतच नव्हती. याशिवाय बुढीलेन परिसर, शहागंजमधील बालाजी धर्मशाळा, जाधवमंडीतील जबरे हनुमान मंदिरासमोरही असा गप्पा मारण्याचा जुना अड्डा होता. अलीकडच्या काळात बिबीका मकबरा समोरील चौकात निवृत्त कर्मचारी, अधिकारी यांचा गप्पांचा फड रंगत होता. पण मागील वर्षी लॉकडाऊननंतर गप्पांचे हे अड्डे बंदच झाले. तिथे रंगलेल्या गप्पांच्या आठवणी वर्षभरानंतरही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. मोबाइलवर विषय निघाला की, आठवणी उफाळून येतात.

चौकट

पान गल्ल्याही बनल्या होत्या गप्पांचे अड्डे

शहरात मोंढा नाका, उस्मानपुरा या भागातील पानगल्लीत रात्री ९ वाजेनंतर काही व्यापारी, राजकारणी, शासकीय कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार यांचे गप्पाचे नवे अड्डे बनले होते. येथील गप्पांमधूनच शहरात काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. मात्र, हे अड्डेही मागील मार्चनंतर बंद झाले.