शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने बंद झाले गप्पांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:05 IST

औरंगाबाद : बाजारपेठ बंद झाल्यावर दुकानाच्या ओट्यावर बसून व्यापारी गप्पा मारत बसत.... गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर चवीने चर्चा होत ...

औरंगाबाद : बाजारपेठ बंद झाल्यावर दुकानाच्या ओट्यावर बसून व्यापारी गप्पा मारत बसत.... गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणावर चवीने चर्चा होत असे. मध्यरात्रीपर्यंत या गप्पा रंगत असत. पण कोरोनाचा संसर्ग व लॉकडाऊनमुळे शहरतील ठिकठिकाणचे हे गप्पाचे अड्डे बंद पडले. आता फक्त मोबाइलवरच बोलावे लागत आहे.

पूर्वी गुलमंडीवर रात्री रंगणाऱ्या गप्पांची सर्वत्र चर्चा होत असे. त्या रात्रीच्या गप्पातून जिल्ह्यातील राजकारणाला दिशा मिळत असे. किंगमेकर दादासाहेब गणोरकर गेल्यापासून त्यांचा येथील गप्पांचा अड्डा बंद झाला. मात्र, नंतर व्यापारी गुलमंडीवरील बंद दुकानांसमोरील ओट्यावर बसून गप्पा मारत असत. ही परंपरा मागील वर्षी मार्च महिन्यापर्यंत सुरू राहिली. मोंढा, जाधववाडी येथील व्यापारीही या गुलमंडीवरील गप्पामध्ये सहभागी होत असत. रात्री १२ वाजेपर्यंत गप्पा रंगत असत त्यात विषयाला फोडणी देण्यासाठी काही पत्रकारही अधूनमधून येत होते.

अशाच गप्पा शहागंजतील गांधी पुतळा चौकात होत असे. रात्री ९ वाजता बाजारपेठ बंद झाली की, जेवण करून सर्वजण येथील कपड्याच्या दुकानाच्या ओट्यावर बसत व विविध विषयांचे किस्से पहाटेपर्यंत गप्पा रंगत होत्या.

राजबाजार येथील संस्थान गणपती मंदिरासमोरील ओटा तर गप्पा मारण्यासाठी प्रसिद्धच होता. येथे राजबाजार मित्रमंडळ गप्पा मारत असत. त्यात काही राजकारणी येऊन सहभागी होत.

कासारी बाजारातील व्यापारीही गप्पा मारण्यात कमी नव्हते. कासारी बाजार चौकात सर्व सराफा व्यापारी रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत मनसोक्त गप्पा मारत. त्यातील अनेक व्यापारी असे होते की, त्यांना येथे येऊन गप्पा मारल्याशिवाय झोप येतच नव्हती. याशिवाय बुढीलेन परिसर, शहागंजमधील बालाजी धर्मशाळा, जाधवमंडीतील जबरे हनुमान मंदिरासमोरही असा गप्पा मारण्याचा जुना अड्डा होता. अलीकडच्या काळात बिबीका मकबरा समोरील चौकात निवृत्त कर्मचारी, अधिकारी यांचा गप्पांचा फड रंगत होता. पण मागील वर्षी लॉकडाऊननंतर गप्पांचे हे अड्डे बंदच झाले. तिथे रंगलेल्या गप्पांच्या आठवणी वर्षभरानंतरही अनेकांच्या मनात ताज्या आहेत. मोबाइलवर विषय निघाला की, आठवणी उफाळून येतात.

चौकट

पान गल्ल्याही बनल्या होत्या गप्पांचे अड्डे

शहरात मोंढा नाका, उस्मानपुरा या भागातील पानगल्लीत रात्री ९ वाजेनंतर काही व्यापारी, राजकारणी, शासकीय कंत्राटदार, बांधकाम व्यावसायिक, पत्रकार यांचे गप्पाचे नवे अड्डे बनले होते. येथील गप्पांमधूनच शहरात काही सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. मात्र, हे अड्डेही मागील मार्चनंतर बंद झाले.