शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

पीककर्जासाठी आमदारांसमक्ष ठोकले बँकेला कुलूप

By admin | Updated: July 9, 2015 00:23 IST

राजूर : शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटपासह पुनर्गठणाच्या कामात बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारीवरून

राजूर : शेतकऱ्यांचे पीक कर्ज वाटपासह पुनर्गठणाच्या कामात बँकेचे अधिकारी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक करीत असल्याच्या तक्रारीवरून आ. संतोष दानवे यांनी दि.८ रोजी राजूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅक गाठून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आ. दानवेंचा रौद्रावतार पाहून अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली होती. संतप्त शेतकरी व कार्यकर्त्यांनी आ. दानवेंच्या उपस्थितीत बँकेला कुलूप ठोकले.राजूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे शाखाधिकारी ए.एस. कुलकर्णी हे शेतकऱ्यांचे पुनर्गठण व नवीन वीक कर्ज वाटपात शेतकऱ्यांची जाणीवपुर्वक अडवणुक करीत असल्याच्या तक्रारी मोठया प्रमाणात वाढल्या होत्या. तसेच ग्रामीण बॅक व बँक आॅफ इंडियाच्या शाखेत दलालांचा मोठा शिरकाव वाढल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे खोळंबली होती. दरम्यान, याबाबत शेतकऱ्यांनी आ. संतोष दानवे यांंच्याकडे तक्रारी केल्या होत्या. यावरून आज आ. दानवे यांनी ग्रामीण बॅक गाठून शाखाधिकाऱ्यांविषयी विचारणा केली असता, ते रजेवर असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सहाय्यक शाखाधिकारी क्षीरसागर यांना शेतकऱ्यांची अडवणूक का करता, असा जाब विचारला. त्यांनी उडवाउडवाीची उत्तरे दिली तर कुलकर्णी यांनी आ. दानवे यांचा भ्रमणध्वनी घेण्यास नकार दिल्याने आ. दानवे संतापले होते. यावेळी आ. दानवे यांनी गेल्या तीन वर्षापासून शेतकरी दुष्काळाचा सामना करीत असून सलग चौथ्या वर्षी दुष्काळाचे सावट पसरलेले आहे. ही गंभीर समस्या लक्षात घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅकाना शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज वाटपाचे आदेश दिलेले आहे. असे असतांना अधिकारी मुद्दामहून शेतकऱ्यांना त्रास देत असल्याचे सांगीतले. आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून शाखाधिकाऱ्याच्या कामचुकार पणाविषयी तक्रार करणार असल्याचे पत्रकारांना सांगीतले. यावेळी जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, सरपंच रवींद्र शेळके, रतन ठोंबरे, भगवान नागवे, जगनराव पवार, राहूल दरक, गजानन नागवे, गणेशराव साबळे, गणेश पुंगळे, सदाशिव नागवे डिगांबर शेजूळ यांच्यासह शेतकरी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)