शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

बँकांकडून व्याजापोटी शेतकऱ्यांची पिळवणूक

By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST

दिनेश गुळवे , बीड शेतकऱ्यांसाठी बॅँकांकडून पीककर्ज देण्यात येते. एक लाखापर्यंतच्या पीककर्जाची शेतकऱ्याने मुदतीत परतफेड केली.

दिनेश गुळवे , बीडशेतकऱ्यांसाठी बॅँकांकडून पीककर्ज देण्यात येते. एक लाखापर्यंतच्या पीककर्जाची शेतकऱ्याने मुदतीत परतफेड केली तर केवळ मुद्दल रक्कम बॅँकांनी घ्यावी, व्याज शेतकऱ्यांकडून घेऊ नये, ते व्याज सरकार देईल, असे शासनाचे परिपत्रक आहे. मात्र, असे असतानाही बीड जिल्ह्यातील अनेक बॅँका शेतकऱ्यांकडून दहा हजार ते लाखापर्यंतचे पीककर्ज परतफेड करून घेताना व्याजही आकारत आहे. गारपीट, अवकाळी पाऊस व दोन वर्षापासून दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यातील शेतकरी या प्रकारामुळे अधिकच नाडला जात आहे. शेतकऱ्यांना पेरणीसह खत, मशागत आदी विविध कारणांसाठी कर्ज घ्यावे लागते. शेतकरी खाजगी सावकारांना बळी पडू नये यासाठी बॅँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येते. लाखापर्र्यंतच्या कर्जावरील व्याजाची हमी शासनाने घेतलेली आहे.१९९१ पासून महाराष्ट्रात सरकारने डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत सुरुवातीला दहा हजार व त्यापेक्षा कमी रक्कमेवर व्याज सरकारने भरावे, असा निर्णय घेण्यात आला. पुढे ही रक्कम १९९४ मध्ये १५ हजार, ११ जून २००७ मध्ये २५ हजार, तर २८ जून २०१० मध्ये या योजनेची व्याप्ती ५० हजार व आता एक लाखापर्यंत वाढविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना एक लाखापर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी देण्यात येते. शेतकऱ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी ३० जून पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड करणे गरजेचे आहे. जुलै २०१० मध्ये सहकार आयुक्त राजगोपाल देवरा यांनी परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार शेतकऱ्यांनी एक लाखापर्यंतचे घेतलेले पीककर्ज ३० जून पूर्वी बॅँकेत भरले तर त्यावरील व्याजाची रक्कम शेतकऱ्यांकडून आकारू नये, असा स्पष्ट उल्लेख आहे.सदरील रक्कम बॅँकांना जिल्हा उपनिबंधकांमार्फत सरकार देईल, असेही यात नमूद करण्यात आले आहे. असे असले तरी या शासन परिपत्रकास बीड जिल्ह्यात अनेक बॅँका केराची टोपली दाखवित असल्याचा आरोप शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळावा, यासाठी सध्या जिल्ह्यातील विविध बॅँकांमध्ये शेतकरी घेतलेल्या कर्जाची परतफेड करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बॅँकांकडून दहा हजार ते एक लाखापर्यंतचे कर्ज घेतले आहे. वास्तविक बॅँका अशा शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कमही भरून घेत आहेत. यामुळे गारपीट, अवकाळी पाऊस याने पीडलेला शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. पीककर्ज मुदतीत भरणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम घेऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. या संदर्भात अग्रणी बॅँकेचे व्यवस्थापक म्हणाले की, बॅँकांनी शेतकऱ्यांकडून व्याज न घेतल्यास ते व्याज शासन वेळेत बॅँकांना देत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे खाते थकबाकीदार म्हणून गणले जाते. असे होऊ नये म्हणून बॅँका शेतकऱ्यांकडून पैसे भरून घेतात. सरकारने हे पैसे दिले म्हणजे बॅँका संबंधित शेतकऱ्यांना व्याजाचे पैसे परत करतात. बॅँकांवर गुन्हे दाखल करावेतबहुतांश शेतकरी एक लाखापर्यंतचे पीककर्ज बॅँकांकडून घेतात. असे कर्ज शेतकरी मुदतीत भरतात. असे असले तरी शासन नियम डावलून बॅँकांमधील अधिकारी शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम भरून घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक लूट करतात. असे करणाऱ्या बॅँकावर व तेथील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेची मराठवाडा प्रमुख कालीदास आपेट यांनी केली आहे. तक्रार आल्यास बॅँकांवर कारवाई करूडॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून व्याजाची रक्कम भरून घेऊ नये, अशा सूचना बॅँकांना दिल्या आहेत. असे असतानाही जे बॅँक अधिकारी शासन नियम न पाळता काम करतील, अशा बॅँक अधिकाऱ्यांची तक्रार आल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.