शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

५५ परिचारिकांवर भार

By admin | Updated: September 27, 2014 23:18 IST

हिंगोली : रूग्ण आणि डॉक्टरांमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचारिकांना वाढत्या रिक्त जागांचा फटका सोसत अतिरिक्त कामाचे ओझे पेलावे लागते.

हिंगोली : रूग्ण आणि डॉक्टरांमधील दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिचारिकांना वाढत्या रिक्त जागांचा फटका सोसत अतिरिक्त कामाचे ओझे पेलावे लागते. सलग दोन शिफ्टही कराव्या लागतात. रिक्त जागा ५0 च्या वर असताना १५ पदांची मंजुरी मागितली गेलीे. तीही पूर्ण होईल, याची शाश्वती नाही. २०० बेडचे रूग्णालयात प्रत्यक्षात ५५ परिचारिकांच्या भरवशावर चालत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार रामभरोसे असल्याने रूग्ण सरळ जिल्हा रूग्णालयात धाव घेतात. संख्या वाढल्याने दर्जा वाढून १०० वरून २०० बेडवर रूग्णालय गेले. त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे जुन्याच १०० बेडवर दीडशेच्यावर रूग्ण अ‍ॅडमीट असतात. संख्येने अधिक असणाऱ्या रूग्णांची सेवा हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्याच संख्येतील परिचारिकांना करावी लागते. एकूण सव्वाशेच्या जवळपास पदे मंजूर असताना केवळ ३२ पदे कायमस्वरूपी भरण्यात आली आहेत. अन्य १३ परिचारिका कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. प्रामुख्याने सुट्टी, रजा आदी कामांच्या निमित्ताने बहुतांश परिचारिका रजेवर असतात. उर्वरित परिचारिकांमधून तिन्हीही वेळत कर्तव्यावर हजर राहणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी असते. त्यांना बाह्यरूग्ण विभागासह १७ विभागाचे काम पाहवे लागते. सकाळ, संध्याकाळ डॉक्टरांच्या राऊंडनंतर रूग्णांची पूर्ण काळजी त्यांनाच घ्यावी लागते. साफसफाईपासून ते औषधी देण्यापर्यंतच्या काम करावे लागते. दरम्यान, डॉक्टर नसल्यास नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. बाहेरील लोक वरिष्ठांऐवजी परिचारिकांना जाब विचारतात. विभाग वाढले, बेडची संख्या शंभराहून दोनशेवर गेली. दिवसेंदिवस काम वाढत असताना पुरेशा संख्येअभावी रूग्णांना वेळेवर सुविधा मिळत नाहीत. अतिरिक्त ताणामुळे परिचारिकांवर आजारी पडण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथे परिचारिकांची भरती करणे गरजेचे बनले. मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)