शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

पीएच.डी.च्या रिक्त जागांची यादी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:04 IST

औरंगाबाद : महाविद्यालयीन मार्गदर्शकांचा तिढा सोडविण्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या शिफारसींवर निर्णय घेण्याकरीता २४ मार्चला व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक आयोजित करण्यात ...

औरंगाबाद : महाविद्यालयीन मार्गदर्शकांचा तिढा सोडविण्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या शिफारसींवर निर्णय घेण्याकरीता २४ मार्चला व्यवस्थापन परिषदेची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. त्या बैठकीनंतरच पीएच.डी.च्या रिक्त जागा व मागदर्शकांची संख्या जाहीर करण्यात येणार आहे.

‘पेट’चा निकाल जाहीर केल्यानंतर विद्यापीठाने पीएच.डी.साठी विषयनिहाय रिक्त जागा व गाईडची संख्याही सोमवारी (दि. २२) जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी दुपारनंतर पेट उत्तीर्ण बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर रिक्त जागा व मार्गदर्शकांच्या यादीचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला; परंतु ती यादीच प्रसिद्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. मागील पाच वर्षांपासून संशोधन इच्छुक विद्यार्थी ‘पेट’च्या प्रतीक्षेत होते. यंदा ‘पेट’ झाली, ४ हजारांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले; परंतु मार्गदर्शकांच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेकजण संशोधन करू शकणार नाहीत. ‘युजीसी’च्या परिपत्रकानुसार मार्गदर्शक कार्यरत असलेल्या महाविद्यालयांमध्ये किमान दोन पात्र पदव्युत्तर अध्यापक असावेत, तिथे पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकवला जात असावा व संशोधन केंद्र असेल, तरच त्या मार्गदर्शकांकडे विद्यार्थ्याला संशोधन करता येईल. यासाठी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली. समितीने शिफारस केली आहे की, जिथे संशोधन केंद्र नसेल, तेथील मार्गदर्शकाला संशोधन केंद्र असलेल्या लगतच्या महाविद्यालयामध्ये ‘क्लस्टर’ पद्धतीने संशोधन प्रक्रिया पार पाडता येईल. यामुळे मार्गदर्शकांची संख्या वाढेल. तथापि, बुधवारी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत उपसमितीचा शिफारसींबाबत काय निर्णय होतो, त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

चौकट....

दर्जेदार संशोधनासाठी कडक नियमावली करावी

यासंदर्भात व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी सांगितले की, संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची जास्त असल्यामुळे संशोधनाचा दर्जा घसरतो, असे म्हणणे चूक आहे. दर्जेदार व समाजपयोगी संशोधन व्हावे, या मताचे आम्ही देखील आहोत. त्यासाठी विद्यापीठाने अधिकाधिक कडक नियमावली करावी. त्यास आमचा पाठिंबा राहील.