शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

१५० ची उचल, १२० वितरण; ३० एमएलडी पाणी मुरतेय कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाण्याची उचल करीत आहे. शहरात १२० एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. ...

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाण्याची उचल करीत आहे. शहरात १२० एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. मग उर्वरित ३० एमएलडी पाणी कुठे मुरतेय? असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी वॉटर ऑडिटमध्ये उपस्थित केला आहे. पाण्याचा अपव्यय कुठे होतोय, यावर ऑडिटमध्ये भाष्य करण्यात आलेले नाही.

१६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्षे लागणार आहेत. तेव्हापर्यंत शहराच्या पाण्यात वाढ करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत मनपाने घेतली आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकांच्या सूचनेनुसार शहरातील पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट केले. हा अहवालही प्रशासक यांना सादर करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी येथून १५० एमएलडी पाण्याची उचल करण्यात येते. किरकोळ पाण्याची गळती गृहीत धरली तरी, शहरात किमान १४० ते १४५ एमएलडी वितरण होणे अपेक्षित आहे. शहरात मागील अनेक वर्षांपासून १२० एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. उर्वरित ३० एमएलडी पाणी कुठे जात आहे, असा प्रश्न अहवालात उपस्थित केला आहे. अहवालावर अद्याप चर्चा झालेली नाही. महापालिकेकडे उपलब्ध आकडेवारीवर प्राधिकरणाने अहवाल तयार केल्याचे सूत्रांनी नमूद केले. जलवाहिनीवर मीटर लावून पाण्याची मोजदाद करणे अपेक्षित होते. त्यानंतर शहराला मिळणारे पाणी, गळती होणारे पाणी याचीही मोजदाद होणे गरजेचे होते असेही सूत्रांनी सांगितले.

३० एमएलडी म्हणजे ३ कोटी लिटर

दररोज ३० एमएलडी पाण्याचे नुकसान होते. हे नुकसान मोठे असून हे पाणी कुठे वाया जाते, हे अद्याप ऑडिट अहवालामध्ये स्पष्ट झालेले नाही. एक एमएलडी म्हणजे दहा लाख लिटर याप्रमाणे ३ कोटी लिटर पाणी वाया जाते. तीन कोटी लिटर पाण्याची चोरी होणे शक्य नाही. परंतु या पाण्याचा व्यवस्थितपणे हिशेब मांडण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.