शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

१५० ची उचल, १२० वितरण; ३० एमएलडी पाणी मुरतेय कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:06 IST

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाण्याची उचल करीत आहे. शहरात १२० एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. ...

औरंगाबाद : जायकवाडी धरणातून महापालिका दररोज १५० एमएलडी पाण्याची उचल करीत आहे. शहरात १२० एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. मग उर्वरित ३० एमएलडी पाणी कुठे मुरतेय? असा प्रश्न महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी वॉटर ऑडिटमध्ये उपस्थित केला आहे. पाण्याचा अपव्यय कुठे होतोय, यावर ऑडिटमध्ये भाष्य करण्यात आलेले नाही.

१६८० कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी किमान ३ वर्षे लागणार आहेत. तेव्हापर्यंत शहराच्या पाण्यात वाढ करता येईल का, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. या कामात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मदत मनपाने घेतली आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रशासकांच्या सूचनेनुसार शहरातील पाणीपुरवठ्याचे वॉटर ऑडिट केले. हा अहवालही प्रशासक यांना सादर करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जायकवाडी येथून १५० एमएलडी पाण्याची उचल करण्यात येते. किरकोळ पाण्याची गळती गृहीत धरली तरी, शहरात किमान १४० ते १४५ एमएलडी वितरण होणे अपेक्षित आहे. शहरात मागील अनेक वर्षांपासून १२० एमएलडी पाण्याचे वितरण होत आहे. उर्वरित ३० एमएलडी पाणी कुठे जात आहे, असा प्रश्न अहवालात उपस्थित केला आहे. अहवालावर अद्याप चर्चा झालेली नाही. महापालिकेकडे उपलब्ध आकडेवारीवर प्राधिकरणाने अहवाल तयार केल्याचे सूत्रांनी नमूद केले. जलवाहिनीवर मीटर लावून पाण्याची मोजदाद करणे अपेक्षित होते. त्यानंतर शहराला मिळणारे पाणी, गळती होणारे पाणी याचीही मोजदाद होणे गरजेचे होते असेही सूत्रांनी सांगितले.

३० एमएलडी म्हणजे ३ कोटी लिटर

दररोज ३० एमएलडी पाण्याचे नुकसान होते. हे नुकसान मोठे असून हे पाणी कुठे वाया जाते, हे अद्याप ऑडिट अहवालामध्ये स्पष्ट झालेले नाही. एक एमएलडी म्हणजे दहा लाख लिटर याप्रमाणे ३ कोटी लिटर पाणी वाया जाते. तीन कोटी लिटर पाण्याची चोरी होणे शक्य नाही. परंतु या पाण्याचा व्यवस्थितपणे हिशेब मांडण्यात आलेला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.