शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
3
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
4
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
5
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
6
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
7
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
8
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
9
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
10
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
11
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
12
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
13
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
14
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
15
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
16
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
17
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
18
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
19
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
20
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

एलआयसीकडे ८ कोटी रुपये पडून

By admin | Updated: December 24, 2014 01:03 IST

औरंगाबाद : विमाधारक पॉलिसी काढतात आणि १५ ते २० वर्षांनंतर पॉलिसी काढली होती हेच विसरून जातात. अनेक जण बदललेल्या घराच्या पत्त्याची नोंद करीत नाहीत.

औरंगाबाद : विमाधारक पॉलिसी काढतात आणि १५ ते २० वर्षांनंतर पॉलिसी काढली होती हेच विसरून जातात. अनेक जण बदललेल्या घराच्या पत्त्याची नोंद करीत नाहीत. अशा ७३७० विमाधारकांचे पत्तेच न सापडल्याने भारतीय आयुर्विमा महामंडळाकडे त्यांचे ८ कोटी रुपये पडून आहेत. विमाधारक किती निष्काळजी असतात, याचे उत्तम उदाहरण एलआयसीच्या आकडेवारीवरून दिसून येते. आयुष्याच्या उमेदीच्या काळात पै-पै रक्कम जमवून तो विम्याचे हप्ते भरतो. मात्र, बदललेल्या घराचा पत्ता तो विमा कंपनीत देत नाही. याचा किती मोठा फटका विमाधारकाला बसतो, याची कल्पनाही त्या ७३७० विमाधारकांना नसावी. यातील अनेक जण आपण विमा काढला होता हे विसरून गेले आहेत. यामुळेच २००९ पूर्वीचे विमाधारक, ज्यांनी दावा दाखल केला नाही, अशांच्या तब्बल ८ कोटी २३ लाख रुपयांच्या रकमा एलआयसीकडे पडून आहेत. या रकमेचा वापर ना एलआयसीला करता येतो, ना विमाधारकांना त्यावरील व्याज मिळू शकते. बँकांमध्ये असे अनेक खातेदार आहेत की, त्यांची कोट्यवधींची रक्कम खात्यावर जमा आहे, पण त्या खातेदारांचा पत्ताच लागत नाही. तसेच विमाधारकांच्या बाबतीतही घडत आहे. यासंदर्भात एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक प्रशांत नायक यांनी सांगितले की, २००९ पासून प्रत्येक विमाधारकास नवीन पॉलिसी काढताना नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्सफर (एनईएफडी) नंबर द्यावा लागत आहे. यामुळे दाव्याची रक्कम थेट ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होत आहे. आता नवीन विमाधारकांना विमा काढताना फॉर्मवर त्यांचा मोबाईल नंबर व ई-मेल आयडी भरून घेतले जात आहेत. मात्र, जे २००९ पूर्वीचे विमाधारक आहेत, त्यांच्या फॉर्मवर एनईएफडी नंबर लिहिलेले नव्हते. ज्यांच्या विम्याची मुदत संपण्याच्या महिनाभर आधीच त्यांच्या घरी पत्र पाठविले जाते. मात्र, औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांतील ७३७० विमाधारक असे आहेत की, विम्याच्या फॉर्मवर दिलेल्या पत्त्यावर ते राहत नसल्याचे आढळून आले आहे. अशा विमाधारकांचा पत्ताच लागणे कठीण झाले आहे. त्यांची ८ कोटी २३ लाखांची रक्कम एलआयसीत जमा आहे. याशिवाय काहींनी फॉर्मवर वारसाचे नाव लिहिलेले नाही आणि त्या विमाधारकाचा मृत्यू झाल्यानंतर रक्कम आपणास मिळावी, यासाठी त्याच्या उत्तराधिकाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. अशा ५४ विमाधारकांचे १३ लाख रुपये एलआयसीकडे आहेत. तसेच मॅच्युरिटीच्या ८०१ विमाधारकांचे १ कोटी ७१ लाख रुपये, तर मनीबॅकच्या ६५६९ विमाधारकांचे ६ कोटी ५२ लाख रुपये पडून आहेत. या विमाधारकांनी जर आता दावा दाखल केला तर त्यांना पुरावे द्यावे लागतील. बँक खात्याची माहिती एलआयसीला द्यावी लागेल. खात्री पटल्यावरच एलआयसी त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करेल. विम्याच्या रकमेवर दावा दाखल न केलेल्यांच्या संख्येत गेल्या ९ महिन्यांत १२८१ विमाधारकांची भर पडली आहे. एजंटलाही त्यांच्या विमा ग्राहकांचे पत्ते सापडले नाहीत, अशांचे १ कोटी ७० लाख रुपये एलआयसीकडे जमा आहेत. निधन झालेल्या विमाधारकांच्या २ वारसदारांना न्यायालयाच्या निकालानंतर ४ लाखांची रक्कम देण्यात आली.