शहरं
Join us  
Trending Stories
1
दर गुरुवारी काय काम करतो हाफिज सईद?; लश्करच्या माजी दहशतवाद्याचा मोठा खुलासा
2
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
3
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
4
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
5
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
6
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
7
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
8
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
9
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!
10
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
11
Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
12
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
13
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासारखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
14
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
15
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
16
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
17
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
18
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
19
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
20
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?

पालेभाज्या, दूधपुरवठ्यावर परिणाम

By admin | Updated: June 3, 2017 00:47 IST

औरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पालेभाज्या व फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेतकऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी शहरात पालेभाज्या व फळभाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम जाणवला. विक्रेत्यांनी आपल्याकडील शिल्लक फळभाज्यांचीच दुप्पट भावात विक्री केली, तर नेहमीपेक्षा ६५ हजार लिटरने दूध संकलन घटले होते. मात्र, फळभाज्या व दूध सहज मिळत असल्याने जनजीवनावर परिणाम जाणवला नाही. मात्र, संप सुरूराहिला तर उद्या शनिवारी तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शुक्रवारी जाधववाडी येथील फळभाज्यांच्या अडत बाजाराला साप्ताहिक सुटी होती. यामुळे जिल्ह्यातून व परजिल्ह्यांतून दररोज येणारे ८० ते ९० टन फळ व पालेभाज्यांची आवक आज झाली नाही. परिणामी भाजीमंडईत श्रावण घेवडा २०० रुपये, दोडके १०० रुपये, भेंडी, कारले, ६० रुपये तर फुलकोबी, दोडके ५० रुपये किलो, टमाटे ४० रुपये प्रतिकिलो अशा दुप्पट भावात भाज्या विकण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे संप लक्षात घेऊन विक्रेत्यांनी मागील दोन दिवसांत फळभाज्यांचा साठा करून ठेवला आहे. या कृत्रिम तेजीचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो हे माहीत नाही; पण व्यापारी मात्र संपाचा संपूर्ण फायदा उचलत उखळ पांढरे करून घेत आहेत. होलसेल व्यापाऱ्यांनी सांगितले की, शहरात आजघडीला २० ते २५ टन पाले-फळभाज्यांचा साठा आहे. मात्र, शनिवारी या भाज्या विक्री होतील. जाधववाडीत परजिल्ह्यांतून फळभाज्या आल्या नाही, तर तुटवडा जाणवायला लागेल व शिल्लक असलेल्या भाज्यांचे भाव विक्रेते आणखी वाढवतील. तसे काही शेतकऱ्यांनी आज पहाटे व दुपारी दुचाकीवर पालेभाज्या आणून त्या औरंगपुरा व अन्य भाजीमंडईत विकल्या. यामुळे काही विक्रेत्यांकडे ताज्या भाज्या दिसून आल्या; पण त्याचे प्रमाण कमी होते. शहरात दररोज पाकीट बंद सुमारे दीड लाख लिटर दुधाची विक्री होत असते. मात्र, जिल्ह्यातील दूध संकलन कमी झाले व परजिल्ह्यांतून होणारा दूध पुरवठा घटल्याने सुमारे ८५ हजार लिटर दूध विक्रीस उपलब्ध झाले. तसेच दुधवाल्या भय्यांनीही नेहमीप्रमाणे घरपोच दूध आणून दिले. ग्राहकांना दूध सहज मिळत असल्याने दुधाच्या टंचाईचा परिणाम जाणवला नाही. शहरात जिल्ह्यातूनच नव्हे, तर नगर, कोपरगाव, जळगाव आदी जिल्ह्यांतील विविध दूधडेअरींकडून दुधाचा पुरवठा होतो. गुरुवारपासूनच दुधडेअरीवरील दूध संकलनावर परिणाम जाणवू लागला होता. यामुळे गुरुवारी सकाळी नेहमीपेक्षा सुमारे ३० हजार लिटर दूध कमी आले. आज संपाच्या दुसऱ्या दिवशी हाच आकडा ६५ हजार लिटरपर्यंत जाऊन पोहोचला. शहरातील देवगिरी महानंदाचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप पाटील यांनी सांगितले की, आमचे जिल्ह्यात पाच ठिकाणी दूध संकलन केंद्र आहे. दररोज सकाळी सध्या ५६ हजार लिटर, तर सायंकाळी ३५ हजार लिटर दूध संकलन होत असते. संपाच्या पहिल्या दिवशी आमच्याकडील दुधाचे संकलन १६ हजार लिटरने घटले होते. आज आणखी संकलन कमी होऊन सकाळी २१ हजार लिटरने दूध संकलन कमी झाले, अशीच परिस्थिती राहिली तर रविवारपर्यंत निश्चित दूध पुरवठ्यावर मोठा परिणाम जाणवेल, असेही त्यांनी नमूद केले. परजिल्ह्यातून येणाऱ्या ५० ते ७५ हजार लिटर दुधापैकी आज निम्मेच दूध विक्रीला आले होते.