शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सामाजिक बांधिलकीतून विद्यापीठाला पुढे नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व समाज या चारही घटकांना सोबत घेऊन गेल्या दोन वर्षांत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ...

औरंगाबाद : विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व समाज या चारही घटकांना सोबत घेऊन गेल्या दोन वर्षांत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठाला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठाची प्रतिमा व नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ते वर्ग अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कुलगुरू डॉ. येवले यांचा अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या या विद्यापीठाला ऐतिहासिक परंपरा आहे. समाजाची फार मोठी अपेक्षा असणारी विद्यापीठ ही संस्था असते. तेथे कायद्यानेच निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे, अशी आम्हा सर्वांची प्रामाणिक भावना आहे. शेतकरी, कष्टकरी, बहुजन व अल्पसंख्याक समाजातील मुले मोठ्या संख्येने विद्यापीठात शिक्षणासाठी येतात. अनेक जण तर पहिल्या पिढीचे पदवीधर आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी प्रचंड मेहनती व गुणवंत असून त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते उत्तम कामगिरी करू शकतात. ‘कोविड’नंतरची बदलेली परिस्थिती लक्षात घेऊन बदल केले जातील. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. गिरीश काळे, ईश्वर मंझा, दिलीप भरड, किशोर नाडे आदींनी भावना व्यक्त केल्या. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले व संजय शिंदे यांनी आभार मानले.

चौकट...........................

संस्थेचे संस्थान होणार नाही

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय घेणारी व जनतेच्या निधीतून चालणारी संस्था म्हणून कोणत्याही विद्यापीठाची ओळख असते. मात्र, ठरावीक लोक निर्णय घेऊ लागले, तर त्या संस्थेचे रूपांतर संस्थानात होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संस्थान होणार नाही, याची काळजी समाजातील सर्व घटकांनी घेतली पाहिजे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले.