शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

सामाजिक बांधिलकीतून विद्यापीठाला पुढे नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व समाज या चारही घटकांना सोबत घेऊन गेल्या दोन वर्षांत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ...

औरंगाबाद : विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक व समाज या चारही घटकांना सोबत घेऊन गेल्या दोन वर्षांत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विद्यापीठाला पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आगामी काळात सर्वांच्या सहकार्यातून विद्यापीठाची प्रतिमा व नावलौकिक उंचावण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त गुरुवारी ते वर्ग अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कुलगुरू डॉ. येवले यांचा अधिकाऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी कुलगुरू डॉ. येवले म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने चालणाऱ्या या विद्यापीठाला ऐतिहासिक परंपरा आहे. समाजाची फार मोठी अपेक्षा असणारी विद्यापीठ ही संस्था असते. तेथे कायद्यानेच निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे, अशी आम्हा सर्वांची प्रामाणिक भावना आहे. शेतकरी, कष्टकरी, बहुजन व अल्पसंख्याक समाजातील मुले मोठ्या संख्येने विद्यापीठात शिक्षणासाठी येतात. अनेक जण तर पहिल्या पिढीचे पदवीधर आहेत. मराठवाड्यातील विद्यार्थी प्रचंड मेहनती व गुणवंत असून त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते उत्तम कामगिरी करू शकतात. ‘कोविड’नंतरची बदलेली परिस्थिती लक्षात घेऊन बदल केले जातील. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाट, डॉ. कैलास पाथ्रीकर, डॉ. गिरीश काळे, ईश्वर मंझा, दिलीप भरड, किशोर नाडे आदींनी भावना व्यक्त केल्या. कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केले व संजय शिंदे यांनी आभार मानले.

चौकट...........................

संस्थेचे संस्थान होणार नाही

लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा निर्णय घेणारी व जनतेच्या निधीतून चालणारी संस्था म्हणून कोणत्याही विद्यापीठाची ओळख असते. मात्र, ठरावीक लोक निर्णय घेऊ लागले, तर त्या संस्थेचे रूपांतर संस्थानात होत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संस्थान होणार नाही, याची काळजी समाजातील सर्व घटकांनी घेतली पाहिजे, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले म्हणाले.