शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

लातूरला कृत्रिम पावसाची गरज

By admin | Updated: July 14, 2016 01:10 IST

गतवर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाला़ यंदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस आहे़ गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र पाऊस झाला़

गतवर्षी मराठवाड्यात कमी पाऊस झाला़ यंदा मराठवाड्यात लातूर जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस आहे़ गेल्या आठ दिवसात राज्यात सर्वत्र पाऊस झाला़ परंतू, लातूर जिल्ह्याकडे वरूणराजाने पाठ फिरविली़ बालाघाटचा पठार असलेल्या भागात वरूणराजा रूसलेला आहे़ शासनाने तरी लातूर जिल्ह्याकडे पाहून कृत्रिम पाऊस पाडण्याची गरज आहे़ आकाशात ढग थांबलेले आहेत़ ते पुढे सरकण्याआधीच जर फ्लोराईडचा मारा करून कृत्रिम पाऊस पाडला तर लातूरकरांना दिलासा मिळेल, अशा प्रतिक्रिया लातूरकरांनी व्यक्त केल्या आहेत़ लातूर शहरात सध्याही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे़ तुटपुंज्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत़ परंतू, असाच पाऊस राहिला तर पेरलेले पीक हाती लागेल की नाही, याची चिंता आहे़ तीन वर्षांपासून लातूरकरांचे पाण्यासाठी हाल आहेत़ त्यामुळे शासनाने लातूर जिल्ह्यापुरता कृत्रिम पावसाचा प्रयोग हाती घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे़ ४लातूर जिल्ह्यात ढग झाकाळून येतात़ मोठा पाऊस येईल, असे वाटत असतानाच ढग निघून जातात़ यामुळे शेतकरी व लातूर जिल्ह्यातील जनता चिंताग्रस्त आहे़ मराठवाड्यात कायमस्वरूपी कृत्रिम पावसाची यंत्रणा उभा केली पाहिजे़़ ज्यावेळी ढग दाटून येतील त्यावेळी फ्लोराईडचा मारा करून पाऊस पाडला पाहिजे़ शासनाने आता वाट न पाहता तत्काळ हा प्रयोग मराठवाड्यात राबवावा़ त्यासाठी नूतन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांकडे शिष्टमंडळ नेऊन मागणी करणार असल्याचे भाजपाचे सुधीर धुत्तेकर म्हणाले़वातावरण आहे तोपर्यंत शासनाने कृत्रिम पावसाचा निर्णय घ्यायला हवा़ गतवर्षी कृत्रिम पावसाला पोषक असलेले वातावरण निघून गेल्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्याचा फायदा झाला नाही़ त्यामुळे मागचा पूर्वानुभव लक्षात घेता आता शासनाने कृत्रिम पावसाची तयारी करावी़ जेणेकरून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल़ लातूरला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जर हा प्रयोग केला तर फायद्याचे होईल़ त्यासाठी शासनाने तत्काळ निर्णय घेण्याची गरज आहे़ तहानलेल्या लातूरकरांसाठी निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, असे मत अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे यांनी व्यक्त केले़बालाघाटच्या पठारात पाऊस कमी आहे़ तो नेहमीच कमी असतो़ कृत्रिम पाऊस पाडला तर थोडा फायदा होईल़ कारण आपल्याकडे अत्याधुनिक टेक्नॉलॉजी नाही़ शिवाय, कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी ढग स्थिरावले पाहिजेत़ ते जर पुढे सरकले तर त्याचा फायदा होत नाही़ सध्याचे वातावरण कृत्रिम पावसाला पोषक असल्याचे अभ्यासक प्रा़डॉ़ सुरेश फुले म्हणाले़ या वातावरणाचा उपयोग शासनाने करून घेतला पाहिजे़