शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

लातूरची प्रकरणेही औरंगाबादेत !

By admin | Updated: August 27, 2014 00:59 IST

हणमंत गायकवाड , लातूर जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी लातुरात विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणीचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. पण या समितीला स्थापनेपासून कायमस्वरूपी अध्यक्षच नाही.

हणमंत गायकवाड , लातूरजात प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी लातुरात विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणीचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. पण या समितीला स्थापनेपासून कायमस्वरूपी अध्यक्षच नाही. गेल्या दीड-दोन वर्षांपासून प्रभारी अध्यक्षांवर कामकाज चालू आहे. दोन ठिकाणचा प्रभार असल्याने अध्यक्ष नसतातच. त्यामुळे लातूरसह नांदेड, हिंगोली आणि उस्मानाबादच्या लोकांना औरंगाबाद वारी करावी लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रमाणपत्रांच्या सुनावणी औरंगाबादच्या समिती कार्यालयात होत आहेत. यामुळे आर्थिक फटका बसत असून, वेळही वाया जात आहे.जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातुरात विभागीय कार्यालय स्थापन केले. सुरूवातीचे काही वर्षे समितीचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवरच सुरू करण्यात आला. नंतरच्या काळात कायमस्वरूपी अधिकारी मिळाले. पण गेल्या दीड-दोन वर्षांपासून समितीला कायमस्वरूपी अध्यक्ष नाहीत. त्यांच्याकडे औरंगाबादचा कायमस्वरूपी, तर लातूरचा प्रभारी पदभार आहे. ते लातूरला येतच नाहीत. त्यामुळे जात पडताळणीचे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. सुनावण्यांसाठी तारखांवर तारखा देण्यात येतात. पण अध्यक्ष येतच नाहीत. त्यामुळे निर्णय होऊ शकत नाही. आता तर सुनावण्या औरंगाबाद कार्यालयात घेतल्या जात आहेत. समिती सचिव, संशोधन अधिकारी आणि संबंधीत प्रमाणपत्रधारक व्यक्तींना औरंगाबादला जावे लागत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार चालू आहे. केवळ एक अध्यक्ष नसल्याने किमान ७० ते ८० लोकांना औरंगाबाद वारी करावी लागत आहे. एका तारखेत ७० ते ८० लोकांची सुनावणी घेण्यात येत असली तरी, एका सुनावणीत प्रकरणाचा निकाल लागू शकत नाही. अनेक सुनावण्या घ्याव्या लागतात. त्यामुळे ही औरंगाबाद वारी परवडणारी नसल्याचे लाभधारक बोलत आहेत. प्रत्येक आठवड्याला सुनावणी असते. आता ती पंधरा दिवसाला घेण्यात येत आहे. नियमांनुसार लातूरच्या लोकांची लातूरलाच सुनावणी झाली पाहिजे. त्यासाठी तर विभागीय समिती लातुरात स्थापन करण्यात आली आहे. पण कायमस्वरूपी अध्यक्ष नसल्याने लातूरची गैरसोय आहे. सध्या हजारो प्रस्ताव समितीचा निर्णय नसल्याने पडून आहेत. लाभार्थी दररोज खेटे मारतात. पण अध्यक्ष नसल्याचे कारण सांगितले जाते. सुनावणी झाल्यानंतर प्रकरण दक्षता समितीकडे जाते. तिथेही लवकर न्याय मिळत नाही, अशी अवस्था लातूरच्या विभागीय जात पडताळणी समितीची झाली आहे.समिती अध्यक्ष मुगळीकर यांच्याकडे लातूर आणि औरंगाबादचा पदभार आहे. पाठीचा आजार असल्याने ते औरंगाबाद येथेच थांबत आहेत. मागील दोन सुनावण्या औरंगाबादेतच झाल्या आहेत. मणक्याचा त्रास असल्याने त्यांना प्रवास करता येत नाही. परंतु, यावर उपाय निघेल आणि सुनावण्या लातूरमध्येच होतील. समितीची बैठकही येथेच होईल. लातूरकरांना औरंगाबादला जाण्याची गरज लागणार नाही, असे जात पडपाळणी समितीचे सचिव कवठेकर यांनी सांगितले.