शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

पीकविम्याकरिता उरला शेवटचा आठवडा

By admin | Updated: July 24, 2015 00:47 IST

बीड : खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सबंध पिके धोक्यात आहेत.

बीड : खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सबंध पिके धोक्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी केले आहे. ३१ जुलै ही अंतिम तारीख असल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिलेला आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी पीकविमा हप्ता रकमेत १० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच गतवर्षी सोयाबीन पीकविम्यापासून वंचित राहिलेले बीड, माजलगाव, गेवराई या तालुक्यांचा यंदा नव्याने सहभाग करण्यात आला आहे. पीक लागवडीप्रमाणे विम्याची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, मूग, कारळे, भूईमुग, सोयाबीन, कापूस या पिकांचा विमा सादर करण्याची तारीख लागवडीपासून एक महिना किंवा ३१ जुलै राहणार आहे. तब्बल दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात आहेत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. गतवर्षी जिल्ह्याला ३३६ कोटी रूपयांचा विमा मिळाला होता. पिकांमधून नाही तर किमान विमा रकमेतून आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी वाढविला रेटपीकविम्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी हेक्टरी साडेचार हजार हेक्टरीप्रमाणे पीकविमा काढला जात होता. यंदाच्या वर्षीपासून हेक्टरी सहा हजार प्रमाणे वीमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही विम्याच्या रकमेत वाढ केली आहे. (प्रतिनिधी)येथील कृषी विभागाच्या वतीने गुरूवारी पीकविमा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांना पीकविम्याचे अर्जवाटप तसेच महत्त्व पटवून सांगण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते. गावपातळीवर शेतकऱ्यांना पीकविमा काढण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना विमा काढण्यात अडचण होऊ नये यासाठी कृषी विभागाचे अधिकारी राष्ट्रीयीकृत बँकेत उपस्थित असल्याचेही तंत्र विभाग अधिकारी बनसावडे यांनी सांगितले.