शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

पीकविम्याकरिता उरला शेवटचा आठवडा

By admin | Updated: July 24, 2015 00:47 IST

बीड : खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सबंध पिके धोक्यात आहेत.

बीड : खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख ५९ हजार ५२९ हेक्टरवर पेरा झाला आहे. मात्र, पावसाने ओढ दिल्याने सबंध पिके धोक्यात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकविम्याचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी उपसंचालक बी. एम. गायकवाड यांनी केले आहे. ३१ जुलै ही अंतिम तारीख असल्याने शेतकऱ्यांच्या हाती केवळ एक आठवड्याचा कालावधी राहिलेला आहे.अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी पीकविमा हप्ता रकमेत १० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. तसेच गतवर्षी सोयाबीन पीकविम्यापासून वंचित राहिलेले बीड, माजलगाव, गेवराई या तालुक्यांचा यंदा नव्याने सहभाग करण्यात आला आहे. पीक लागवडीप्रमाणे विम्याची अंतिम मुदत ठरविण्यात आली आहे. खरीप ज्वारी, बाजरी, तूर, उडीद, मूग, कारळे, भूईमुग, सोयाबीन, कापूस या पिकांचा विमा सादर करण्याची तारीख लागवडीपासून एक महिना किंवा ३१ जुलै राहणार आहे. तब्बल दीड महिन्यापासून पावसाने ओढ दिल्याने पिके धोक्यात आहेत. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत. गतवर्षी जिल्ह्याला ३३६ कोटी रूपयांचा विमा मिळाला होता. पिकांमधून नाही तर किमान विमा रकमेतून आर्थिक उत्पन्न मिळण्याच्या हेतूने मोठ्या प्रमाणात विमा उतरविण्यात येत आहे.शेतकऱ्यांनी वाढविला रेटपीकविम्याच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी हेक्टरी साडेचार हजार हेक्टरीप्रमाणे पीकविमा काढला जात होता. यंदाच्या वर्षीपासून हेक्टरी सहा हजार प्रमाणे वीमा मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनीही विम्याच्या रकमेत वाढ केली आहे. (प्रतिनिधी)येथील कृषी विभागाच्या वतीने गुरूवारी पीकविमा दिन साजरा करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांना पीकविम्याचे अर्जवाटप तसेच महत्त्व पटवून सांगण्यात आले. यावेळी तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी सहायक उपस्थित होते. गावपातळीवर शेतकऱ्यांना पीकविमा काढण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शेतकऱ्यांना विमा काढण्यात अडचण होऊ नये यासाठी कृषी विभागाचे अधिकारी राष्ट्रीयीकृत बँकेत उपस्थित असल्याचेही तंत्र विभाग अधिकारी बनसावडे यांनी सांगितले.