शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

अनावश्यक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी ...

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी नागरिकांनी लॉकडाऊनची कोणतीही तमा बाळगली नाही. दिवसभर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवरून फिरताना दिसून आले. पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली नाही.

शनिवारी शहरात ५९५ म्हणजे जवळपास ६०० रुग्ण आढळून आले. कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी म्हणून प्रशासनाने रात्री नऊनंतर संचारबंदी लावली. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. शनिवारी औरंगाबाद शहरात नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दूध, भाजीपाला, मेडिकल आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. तरी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले नाही.

रविवारी दिवसभर नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून आले. जुन्या शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. विशेष बाब म्हणजे नागरिक कोणतेही कारण नसताना रस्त्यावरून फिरत असताना दिसून आले. दुपारी तीननंतर तर शहरात लॉकडाऊन आहे किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. औरंगपुरा भाजीमंडईच्या परिसरात काही फळविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती. खरेदीसाठी ग्राहक नसले तरी दुकाने उघडी होती. रविवारी काही ठिकाणी मासविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती, मात्र त्यांच्याकडे खरेदीसाठी ग्राहकच नव्हते.

शुक्रवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी

प्रशासनाने लॉकडाऊन दोन दिवसांचा असणार हे जाहीर केलेले असतानाही नागरिकांनी भीतीपोटी शुक्रवारी मोठ्याप्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. बाजारात भाजीपाला शिल्लक राहिलेला नव्हता. फळविक्रेत्यांनी अत्यंत कमी दराने माज विकून टाकला. लॉकडाऊन अवधी वाढेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.

६० टक्के दूध शिल्लक

लॉकडाऊनमध्ये दूधविक्रेत्यांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर नागरिक दूध खरेदीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे प्रत्येक दूध विक्रेत्याकडे जवळपास ६० टक्के दूध पडून होते. रविवारी सकाळपासून मोजकेच नागरिक दूध खरेदीसाठी येत होते. रविवारीही दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.