शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

अनावश्यक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी ...

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी नागरिकांनी लॉकडाऊनची कोणतीही तमा बाळगली नाही. दिवसभर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवरून फिरताना दिसून आले. पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली नाही.

शनिवारी शहरात ५९५ म्हणजे जवळपास ६०० रुग्ण आढळून आले. कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी म्हणून प्रशासनाने रात्री नऊनंतर संचारबंदी लावली. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. शनिवारी औरंगाबाद शहरात नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दूध, भाजीपाला, मेडिकल आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. तरी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले नाही.

रविवारी दिवसभर नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून आले. जुन्या शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. विशेष बाब म्हणजे नागरिक कोणतेही कारण नसताना रस्त्यावरून फिरत असताना दिसून आले. दुपारी तीननंतर तर शहरात लॉकडाऊन आहे किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. औरंगपुरा भाजीमंडईच्या परिसरात काही फळविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती. खरेदीसाठी ग्राहक नसले तरी दुकाने उघडी होती. रविवारी काही ठिकाणी मासविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती, मात्र त्यांच्याकडे खरेदीसाठी ग्राहकच नव्हते.

शुक्रवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी

प्रशासनाने लॉकडाऊन दोन दिवसांचा असणार हे जाहीर केलेले असतानाही नागरिकांनी भीतीपोटी शुक्रवारी मोठ्याप्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. बाजारात भाजीपाला शिल्लक राहिलेला नव्हता. फळविक्रेत्यांनी अत्यंत कमी दराने माज विकून टाकला. लॉकडाऊन अवधी वाढेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.

६० टक्के दूध शिल्लक

लॉकडाऊनमध्ये दूधविक्रेत्यांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर नागरिक दूध खरेदीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे प्रत्येक दूध विक्रेत्याकडे जवळपास ६० टक्के दूध पडून होते. रविवारी सकाळपासून मोजकेच नागरिक दूध खरेदीसाठी येत होते. रविवारीही दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.