शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:02 IST

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी ...

औरंगाबाद : कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी या उद्देशाने शनिवारी आणि रविवारी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. पहिल्या दिवशी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी नागरिकांनी लॉकडाऊनची कोणतीही तमा बाळगली नाही. दिवसभर नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यांवरून फिरताना दिसून आले. पोलिसांकडूनही विशेष काळजी घेण्यात आली नाही.

शनिवारी शहरात ५९५ म्हणजे जवळपास ६०० रुग्ण आढळून आले. कोरोनाची साखळी ब्रेक व्हावी म्हणून प्रशासनाने रात्री नऊनंतर संचारबंदी लावली. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. शनिवारी औरंगाबाद शहरात नागरिकांनी लॉकडाऊनला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दूध, भाजीपाला, मेडिकल आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती. तरी नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले नाही.

रविवारी दिवसभर नागरिक रस्त्यावर फिरताना दिसून आले. जुन्या शहरात रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. विशेष बाब म्हणजे नागरिक कोणतेही कारण नसताना रस्त्यावरून फिरत असताना दिसून आले. दुपारी तीननंतर तर शहरात लॉकडाऊन आहे किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. औरंगपुरा भाजीमंडईच्या परिसरात काही फळविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती. खरेदीसाठी ग्राहक नसले तरी दुकाने उघडी होती. रविवारी काही ठिकाणी मासविक्रेत्यांनी दुकाने उघडली होती, मात्र त्यांच्याकडे खरेदीसाठी ग्राहकच नव्हते.

शुक्रवारीच मोठ्या प्रमाणात खरेदी

प्रशासनाने लॉकडाऊन दोन दिवसांचा असणार हे जाहीर केलेले असतानाही नागरिकांनी भीतीपोटी शुक्रवारी मोठ्याप्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. बाजारात भाजीपाला शिल्लक राहिलेला नव्हता. फळविक्रेत्यांनी अत्यंत कमी दराने माज विकून टाकला. लॉकडाऊन अवधी वाढेल, अशी भीती नागरिकांना वाटत आहे.

६० टक्के दूध शिल्लक

लॉकडाऊनमध्ये दूधविक्रेत्यांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत दुकान उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. शनिवारी दिवसभर नागरिक दूध खरेदीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे प्रत्येक दूध विक्रेत्याकडे जवळपास ६० टक्के दूध पडून होते. रविवारी सकाळपासून मोजकेच नागरिक दूध खरेदीसाठी येत होते. रविवारीही दूध मोठ्या प्रमाणात शिल्लक राहण्याचा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.