शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

कंदील, चिमण्या, गॅसबत्ती झाल्या इतिहास जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:05 IST

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर ...

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर केला जात होता. त्यावेळी रॉकेल हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र, कालौघात गावागावात आता वीज पोहोचली असून कंदील, चिमण्या, दिवे आता इतिहास जमा झाली असून, रॉकेलही मिळेनासे झाले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ९० च्या दशकापर्यंतही अनेक गावे विजेविना होती. त्यावेळी अंधार घालविण्यासाठी गोड्या तेलासह रॉकेलवरील दिव्यांना विशेष महत्त्व होते. विविध आकारातील रंगबेरंगी दिवे त्यावेळी विक्रीला येत होती. गरिबाच्या घरी छोटी चिमणी प्रकाशाचे काम करी, अनेक घरी काचेच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडून त्यात कपड्याची वात घालून दिवा तयार केला जात असे. तर परिस्थितीने श्रीमंत असलेल्या कुटुंबाकडे वेगवेगळे दिवे किंवा रॉकेलबत्तीचा वापर केला जात होता. यासाठी ग्रामीण भागात इंधन म्हणून सर्रास रॉकेलचा वापर केला जात होता. मात्र, आता रॉकेलचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. लाइट आल्यानंतरही भारनियमनामुळे अनेक घरांत दिवे वापरले जात होते, मात्र इन्व्हर्टर, चार्जिंग लाइट, मेणबत्तीमुळे त्यांचा वापर बंद झाला आहे.

चौकट

चौकातला कंदील

पूर्वीच्या काळी गावाला प्रकाशमय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने चौकाचौकात मोठमोठे कंदील लावण्यात येत असे. संध्याकाळ झाली की, ग्रामपंचायतीचा कर्मचारी रॉकेलची कॅन घेऊन कंदिलाची साफसफाई करीत त्यात रॉकेल भरून तो प्रज्वलित करीत असे. या प्रकाशात काही शाळकरी मुले अभ्यास करीत असत. आता ही जागा स्ट्रीट लाइटने घेतल्यानंतर चौकातला कंदील काळाच्या पडद्याआड गेला आहे.

चौकट

श्रीमंतांच्या घरी असायची रॉकेलबत्ती

गावातील श्रीमंत घरांमध्ये, दुकाने, बाजार तसेच यात्रेमध्ये जास्त प्रकाशासाठी रॉकेलबत्ती वापरली जात असते. लग्नाच्या वरातीमध्येही प्रकाशासाठी रॉकेल बत्ती डोक्यावर घेऊन काही जण वरातीपुढे चालत असे. जास्त प्रकाश देत असल्याने या बत्तीचे ग्रामस्थांना विशेष आकर्षण होते.

कोट

आमच्या काळात लाइट नव्हती तरी जास्त समस्या निर्माण होत नव्हत्या. रॉकेलही मुबलक मिळायचे. लग्नाच्या वरातीमध्ये गॅसबत्तीचा वापर व्हायचा. कंदील, चिमण्यांमुळे संध्याकाळी लवकर आवरून लवकर झोपत असू व पहाटेच सर्व गाव जागे होत असे. आता सुविधा जरी वाढल्या तरी समस्याही वाढल्या आहेत.

- दत्तू पाटील काळुंके, लासूरगाव.

कोट

सायंकाळचे चार वाजले की, घरात कंदील, चिमण्या स्वच्छ करून त्यात रॉकेल भरावे लागत होते. या प्रकाशातच आम्ही स्वयंपाक करून एकत्र सर्व जण जेवायचो. आता टीव्ही पाहत जेवतात. तेव्हा डोळ्यांचीही दृष्टी चांगली होती. आता लहान वयातच चष्मा लागतो. लाइट आली, जीवन सुकर झाले, मात्र मनुष्य आळशीही झाला आहे.

-शकुंतलाबाई कारभारी आढाव, लासूरगाव

170621\img_20210610_180643.jpg

दत्तू पाटील काळुंके