शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कंदील, चिमण्या, गॅसबत्ती झाल्या इतिहास जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:05 IST

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर ...

लासूरगाव : ज्यावेळी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती, तेव्हा रात्रीच्या वेळी अंधार घालविण्यासाठी घराघरांमध्ये कंदील, चिमण्या तसेच रॉकेलबत्तींचा वापर केला जात होता. त्यावेळी रॉकेल हे ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते. मात्र, कालौघात गावागावात आता वीज पोहोचली असून कंदील, चिमण्या, दिवे आता इतिहास जमा झाली असून, रॉकेलही मिळेनासे झाले आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ९० च्या दशकापर्यंतही अनेक गावे विजेविना होती. त्यावेळी अंधार घालविण्यासाठी गोड्या तेलासह रॉकेलवरील दिव्यांना विशेष महत्त्व होते. विविध आकारातील रंगबेरंगी दिवे त्यावेळी विक्रीला येत होती. गरिबाच्या घरी छोटी चिमणी प्रकाशाचे काम करी, अनेक घरी काचेच्या बाटलीच्या झाकणाला छिद्र पाडून त्यात कपड्याची वात घालून दिवा तयार केला जात असे. तर परिस्थितीने श्रीमंत असलेल्या कुटुंबाकडे वेगवेगळे दिवे किंवा रॉकेलबत्तीचा वापर केला जात होता. यासाठी ग्रामीण भागात इंधन म्हणून सर्रास रॉकेलचा वापर केला जात होता. मात्र, आता रॉकेलचा पुरवठा पूर्णपणे थांबला आहे. लाइट आल्यानंतरही भारनियमनामुळे अनेक घरांत दिवे वापरले जात होते, मात्र इन्व्हर्टर, चार्जिंग लाइट, मेणबत्तीमुळे त्यांचा वापर बंद झाला आहे.

चौकट

चौकातला कंदील

पूर्वीच्या काळी गावाला प्रकाशमय करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने चौकाचौकात मोठमोठे कंदील लावण्यात येत असे. संध्याकाळ झाली की, ग्रामपंचायतीचा कर्मचारी रॉकेलची कॅन घेऊन कंदिलाची साफसफाई करीत त्यात रॉकेल भरून तो प्रज्वलित करीत असे. या प्रकाशात काही शाळकरी मुले अभ्यास करीत असत. आता ही जागा स्ट्रीट लाइटने घेतल्यानंतर चौकातला कंदील काळाच्या पडद्याआड गेला आहे.

चौकट

श्रीमंतांच्या घरी असायची रॉकेलबत्ती

गावातील श्रीमंत घरांमध्ये, दुकाने, बाजार तसेच यात्रेमध्ये जास्त प्रकाशासाठी रॉकेलबत्ती वापरली जात असते. लग्नाच्या वरातीमध्येही प्रकाशासाठी रॉकेल बत्ती डोक्यावर घेऊन काही जण वरातीपुढे चालत असे. जास्त प्रकाश देत असल्याने या बत्तीचे ग्रामस्थांना विशेष आकर्षण होते.

कोट

आमच्या काळात लाइट नव्हती तरी जास्त समस्या निर्माण होत नव्हत्या. रॉकेलही मुबलक मिळायचे. लग्नाच्या वरातीमध्ये गॅसबत्तीचा वापर व्हायचा. कंदील, चिमण्यांमुळे संध्याकाळी लवकर आवरून लवकर झोपत असू व पहाटेच सर्व गाव जागे होत असे. आता सुविधा जरी वाढल्या तरी समस्याही वाढल्या आहेत.

- दत्तू पाटील काळुंके, लासूरगाव.

कोट

सायंकाळचे चार वाजले की, घरात कंदील, चिमण्या स्वच्छ करून त्यात रॉकेल भरावे लागत होते. या प्रकाशातच आम्ही स्वयंपाक करून एकत्र सर्व जण जेवायचो. आता टीव्ही पाहत जेवतात. तेव्हा डोळ्यांचीही दृष्टी चांगली होती. आता लहान वयातच चष्मा लागतो. लाइट आली, जीवन सुकर झाले, मात्र मनुष्य आळशीही झाला आहे.

-शकुंतलाबाई कारभारी आढाव, लासूरगाव

170621\img_20210610_180643.jpg

दत्तू पाटील काळुंके