शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

सावकाराने हडपलेली जमीन अखेर शेतकऱ्यास परत

By admin | Updated: March 21, 2016 00:20 IST

नळदुर्ग : सावकाराकडे अडकलेल्या १ हेक्टर ९३ आर बागायत जमिनीची कागदपत्रे रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी होर्टी (ता़तुळजापूर) येथील शेतकऱ्यास सुपूर्द केली़

नळदुर्ग : सावकाराकडे अडकलेल्या १ हेक्टर ९३ आर बागायत जमिनीची कागदपत्रे रविवारी जिल्हाधिकाऱ्यांनी होर्टी (ता़तुळजापूर) येथील शेतकऱ्यास सुपूर्द केली़ सावकाराने हडपलेली जमीन परत मिळाल्याने शेतकऱ्याच्या वृद्ध मातेने जिल्हाधिकाऱ्यांचे औक्षण केले़ सावकाराकडील जमिनीची कागदपत्रे परत मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता़होर्टी येथील शेतकरी ज्ञानेश्वर बाबूराव राजमाने उर्फ पाटील यांचे वडील बाबूराव राजमाने यांनी दयानंद गुळवे याच्याकडून १ लाख ११ हजार रूपये व्याजाने घेतले होते़ या पैशाची हमी म्हणून प्रारंभी १० आर जमीन खरेदीखत करून दिले होते़ तर ज्ञानेश्वर राजमाने यांनी नंतर १ लाख १४ हजार रूपये व्याजाने घेऊन दयानंद गुळवे यांची पत्नी भारतबाई नकाते यांना तारण म्हणून १ हेक्टर ३ आर जमीन खरेदीखत करून दिली होती़ त्यानंतर राजमाने यांनी २००५ ते २०१० या कालावधीत व्याजासह पाच लाख रूपये सावकारास परत दिले होते़ पैसे घेऊनही सावकार जमीन देत नसल्याने राजमाने यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती़ या तक्रारीनंतर पंचनामा करून अधिकाऱ्यांनी सावकारकी विरोधात अहवाल दिला होता़ या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ या प्रकरणात सावकार दयानंद गुळवे, भारतबाई नकाते, श्रीकांत गुळवे यांनी सावकारकी करून तीन गावातील आठ शेतकऱ्यांची जवळपास १० हेक्टर जमीन हडप केल्याची तक्रारही करून त्याबाबतच्या ३८ नकला पुराव्यासाठी जोडल्या होत्या़ या प्रकरणात चौकशी झाल्यानंतर सावकाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ प्रशासकीय प्रक्रियेनंतर जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी रविवारी राजमाने कुटुंबाकडे त्यांच्या जमिनीची कागदपत्रे परत केली़ यावेळी तहसीलदार काशीनाथ पाटील, सहाय्यक निबंधक मकरंद शहापूरकर, नायब तहसीलदार जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, गामस्थ उपस्थित होते़ जिल्हाधिकाऱ्यांनी राजमाने यांच्याकडे जमिनीची कागदपत्रे दिल्यानंतर त्यांची वृद्ध आई भामूबाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे औक्षण केले़ सावकाराने लाटलेली जमीन परत मिळाल्याने राजमाने कुटुंबियांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता़ शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे़ शिवाय सावकारी प्रश्न सोडविण्यासाठी शुक्रवारी व शनिवारी काम करण्यात येते़ याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा़ शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, पतसंस्था, राष्ट्रीयकृत बँका, पतसंस्थांच्या माध्यमातून त्यांना पतपुरवठा करण्याचा प्रयत्न सुरू आहे़ शिवाय शेतकरी बचत गट स्थापन करून आर्थिक सहाय्य करण्याचा प्रस्तावही शासनाकडे पाठविल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी यावेळी सांगितले़