शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

२८ वर्षांपासून हमखास ‘लालदिवा’!

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

संजय तिपाले , बीड मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली.

संजय तिपाले , बीडमागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली. राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो मंत्रिमंडळात बीडला नेहमी मानाचे स्थान मिळालेले आहे. मागील २८ वर्षांच्या कालावधीत केवळ एक अपवाद वगळता येथील लोकप्रतिनिधी ‘लाल दिव्या’च्या झगमगाटात मिरवले आहेत. प्रश्न एवढाच की, ‘किंगपोस्ट’वर राहणाऱ्या बीडच्या विकासाची गाडी मात्र वेगाने धावली नाही.काल पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण विभागाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात तर बीडकडे कॅबिनेटच्या जोडीला राज्यमंत्रिपदाचा ‘लाल दिवा’ही होता. क्रांतिसिंह नाना पाटील, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंंडे या मातब्बरांची कारकीर्द बीडच्याच मातीत फुलली होती. इथल्या मातीचा गुणधर्मच निराळा. पिचलेल्या, गांजलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इथल्या नेत्यांनीही कणखरपणाची चुणूक दाखवली. त्यामुळे बीडमधून विधानसभेत गेलेल्या लोकप्रतिनिधींना बेदखल करता आले नाही. दोन तपांपेक्षा अधिक काळ ‘लाल दिव्या’चा रुबाब गाजवत बीडच्या नेत्यांनी स्वत:चे मोठेपण सिद्ध केले. १९८४ पासून आजतागायत बीड जिल्ह्याकडे कायम ‘लाल दिवा’ राहिला. केवळ १९९० ते १९९१ या वर्षभरात बीडकडे मंत्रिपद नव्हते. ‘लाल दिव्या’चा मान मिळालेले नेतेसुंदरराव सोळंके हे जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्री. १९७५ ते १९७७ या दरम्यान त्यांनी उद्योग व सार्वजनिक खात्याचा कार्यभार पाहिला. त्यानंतर १९८६ पासून पुढे बीडच्या नेत्यांनी अदलून - बदलून कायमच ‘लाल दिव्या’चा मान मिळविला. १९८६ ते १९८८ या दरम्यान अशोक पाटील हे राज्यमंत्री होते.१९८८ ते ९० हा काळ गाजविला पंडितराव दौंड यांनी. ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९० ते ९१ या वर्षभरात बीडच्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नव्हते. पुढे १९९१ ते ९५ या दरम्यान, शिवाजीराव पंडित यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. याच कालावधीत जयदत्त क्षीरसागर हे उपमंत्री व राज्यमंत्री राहिले. ९५ ते ९९ या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. जयसिंग गायकवाड, सुरेश नवले यांनीही याच दरम्यान राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. ९८ ते ९९ या दरम्यान, बदामराव पंडित यांनाही मंत्रीपदाची संधी मिळाली होती. ९९ ते २००४ या दरम्यान जयदत्त क्षीरसागर व डॉ. विमल मुंदडा असे दोन मंत्री जिल्ह्याला मिळाले. २००४ ते ०९ हा कार्यकाळही त्यांनीच गाजविला. २००९ ते १४ या दरम्यान एक नव्हे दोन नव्हे तर तीन मंत्रीपदे मिळाली. जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषविले. तर प्रकाश सोळंके, सुरेश धस यांनाही लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा मान मिळाला. २८ वर्षांच्या कार्यकाळात डझनभर नेत्यांनी मंत्रीपदे भूषविली. परंतु विकासाचे प्रश्न सुटलेच नाहीत. मुलभूत सुविधांच्या पलिकडे नवे काही होत नाही हे खरे दुखणे. लाल दिव्याच्या झगमगाटा सोबतच शेती, सिंचन, उद्योग, शिक्षण, प्रकल्प, रोजगार याला चालना मिळायला हवी, इतकीच जनतेची अपेक्षा आहे.