शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

२८ वर्षांपासून हमखास ‘लालदिवा’!

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

संजय तिपाले , बीड मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली.

संजय तिपाले , बीडमागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली. राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो मंत्रिमंडळात बीडला नेहमी मानाचे स्थान मिळालेले आहे. मागील २८ वर्षांच्या कालावधीत केवळ एक अपवाद वगळता येथील लोकप्रतिनिधी ‘लाल दिव्या’च्या झगमगाटात मिरवले आहेत. प्रश्न एवढाच की, ‘किंगपोस्ट’वर राहणाऱ्या बीडच्या विकासाची गाडी मात्र वेगाने धावली नाही.काल पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण विभागाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात तर बीडकडे कॅबिनेटच्या जोडीला राज्यमंत्रिपदाचा ‘लाल दिवा’ही होता. क्रांतिसिंह नाना पाटील, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंंडे या मातब्बरांची कारकीर्द बीडच्याच मातीत फुलली होती. इथल्या मातीचा गुणधर्मच निराळा. पिचलेल्या, गांजलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इथल्या नेत्यांनीही कणखरपणाची चुणूक दाखवली. त्यामुळे बीडमधून विधानसभेत गेलेल्या लोकप्रतिनिधींना बेदखल करता आले नाही. दोन तपांपेक्षा अधिक काळ ‘लाल दिव्या’चा रुबाब गाजवत बीडच्या नेत्यांनी स्वत:चे मोठेपण सिद्ध केले. १९८४ पासून आजतागायत बीड जिल्ह्याकडे कायम ‘लाल दिवा’ राहिला. केवळ १९९० ते १९९१ या वर्षभरात बीडकडे मंत्रिपद नव्हते. ‘लाल दिव्या’चा मान मिळालेले नेतेसुंदरराव सोळंके हे जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्री. १९७५ ते १९७७ या दरम्यान त्यांनी उद्योग व सार्वजनिक खात्याचा कार्यभार पाहिला. त्यानंतर १९८६ पासून पुढे बीडच्या नेत्यांनी अदलून - बदलून कायमच ‘लाल दिव्या’चा मान मिळविला. १९८६ ते १९८८ या दरम्यान अशोक पाटील हे राज्यमंत्री होते.१९८८ ते ९० हा काळ गाजविला पंडितराव दौंड यांनी. ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९० ते ९१ या वर्षभरात बीडच्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नव्हते. पुढे १९९१ ते ९५ या दरम्यान, शिवाजीराव पंडित यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. याच कालावधीत जयदत्त क्षीरसागर हे उपमंत्री व राज्यमंत्री राहिले. ९५ ते ९९ या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. जयसिंग गायकवाड, सुरेश नवले यांनीही याच दरम्यान राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. ९८ ते ९९ या दरम्यान, बदामराव पंडित यांनाही मंत्रीपदाची संधी मिळाली होती. ९९ ते २००४ या दरम्यान जयदत्त क्षीरसागर व डॉ. विमल मुंदडा असे दोन मंत्री जिल्ह्याला मिळाले. २००४ ते ०९ हा कार्यकाळही त्यांनीच गाजविला. २००९ ते १४ या दरम्यान एक नव्हे दोन नव्हे तर तीन मंत्रीपदे मिळाली. जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषविले. तर प्रकाश सोळंके, सुरेश धस यांनाही लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा मान मिळाला. २८ वर्षांच्या कार्यकाळात डझनभर नेत्यांनी मंत्रीपदे भूषविली. परंतु विकासाचे प्रश्न सुटलेच नाहीत. मुलभूत सुविधांच्या पलिकडे नवे काही होत नाही हे खरे दुखणे. लाल दिव्याच्या झगमगाटा सोबतच शेती, सिंचन, उद्योग, शिक्षण, प्रकल्प, रोजगार याला चालना मिळायला हवी, इतकीच जनतेची अपेक्षा आहे.