शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

२८ वर्षांपासून हमखास ‘लालदिवा’!

By admin | Updated: November 5, 2014 00:58 IST

संजय तिपाले , बीड मागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली.

संजय तिपाले , बीडमागास जिल्हा अशी ओळख असलेल्या बीडच्या नेत्यांनी राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडली. राज्यात सत्ता कोणत्याही पक्षाची असो मंत्रिमंडळात बीडला नेहमी मानाचे स्थान मिळालेले आहे. मागील २८ वर्षांच्या कालावधीत केवळ एक अपवाद वगळता येथील लोकप्रतिनिधी ‘लाल दिव्या’च्या झगमगाटात मिरवले आहेत. प्रश्न एवढाच की, ‘किंगपोस्ट’वर राहणाऱ्या बीडच्या विकासाची गाडी मात्र वेगाने धावली नाही.काल पंकजा मुंडे यांनी ग्रामविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण विभागाच्या कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात तर बीडकडे कॅबिनेटच्या जोडीला राज्यमंत्रिपदाचा ‘लाल दिवा’ही होता. क्रांतिसिंह नाना पाटील, प्रमोद महाजन, गोपीनाथराव मुंंडे या मातब्बरांची कारकीर्द बीडच्याच मातीत फुलली होती. इथल्या मातीचा गुणधर्मच निराळा. पिचलेल्या, गांजलेल्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इथल्या नेत्यांनीही कणखरपणाची चुणूक दाखवली. त्यामुळे बीडमधून विधानसभेत गेलेल्या लोकप्रतिनिधींना बेदखल करता आले नाही. दोन तपांपेक्षा अधिक काळ ‘लाल दिव्या’चा रुबाब गाजवत बीडच्या नेत्यांनी स्वत:चे मोठेपण सिद्ध केले. १९८४ पासून आजतागायत बीड जिल्ह्याकडे कायम ‘लाल दिवा’ राहिला. केवळ १९९० ते १९९१ या वर्षभरात बीडकडे मंत्रिपद नव्हते. ‘लाल दिव्या’चा मान मिळालेले नेतेसुंदरराव सोळंके हे जिल्ह्यातील पहिले कॅबिनेट मंत्री. १९७५ ते १९७७ या दरम्यान त्यांनी उद्योग व सार्वजनिक खात्याचा कार्यभार पाहिला. त्यानंतर १९८६ पासून पुढे बीडच्या नेत्यांनी अदलून - बदलून कायमच ‘लाल दिव्या’चा मान मिळविला. १९८६ ते १९८८ या दरम्यान अशोक पाटील हे राज्यमंत्री होते.१९८८ ते ९० हा काळ गाजविला पंडितराव दौंड यांनी. ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९० ते ९१ या वर्षभरात बीडच्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नव्हते. पुढे १९९१ ते ९५ या दरम्यान, शिवाजीराव पंडित यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला. याच कालावधीत जयदत्त क्षीरसागर हे उपमंत्री व राज्यमंत्री राहिले. ९५ ते ९९ या काळात गोपीनाथ मुंडे हे उपमुख्यमंत्री होते. जयसिंग गायकवाड, सुरेश नवले यांनीही याच दरम्यान राज्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. ९८ ते ९९ या दरम्यान, बदामराव पंडित यांनाही मंत्रीपदाची संधी मिळाली होती. ९९ ते २००४ या दरम्यान जयदत्त क्षीरसागर व डॉ. विमल मुंदडा असे दोन मंत्री जिल्ह्याला मिळाले. २००४ ते ०९ हा कार्यकाळही त्यांनीच गाजविला. २००९ ते १४ या दरम्यान एक नव्हे दोन नव्हे तर तीन मंत्रीपदे मिळाली. जयदत्त क्षीरसागर यांनी कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद भूषविले. तर प्रकाश सोळंके, सुरेश धस यांनाही लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा मान मिळाला. २८ वर्षांच्या कार्यकाळात डझनभर नेत्यांनी मंत्रीपदे भूषविली. परंतु विकासाचे प्रश्न सुटलेच नाहीत. मुलभूत सुविधांच्या पलिकडे नवे काही होत नाही हे खरे दुखणे. लाल दिव्याच्या झगमगाटा सोबतच शेती, सिंचन, उद्योग, शिक्षण, प्रकल्प, रोजगार याला चालना मिळायला हवी, इतकीच जनतेची अपेक्षा आहे.