शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

पाण्याअभावी शाळांतील शौचालयांना लागले कुलूप

By admin | Updated: October 22, 2014 13:29 IST

शासनाने लाखो रुपये खर्चून प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने बांधलेल्या शौचालयास कुलूप ठोकलेले दिसून येत आहे.

 

 
पालम : शाळांमधील शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून प्रत्येक शाळेत मुला-मुलींसाठी स्वतंत्र शौचालय बांधले आहे. परंतु, बहुतांश शाळांमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने बांधलेल्या शौचालयास कुलूप ठोकलेले दिसून येत आहे.
पालम तालुक्यात ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या १0५ शाळा आहेत. या शाळांमध्ये जवळपास १0 हजार विद्यार्थी नियमित शिक्षण घेत आहेत. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत शौचालयाचे बांधकाम केलेले आहे. परंतु, शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले असले तरी शाळेमध्ये पाणीच उपलब्ध नसल्याने शौचालयाला कुलूप लागलेले दिसत आहे. शाळेच्या परिसरात अनेक गावांत पाणी उपलब्ध नाही. पाण्याची साठवण करण्यासाठी पाण्याच्या टाक्याही नाहीत. यामुळे अडचणीत भर पडलेली आहे. शासन एकीकडे स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय ही मोहीम राबवित आहे. परंतु, पाण्याअभावी शौचालयांना लागलेल्या कुलूपांना गंज चढला आहे. या शाळांमध्ये पाण्याची सोय करुन शौचालय वापरात आणण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. /(प्रतिनिधी)
 
■ पालम तालुक्यात जवळपास सर्वच शाळांमध्ये शौचालयाच्या बांधकामास परवानगी देण्यात आली आहे. परंतु, काही शाळांमध्ये शौचालयाचे बांधकाम अर्धवट आहे. हे बांधकामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या शौचालयाचा वापर करणे अवघड झाले आहे.