शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

माकणी धरणामध्ये उरला अत्यल्प साठा

By admin | Updated: July 7, 2014 00:13 IST

उमरगा : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.

उमरगा : गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने तालुक्यातील ७२ हजार हेक्टर क्षेत्रावरील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. यामुळे तालुक्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले असून, चारा-पाण्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. माकणी धरणामध्ये केवळ १३ दलघमी इतका साठा उरला आहे.तालुक्याची पावसाची सरासरी ९५० मिमी असून, आतापर्यंत केवळ वीस मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे खरीप पेरणीची सर्वच यंत्रणा कोलमडली आहे. उष्णतेची दाहकता कायम असल्याने तालुक्यातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. तालुक्यातील पाझर तलाव, साठवण तलावातील पाणी आटल्याने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. खरीप पेरणीसाठी खते व बी-बियाणे खरेदी करावयाची असल्याने शेतकऱ्यांनी खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचा डोंगर वाढत चालला असून, या रकमा आता कुठून द्यायच्या, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. काही शेतकऱ्यांनी उधारीवर खते, बियाणांची खरेदी करून ठेवली असून, यासाठीही व्यापाऱ्यांनी तगादा सुरू केला आहे. खरिपाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या किराणा, भुसार, कापड दुकानदारांची थकबाकीही वाढल्याने शेतकऱ्यांची बाजारातील पत संपुष्टात येत असल्याचे दिसत आहे. शिवाय चांगला पाऊस पडेल, या आशेवर व्यापाऱ्यांनीही बी-बियाणे, खते यासाठी लाखो रूपयांची गुंतवणूक केली. परंतु, हे साठे अद्यापही दुकानात तसेच पडून असल्याचे व्यापारी लक्ष्मीकांत माणिकवार यांनी सांगितले. चारा-पाण्याचा प्रश्न गंभीरपावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोत कोरडे पडत आहेत. मागील दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या कडब्याचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे पशुधनांना जगविण्यासाठी शिवारात चारा-पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आतापासून शेतकऱ्यांना प्रती पेंडी वीस रूपये दराने विकतची वैरण घेऊन आपल्या पशुधनाला जगविण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे. (वार्ताहर)७२ हजार हेक्टरवरील पेरणी खोळंबलीउमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी धरणात सध्या १३ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, या धरणाची ५९८.५० इतकी पाणी पातळी आहे. वाढत्या उष्णतेमुळे व होणाऱ्या बाष्पीभवन व पाणी वापरामुळे या धरणातील पाणी पातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत चालली आहे. येत्या महिनाभरात धरण भरण्याइतपत पाऊस पडलाच नाही तर उमरगा शहरासह भूकंपग्रस्त ५२ गावांचा पाणीपुरवठा गंभीर होण्याची शक्यता असल्याचे शाखा अभियंता अनिल मुळे यांनी सांगितले. दरम्यान, उमरगा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या माकणी, कोळसूर, कोरेगाव, तुरोरी या धरणातील पाणीसाठेही कमी होत असल्याने उमरगा शहराला आतापासूनच आठ दिवसातून एक वेळा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.चाळीस गावांतील लोकांना टंचाईचे चटकेतालुक्यात ९६ पैकी ४० गावांत सध्या टंचाईची परिस्थिती आहे. चिंचोली (ज) येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, इतर ठिकाणाहूनही पंचायत समितीकडे अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल झाले आहेत.